Saturday, March 9, 2013

पांडुरंगाचे ऐसे बोलणे ...


पांडुरंगाचे ऐसे बोलणे ...

(माझा संवाद : भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कोसलाह्या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकराबरोबर )
तुम्ही विचाराल , ’ कोण हा पांडुरंग ?
भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कोसला " ह्या कादंबरीचा नायक. मी रिकामटेकडा होतो. फुकटचा वेळ होतात्यामुळे खूप नेटाने कोसला” ही कादंबरी वाचलीवाचल्यापासून हा पांडुरंग सारखा माझ्यामागे लागला आहेमी फिरायला जातो तेंव्हा हा माझ्याबरोबर असतो. त्याच्याशी सारखा संवाद चालू असतो. तोच संवाद म्हणजे हे लेखन.
पांडुरंगमी नेमाडे सरांचा मानसपुत्र . ५० वर्षापूर्वी त्यांनी मला जन्म दिला. अधूनमधून तुमच्यासारखे वाचक मला भेटतातत्यांना मी सोडत नाहीआज तुमच्या बरोबर सुसंवाद करावयाचा आहेतर सांगा चांगली कलाकृती म्हणजे काय चांगले पुस्तक कोणते?
मला प्रश्नच पडला.
मी : जी कलाकृती पाहिल्यावर घरी घेऊन जावीशी वाटते ती सुंदर कलाकृती असे विजय तेंडूलकर म्हणाले होते आणि पुस्तक म्हणाल तर पुस्तकाच्या दुकानात पुस्तके चाळताना आपण पाने चाळीत जातोत्यातील काही पाने आवडू लागतात. आपण आणखी काही पाने चाळून पाहतोतीही आवडू लागतात मग आपण ते पुस्तक विकत घेतो. आणि बहुधा ते चांगले निघते. माझा तसा अनुभव आहे.

पांडुरंग : कादंबरी लिहावी तर अशी. इतकी जाड आणि तितकीच पोकळ. कोसला ,पृष्ठ १९४)
मी: अगदी बरोबर. "हिंदू" बघा. ६०० पानांची. ही कादंबरी तशी पोकळच. तरीही नेमाड्याना ३० वर्षे लागली लिहायलात्यात विशेष काही सापडले नाहीपाल्हाळखरीदेशीपण नाही. नेमाडे ‘ देशी देशी’ करतात म्हणून .
पांडुरंगथोडेसे खरे बोललातमी म्हणालो होतो , " कादंबरी वाचायला मनुष्य एकतर बेकार पाहिजेकिंवा एकतर फार चिकाटीचा पाहिजे " ( कोसला , पृष्ठ २००)
मी : खरे आहे. मी सध्या अर्धा निवृत्त आहेफुकटचा वेळही आहे .धंदा बंद करतो आहेवाचनाची वाईट सवय आहेवाचत असतो. माझा छंद आहेमध्ये सोडून दिला होता. खरे म्हणजे वेळच मिळत नसेमोठ्ठाली पुस्तके वाचायला. एवढे नावाजलेले लेखकत्यामुळे गेल्या महिनाभरात "कोसला"आणि "हिंदूदोन्ही अगदी चिकाटीने वाचल्याम्हणुन तर आपली भेट झाली.
पांडुरंगबरे झाले. आपली भेट झालीकशी काय वाटली माझी पुण्याच्या कॉलेजमध्ये केलेली भंकसगिरीतसे म्हणजे भंकसगिरीवरच ‘कोसला’ ही कादंबरी लिहिली आहे.
मी: नेमाडे एवढे भंपक असतील असे वाटले नव्हतेमला ह्या भंकसगिरीचा वैताग आला.
