Thursday, June 6, 2019

समाजवादी मंडळींची शोकांतिका

समाजवादी मंडळींची शोकांतिका कशामुळे झाली? ,हे आजचे समाजवादी तपासून बघत नाहीत ,हेच लक्षांत घेणे आवश्यक आहे. त्यांना पक्ष बांधणी जमली नाही. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. पक्षफुटीचा रोग लागलेला. आतां तर घराणेशाही चालू आहे. कुठे डॉ लोहिया ? कुठे जयप्रकाशजी ? ह्या समाजवादी मंडळीनी Congress  सोडली नसती तर चित्र बदलले असते .
ह्या मंडळींनी आधी वेगळा गट केला . मग Congress सोडली. पक्षबांधनी केलीच नाही. सगळेच बुध्दीवादी. स्वयंभू नेते. एकत्र राहिले नाहीत. लोहिया- जयप्रकाश, एस एम - गोरे  वगैरे...

पुरोगामी कोणाला म्हणायचं ? सेक्युलर म्हणजेच पुरोगामी का ?
 राज्यघटनेत सेक्युलर शब्द नंतर घातला .तो घातला तसा काढूनही टाकता येतो . समाजवादी हा शब्द असाच घातला . जगातूनच समाजवाद नाहीसा होत आहे . माओचा किंवा कार्ल मार्क्सचा साम्यवाद आहे कुठे ? एकपक्षीय लोकशाही मान्य आहे काय ?
भारतात समाजवाद्यांच्या बारा पार्ट्या . कोणता समाजवाद खरा ? ते सर्व समाजवादी सेक्युलर आहेत काय ? सेक्युलरमध्ये जातीयवाद येत नाही का ?
गांधीजी समाजवादी होते का ? नेहरू रशियन दौऱ्यावरून आल्यावर समाजवादी समाजरचनेच्या गोष्टी बोलू लागले . त्यापूर्वीच जयप्रकाश - लोहिया वगैरे समाजवादी गट काँग्रेसमधून बाहेर पडला . इंदिरा गांधींनी बँकांचे राष्टियीकरण करून समाजवादी पाऊल उचलले तेव्हा धारिया - चंद्रशेखर समाजवादी तरुण तुर्क बाहेर पडले . काँग्रेस खरेच समाजवादी आहे का ? राहुल गांधी ह्यांची विचारसरणी कोणती ?
गांधीजींनी समाजवादी समाजरचनेचा कधी उल्लेख केला नाही .डॉ आंबेडकरांनी कम्युनिझमचा विरोधच केला . त्यांनी समाजवादी आणि सेक्युलर शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट का केले नसावेत ?

एक  वर्षापुर्वीचा प्रतिगामी पुरोगामित्व ' हा गिरीश कुबेर ह्यांचा झणझणीत अंजन घालणारा अग्रलेख अप्रतिम आहे . ह्यातील महत्वाचे मुद्दे :
* काँग्रेसचा मुस्लिम अनुनय
* सनातनी मुस्लिम धर्ममार्तंड आणि त्यांच्या आवाजात  आवाज मिसळणाऱ्या अन्य तथाकथित पुरोगामी मंडळींचा बोटचेपेपणा
* पुरोगामित्वाचे ध्वजधारक म्हणविणारे डावे आणि समाजवादी
* पुरोगाम्यांची तोंडपाटीलकी आणि डाव्यांचे खेळ
* पुरोगाम्यांची भंपक बोटचेपी बौद्धिके आणि बेगडी पुरोगामित्व
ह्यावर टाकलेला प्रकाश खूप काही सांगून जातो .
ह्यामुळेच पुरोगामी ,  समाजवादी  आणि निधर्मी ह्या शब्दांचा अर्थ हरवून बसला आहे .

 पुरोगामी - समाजवादी - सेक्युलर वगैरे वगैरे लोक बोलतात ,लिहितात तेंव्हा अधूनमधून नरहर कुरुंदकर ह्यांची सुभाषिते पेरतात .'शिवरात्र' चा उपयोग म्हणजे त्यांचे जणू काही बायबलच असते. पोपटासारखे बोलत असतात.

तसे राष्ट्रसेवादलाच्या पठडीत तयार झालेले काही बोलघेवढे नेते प्रामाणिक असले तरी राजकारणी नाहीत. सगळेच नेते. कार्यकर्ते नाहीतच. युपी बिहार मध्ये तर घराणेशाहीच चालू आहे. कुठे लोहिया ? कुठे कर्पुरी ठाकूर?
समाजवादी विचाराचे पत्रकार कोण ? असा प्रश्न विचारावा अशी परिस्थिती आहे.

No comments:

Post a Comment