Friday, June 28, 2019

सावरकर


सध्या वि दा सावरकर ह्यांच्यावर खूप उलट सुलट चर्चा चालू आहे . पुरोगामी समजणारे रोज नवे विषय शोधून सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व ह्यावर अनेक प्रश्न विचारीत असतात . महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेले पु ल देशपांडे ह्यांचे सावरकर ह्यांच्यावर केलेले भाषण यु ट्यूबवर दोन भागात उपलब्ध आहे . मी फार पूर्वी ते ऐकले होते .आज ते पुन्हा ऐकले . पु ल ह्या भाषणात सावरकर ह्याचा विज्ञानवादी मानवतावाद , सावरकर आणि त्यांचा खरा सेक्युलरवाद , सावरकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन , मदर तेरेसा ह्यांचा कुटुंब नियोजनाला असलेला विरोध म्हणजे राजद्रोह , सावरकर आणि त्यांचे हिंदुत्व इत्यादी अनेक विषयावर ते गंभीरपणे बोलले . महाकवी सावरकर ह्यावर ही  ते बोलले . नास्तिकतेवर बोलले . हे भाषण ह्या सावरकरद्वेष्ट्यानी अवश्य ऐकावे . सावरकरांना पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे . त्या नंतर अटल बिहारी ह्यांचे भाषण झाले होते . ते नाही ऐकले तरी चालेल .पण पु ल ह्यांना समजलेले आणि भावलेले सावरकर अधिक समजून घ्या . उगाच फालतू चर्चा थांबवा . मणीशंकर अय्यर ह्यांना हा माणूस समजणे कठीण आहे . हे त्यांच्या वक्तव्यावरून समजतेच . १९६३ - ६६ मध्ये सावरकर द्वेष नव्हता . पाठ्यपुस्तकातून सावरकर दिसत होते . आम्ही त्यांच्या कविता वाचल्या .पाठ केल्या .निबंध वाचले . १९७५ नंतर सावरकरद्वेषाचे वारे सुटले . सध्या तर हिंदुत्व ह्या विषयावर डावे  ,पुरोगामी ,समाजवादी आणि कॉंग्रेसवाले तुटून पडताना दिसतात . त्यांना उठताबसता सावरकर दिसत असतात आणि त्यांच्यात मणी शंकर अय्यर संचारतो . एकदा पु ल काय म्हणतात ते समजून घ्या . मुद्दाम पु ल ह्यांचा उल्लेख करीत आहे . पु ल हे नास्तिक , समाजवादी ,पुरोगामी विचारांचे , राष्ट्र सेवादल आणि 'साधने 'शी जवळचे , विनोदी लेखक असले तरी गंभीर विचार मांडणारे लेखक होते . त्यांनी सावरकरांना समजून घेतले .नव्हे त्यांना सावरकर हे व्यक्तिमत्व समजले .

स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक असलेल्या सावरकरांचा असा अपमान करणाऱ्या Congrss च्या नेत्याला  थोडी शिक्षणाची गरज आहे.
मणीशंकर अय्यर नंतर असे वक्तव्य करणारा हा दूसरा नेता.
'सामना ' च्या संपादकांनी ह्या नेत्याला त्यांच्या  दिल्ली भेटीत थोडे  समजावून सांगावे.
हिंदूह्रदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे ह्यांना सावरकरांची  अशी नक्कल बघून किती वेदना झाल्या असतील ह्याची कल्पना करवत नाही.
संजय राऊत  अलिकडेच कलर टीव्ही channel वर सावरकरांवर भरभरून बोलले होते  त्याचीच आठवण झाली.

कोहिमा आणि मणिपूरला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर मला जे जाणवले ते असे ...........
कोहिमाच्या युद्धामुळे ब्रिटिश बिथरले होते . जपानी सैन्य खूप पुढे आले होते .आझाद हिंद सेना होती म्हणूनच ते इतके आंत घुसू शकले . ब्रम्हदेश ते सिंगापूर पर्यंत आझाद हिंद सेनेचे जाळे होते . कोहिमाला ब्रिटिश सैन्याची सर्वात मोठी हानी झाली . आपल्या वडिलांना / आजोबाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आजही ब्रिटिश लोक कोहिमाला भेट देत असतात . 'रणाविण स्वातंत्र्य कोणा  मिळाले' ,हे  अर्धसत्य  आहे .कोहिमा युद्धामुळेच  ब्रिटिशांनी गाशा गुंडाळण्याचे  ठरविले असे जे म्हणतात त्यात थोडे तथ्य आहे .
नेताजींनी आझाद हिंद सेना उभी केली . त्याला  मर्यादित यश मिळाले.
सावरकरांनी  'लेखण्या तोडा आणि बंदुकी हातात घ्या' ,असे म्हंटले खरे पण ते सेना उभी करू शकले नाहीत . ब्रिटिशांनी त्यांची हालचालच बंद केली होती .त्यांना मुस्लिम  लीगच्या  राजकारणाविरुद्ध पर्यायी पक्ष सुद्धा उभा करता आला नाही .'एकला चलो रे  ' ही क्रांतिकारकांची वृत्ती त्यांना आडवी आली असावी.
शेवटी स्वातंत्र्याचे श्रेय दोघांनाही मिळाले नाही . गांधीजींची यशस्वी राजनीती जगापुढे आली व त्यांनाच  सारे श्रेय मिळाले .

No comments:

Post a Comment