पांडुरंग: आपणच गाढवनेमलेली पुस्तकं भंपक असेनात काही पुस्तके पाहिल्याबरोबर कंटाळा यायचाहे खरे आहे .पण लेखकाबद्दल प्रेम वाटले पाहिजे असे कुठे आहे? मराठीत आणि इंग्रजीत सगळी पुस्तके आम्हाला आवडतील अशी कुठून असायला गाढव. गाढव. गाढव. कोसला, पृष्ठ १९६)
मीमला वाटायला लागलं की मी खरोखरच गाढवनेमाड्यांची ही दोन्ही पुस्तके वाचायला घेतली आणी चिकाटीने वाचून काढलीखरच कंटाळा आलाअगदी कंटाळ्याचाही कंटाळा आला. मी वाचणारा गाढवगाढवआता लेखकाबद्दल प्रेम म्हणशील तर ते मात्र आहेनेमाड्यांचे विद्यार्थी त्यांचे खूप कौतुक करतातते इंग्रजी फार सुंदर शिकवतात असे ऐकले होते.
मला ही लेखक मंडळी खूप आवडतातविजय तेंडूलकर, चि .त्र्यं .खानोलकर,श्री.ना., तरुणपणी फडकेखांडेकरअत्रे , पु.., वा.., .., .पु,, श्री.पु., गो.पु., विंदा, कवी अनिल, कुसुमावती, इंदिरा संत ,विभावरी, जुने राम गणेश गडकरीखाडिलकर, य .दि., ग.दि., व दि.आणि हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर सुद्धा. तसे नेमाडे शिक्षक म्हणून एकदम ग्रेट.
पांडुरंग: फडके - खांडेकर ?
मी : अरे , त्या ना सी फडक्यांनी पुण्यातल्या लोकांना प्रेम करायला शिकवले. सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकवले. वि स खांडेकर मात्र खरे शाळा मास्तर. सुविचार दिले त्यांनी. " ध्येय म्हणजे पंख विना पाखरू", " यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजस्वी ठेवला पाहिजे." ध्येयवादी झालो आम्ही. आमचे शिक्षक मलाच फळ्यावर सुविचार लिहिण्यास सांगत असत. मी त्यामुळे खांडेकर वाचीत असे. 
नेमाड्यांचे हे कादंबरी लेखन. हे तर काय कोणीही लिहीनत्यात विशेष ते काय.कशाला लिहिली ही ६०० पानांची कादंबरी. बहुधा कागदाचा ताव स्वस्त मिळत असावा.
पांडुरंग: हे काय राव? तुम्ही माझीच वाक्ये बोलतातमाझा बराच परिणाम झालेला दिसतोय.
मी : अरे पांडुरंग मी तर लेखकाला मूर्खमूर्ख असे तर म्हणत नाहीतू किती वेळा किती जणांना मूर्ख म्हणालास. गाढव ही म्हणाला. मी मोजणेच सोडून दिले.
पांडुरंग कादंबरी वाचणे बंद केले पाहिजेवाट्टेल ते छापतात साले ! कोसला - डायरीची पाने, पृष्ठ १८१-१९७)
मी: मला ही  कोसला  वाचताना असेच वाटलेतसेच 'हिंदूम्हणजे नेमाड्यांचे मुक्त चिंतनह्या लेखकांच्या मनात काय वाट्टेल ते येतेतेच तर लिहून काढतातमी ही असे लिहून काढू शकतोपण ती 'प्रतिभा' आमच्यात आहे कुठे ? चला, एकदा ते 'प्रतिभा साधनवाचून बघतोएकदा मी मनात जे आले,ते लिहिले. बायकोने चुकून वाचले. 'डोकं बिघडल का?'  म्हणाली. सगळे कागद फाडून टाकले.
पांडुरंग: कविता म्हणजे काय हो ?
मी मान हलवली. त्याला वाटले मला काहीच कळत नसावे.
पांडुरंग: आता तुम्ही म्हणा कविता हे काय? इतराप्रमाणे लांब ओळी न लिहिता आखूड ओळीतून मांडलेली अक्षरे तीच कविता....पण हे उपदव्याप फारच थोडे लोक करीत. कारण एवढा वेळ कोणाला असतो ?  म्हणून शंभरातून एखादाही कवीचा उद्योग करीत नसे...... (पृष्ठ १३९)
मी : काय रे पांडुरंगकेशवसुत, गोविंदाग्रज, विंदा, मंगेश पाडगावकर ,बापटना .धो.महानोरआरती प्रभूअनिलहे सारे कवी रिकामटेकडे होते काकवितेच्या उद्योगातून त्यांना फारशी धनप्राप्ती झाली नाहीपरंतु त्यातील विंदा आणि कुसुमाग्रजांना मात्र ज्ञानपीठ पुरस्कार मिळालापाडगावकर तर "महाराष्ट्र भूषण ही झालेह्या कवीच्या नावाने सरकार 'मराठी दिवस'ही मोठ्या थाटात साजरा करतेतू काय हा अपमान करतोस, ह्या थोर कवींचा?
