Saturday, June 8, 2019

पामचित्रे आणि लेखनकला


सध्यां इंटरनेट , टेस्टटूब बेबी ह्या विषयाची  राजकीय मंडळी चर्चा करीत असतात . त्यामुळे आठवण झाली .
मध्यप्रदेशातील दहा हजार वर्षापूर्वीचे भीमबेटका लेण्यांमधील रंगचित्रे पाहिल्यानंतर त्याकाळी माणूस कसा व्यक्त होत असे ह्याची कल्पना येते . अशमयुगातील चित्रकला . तेव्हाचे फेसबुक . सोशल मीडिया . अभिव्यक्ती स्वातंत्र्य .
पुरीहून भुवनेश्वरला जाताना रघूराजपूर हे १०० चित्रकार रहात असलेले गांव पहाण्यात आले . इ स पूर्वीच्या ५ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची कल्पना आली . अश्मयुगातून माणूस दगडावर कोरून व्यक्त होऊ लागला . कागदाचा शोध लागला नव्हता . पामपत्राला वाळवायचे . अणुकुचीदार धातूच्या लेखणीने लिहायचे  किंवा  चित्र  काढायचे आणि त्यात नैसर्गिक झाडाझूडपापासून तयार केलेले रंगद्रव्य वापराचे आणि सुरेख चित्रनिर्मिती करायची . रामायण - महाभारत मुद्रित करायचे .
पामपत्रावरील लिखाण आणि चित्रकला आजही त्या गावातील चित्रकार  तशीच  साकार करतात ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे . पट्टचित्रकला - पामलिफ पेंटिंग्स - हे विलक्षण तंत्र मन वेधून घेतेच आणि त्या काळची माहिती - कला तंत्रज्ञाची कल्पना देते .
आज डाइज - पिगमेंटचे हजारो कारखाने आहेत पण निसर्गातून वनस्पतीपासून मिळणारे रंग अदभूत आहेत . इंडिगो - नील शेती संपली पण भारतीय स्वातंत्र्याची चळवळ तेथूनच सुरु झाली हे ही लक्ष वेधते . हे त्यावेळचे इंटरनेट युग - सोशल मीडिया माझे लक्ष वेधून घेते .

No comments:

Post a Comment