Tuesday, June 4, 2019

गुजरातचा विकास


खरं म्हणजे गुजरातचा विकास गेल्या २० - २२ वर्षात झाला का ? असा प्रश्न काही जणांना पडतो . मी १९८० ते २००० ह्या वर्षात अनेक वेळा - महिन्यातून चारदा - व्यवसायानिमित्त गेलो होतो . वापी - अंकलेश्वर - भरूच - बडोदा - सुरत -  अहमदाबाद - जामनगर ह्या भागात संचार होता . दत्ता सामंत ह्यांच्या गिरणी कामगार संपानंतर गुजरातमधील कापड गिरण्या भरभराटीस आल्या होत्या . रासायनिक उद्योगात वेग आला होता . शहरे बकाल झाली होती . सर्वत्र घाणीचेच राज्य होते . साबरमती गचाळ नाला झाली होती . अनेक छोटे उद्योग पुढे येत होते . त्यानंतरच्या काळात खूप काही बदलले . एका नव्या उत्साहाने उद्योग निर्मिती झाली . जागतिक बाजारपेठ गुजरातला मिळाली . आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात गुजरात चमकू लागला . नवीन शिक्षित गुजराती  पिढी सर्वत्र दिसू लागले . नवी पिढी शिक्षित व्यावसायिक मंडळी म्हणून जगा समोर आली . उद्योगात' घरना माणूस' कन्सेप्ट संपला . इतर प्रांतातले लोक गुजरातमध्ये स्थायिक होऊ लागले . हा बदल गेल्या २० वर्षातला . गुजरात मॉडेल म्हणजे काय ? हे समजून घ्यायचे असेल तर आधीचा गुजरात आणि आजचा  गुजरात समजून घ्यावा लागेल .
तोच अनुभव मध्यप्रदेशचा . एका बिमारू राज्याचा . आज मध्यप्रदेश अधिक पुढे आहे .
अंबानी आणि अदानी म्हणजे गुजरात नव्हे . तेथे छोट्या मोठ्या उद्योगात अनेक लहान मोठे अंबानी आहेत .
अंबानी ह्यांचे नाव जगातील श्रीमंत लोकात गणले जाते . पण ह्याच अंबानीमुळे अनेक जण खूप श्रीमंत झाले , हे लोकांच्या लक्षात येत नाही . साध्या माणसांनी रिलायन्स मध्ये पैसे गुंतवून खूप पैसे कमविले . फ्लॅट घेतले .गाड्या घेतल्या . छोटे उद्योग सुरु केले . पैशातून पैसे कमविले . हे इतरांना जमले नाही . पैसे कमविणे हे काही पाप नसते . गरिबीला गोंजारत जगणे पाप असते .
ह्या लोकांना हे यंत्र सापडले आहे .
Aisi machine lagaunga, iss side se aaloo ghusega, uss side se sona niklega. हे शक्य आहे . ते तर  ह्या गुजराती समाजाला चांगले जमते .


No comments:

Post a Comment