पांडुरंगतसे नाही. लायब्ररीत सगळा मराठी सेक्शन वाचला होता.
मी : ग्रेट
पांडुरंग: काही पुस्तकं अर्थात तशीच होती. म्हणून नुसती चाळली .पण प्रा.गुण्यानी ५० प्रसिद्ध व थोर पुस्तकांची यादी दिली होती. त्यातली ३० मी अगोदरच वाचली होतीबाकीची २० पुस्तकेही वाचली. गुणे 'शाब्बास म्हणाले.
मी:  छान. छान पांडुरंगतुझे वाचन दांडगेच आहेम्हणजे तुझ्या मानसपित्याने ही सारी पुस्तके वाचलेली असणारनाहीतर, हल्ली मराठी लेखक दुसर्या मराठी लेखकाचे काहीच वाचत नसतातफुकटचा वेळ नसतोइंग्रजी लेखक आवर्जून वाचतातत्याचा उपयोग होतो. लिहिण्यासाठी. 
पांडुरंग: साहित्यिक इतर सामान्य जनाहून थोर असतात.
मी: खरेच आहेपण खर सांगू का.हे मोठे मोठे साहित्यिक फार छोटी छोटी माणसे असतातआपल्याला वाटते ते खूप मोठे आहेततसे नसते.
पांडुरंग: अरे, हे लेखन म्हणजे " फुकट मेंदूत भंपक विचार "
मी: किती स्पष्ट बोलतोस रे पांडुरंगा मला ही तसेच वाटले,कोसलाआणि “ हिंदू वाचून.
पांडुरंग: प्रा गुणे मूर्ख आहेत. गोविंदा गाढव आहे.... (पृष्ठ १६४)
मी: काय रे पांडुरंगते एवढे मोठे मराठीचे प्राध्यापक आणि त्यांचा तो पीएच. डी. करणारा विद्यार्थी गाढवमग तूच कसा शहाणाहोतू तर नेमाड्यांचा मानसपुत्रत्यामुळे तू खरा शहाणा. विसरलोच मीतुझी ती नेमाडपंथी मंडळी ,सारेच शहाणे.
पांडुरंग: अरे तू तुकाराम वाचलास का ?
मी: अरे, किती सोपा आणि साधा. तुझे वडील तर वारकरी. 
पांडुरंगहो वाचला होता . ते ... तुझं बोलणं तुकारामाच्या भंपक मेणाहुनी मऊ ... वगैरे ( पृष्ठ २९)
मी : अरे तुझे एवढे वाचन झाले आहेतुकारामाचे अभंग तुला भंपक वाटतातपण खरे सांगू का नेमाड्यांचे हे लिखाणच फार भंपक आहेउगाच तुकारामापासून विन्दापर्यंत सर्वांच्यावर णसणाटी लिहितात.
पांडुरंग: चर्चा करावी ती डॉ गुणे ह्यांच्या बरोबरगुणे एकदा म्हणाले," कवी हा पिंडानेच लहरी माणूस. तो विंदा जरा स्त्रीचे नाव वाटते ,लोकांना सध्या कविता वाचण्याची गोडी प्राप्त करून द्यावी हे अशा नावाने साधतेआता पहा आरती ,ग्रेससरला....अशी नावें वाचून लोक कविता वाचतात. (पृष्ठ १५२)
मी : अगदी बरोबरम्हणूनच पर्वा कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार घेताना नेमाडे म्हणाले, " आता कादंबरी पुरेमी कविताच करणारतसा मी मोठा कवी आहेमी कविता केल्या होत्या. खरेंचं. नेमाडे, आधी स्त्रीलिंगी नांव शोधा ज्ञानपीठ पुरस्कार तुमचाचतसा कविता करण्याचा उद्योग चांगला आहेतुम्ही तसे लहरीही आहात, असे वाटते. कारण कवीला तसे असावे लागते, असे तुमचा पांडुरंग म्हणाला होता. प्रा. गुणेही तसेच म्हणाले होते. 
पांडुरंग: आता थोडे लघुकथेसंबंधी ,गुणे सर म्हणाले, " गंगाधर गाडगीळ मराठीतले थोर लघुकथाकार ... इंग्रजी कथाकारांच्या तोडीचे .....
मी : पांडुरंगनेमाडे कधी कधी तुझ्यात प्रवेश करतात तर कधी कधी ते प्राडॉ .गुणे होतात.
पांडुरंग: ..... अगोदरच लघुकथा हा क्षुद्र साहित्य प्रकार आहे. लघुकथा म्हणजे फसलेली गोष्ट. लघुकथा म्हणजे मासिक चालविणारे लिखाण. लघुकथा नसल्यातर कोण वाचेल मासिक.
डॉ. गुणे म्हणाले होते “ असे नाही पांडुरंगलघुकथेत जी तीव्रताजी सूक्ष्मता असते ती दुसर्या कशात नसते”. तेंव्हा मी म्हणालो  लघुकथा म्हणजे मासिक चालविणारे लिखाण ..... ह्या पलीकडे विशेष कांही नाही.... 
पांडुरंग: लघुकथा नसल्यावर मासिक कोण वाचेल?
मी : आता तर मासिकेच बंद पडलीतकाहीजण कादंबरीही छापत होते मासिकातून. मी त्या सुभाष भेंड्यांची अदेशी” कादंबरी वाचली होती. आठवते. चांगली होती. लघुकथा ही फसलेली गोष्ट असते हे माहीत नव्हते, आम्हाला ते पाच लघुकथाकारांचे पुस्तक होते. वामन चोरघडे, अरविंद गोखले वगैरे. चांगले कथाकार होते. त्यामुळे थोडी आवड निर्माण झाली होती. आता फक्त दिवाळी अंक हातात पडला आणि गोष्ट लघु असली तर वाचत असतो. आपल्याला फुकटचा वेळ नसतो. काय करणार. उगीच फसलेल्या गोष्टी कोण वाचणार?
कथा हा क्षुद्र प्रकार असल्यामुळेच नेमाड्यांनी लघुकथेला हा घातला नसावा. मला निश्चित माहीत नाही. त्यांची कथा असलेले मासिक मी पाहिले नाही. पण त्यांच्या कादंबरीतही चांगल्या लघुकथेत असणारी तीव्रतासूक्ष्मता दिसून आली नाहीबहुधा त्यांच्या कवितेत दिसेल.
पांडुरंग: आता थोडे विडंबण कवितेसंबंधी....... .
"एक मुतारी देईन आणून फुंकिल जी ....."
"उंदीर ओल्या पिपात मेले ......"
मी: छान छान ! केशवसुत, मर्ढेकर ह्यांच्या ह्या कविता दिसतात . ते केशवकुमार म्हणजे आचार्य अत्रे. त्यांची आठवण झाली. परंतु केशवकुमारासारखं लिहायला पाहिजे. काय भन्नाट माणूस होता. नेमाड्याना चांगले जमेल. त्यांना सार्या लेखक,कवींची व्यंगे माहीत आहेत. त्यांना टवाळी ही चांगली करता येते.  
पांडुरंग: ज्ञानेश्वरांच्या मनाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल.....कारण, ज्ञानेश्वरीत कवीचे मन नाही.
मी : बरोबर आहेज्ञानेश्वरांनी कविताही लिहिल्या त्यांची गाणी झाली. लता मंगेशकरांनी किती छान सादर केल्या त्या कविता नव्हे गाणी, आपल्याला त्यामुळे ज्ञानेश्वरांचे मन थोडेसे तरी कळले. मी काही ज्ञानेश्वरी वाचली नाही. मला ती प्राकृत भाषा समजत नाही. बी.ए. , एम.ए. ला ज्ञानेश्वरी असते. मी मराठी बारावीलाच सोडले. तुकाराम, रामदास तेवढे चांगले समजतात. 
पांडुरंग: कवितेत मानवी मनाचे सूक्ष्मात सूक्ष्म तरंग असतात .
मी: फार छानएकदम पदार्थ विज्ञानसूक्ष्म म्हणजे बारिकाहून बारीक कण तरंग म्हणजे व्वेव्ह. वलय.
एकदा कण तर एकदा तरंग दोन्ही एकाच वेळीGod Particle. पांडुरंग एकाच वेळी दोन रूपेकिती छान संकल्पनाDual Nature. ड्यूअल नेचर .कवी , कादंबरीकार असाच असतो. त्याची कितीतरी रूपे असतात. कधी पांडुरंग. कधी डॉ गुणे. त्यांचे मन सारखे बदलत असते. शास्त्रज्ञ मात्र तसे नसतात. त्यांना मन नसते. ते तरंगकण ह्यांचाच शोध घेतात. पण, ह्या एकाच वाक्यात जिंकले नेमाडे सरानी. सुंदर. असं सुंदर लिहित रहाकंटाळा येणार नाही माझ्यासारख्या वाचणाऱ्याला.
पांडुरंगज्ञानेश्वरीत मन नाही
मी: ज्ञानदेवांनी, विनोबांनी गीतेचा साधा, सरळ, सोपा अर्थ समजावून सांगितला. त्यात मन आहे ते श्रीकृष्णअर्जुनाचे. आपले मन कसे असेल. आपण साधी माणसे. शरीर थकते म्हणून मनही थकते.पैसा कमवायचा ,म्हणजे काम करायचे. आपण कष्टाळू माणसे. मन घरी ठेऊन कामावर जातो. आपल्याला कुठे असते मन. ज्ञानेश्वरांचे मन कसे शोधणार? एवढा फुकटचा वेळ आहे कुणाला?
पांडुरंगजाऊ द्या. टिळकांनी इतकी वर्षे कैदेत राहून काय लिहीलं तर गीतारहस्यहे पुस्तक वाचू वाचू म्हणता एक वर्ष लागलं .हे म्हातारपणात वाचायचं ,हे मात्र खरे नाहीपण इतकी वर्षे तुरुंगात टिळकांनी काय लिहिलं तर  गीतारहस्य .तर आगरकरांनी शेक्स्पीअरचे नाटक भाषांतरीत केलं. विकारविलसित”.तुम्ही गीतारहस्य वाचलं नसेल पण विकारविलसित वाचले असेल म्हणून तुलना केली...... ( पृष्ठ ४०)
मी: नेमाडे सरतुमचा खूप वाचन करणारा हा पांडुरंग आणि त्याचे प्राडॉ  गुणे दोघेही फारच भंकस चर्चा करतातम्हणजे तुम्ही त्या लिहितात कारण तुमच्या मेंदूत त्या शिरलेल्या असतातटिळक गीतारहस्य लिहिण्यासाठी मंडालेच्या तुरुंगात गेले नव्हतेइंग्रजांशी भांडले म्हणून इंग्रजांनी त्यांना ही शिक्षा केली. गीतारहस्य त्यांनी पुण्यात बसूनही लिहिले असतेकेसरी-मराठा नव्हते कां चालवतमला असे वाटते की तुम्हाला इंदिरा गांधीनी आणीबाणीत तुरुंगात घातले असते तर तुम्ही हिंदू सहा महिन्यात लिहून काढली असती३० वर्षे लागली नसतीआगरकरांचे म्हणाल तर त्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा फार चांगल्या येत होत्या. त्यांनी अगदी सहज शेक्सपिअरच्या नाटकाचे भाषांतर केलं असणार. जाऊ द्या. तुम्ही असेच लिहीत राहा. आम्हाला फुकटचा वेळ मिळाला की आम्ही वाचत जाऊ. तसे आम्ही रिकामटेकडे.
अधिक सकस लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा.
(संवादात पांडुरंगाची वाक्ये कोसलाकादंबरीतून घेतली आहेत. माझी प्रतिक्रिया पांडुरंगाची भाषा अवगत झाल्यामुळे तशीच झाली आहे. तो पांडुरंगाचा माझ्यावर पडलेला प्रभाव आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.)
डॉ नरेंद्र गंगाखेडकर 

No comments:

Post a Comment