Wednesday, June 10, 2020

उद्योजक आणि सत्ताधारी


उद्योगपतींना कोणताही पक्ष नसतो .त्यांना सर्व पक्ष सारखेच असतात . ते सत्तेवर असलेल्या  सर्व पक्षांना मदत करीत  असतात .
प्रत्येक उद्योगपतीकडे दोन तीन माणसे असतात  ज्यांची निरनिराळ्या पक्षातील प्रमुख  व्यक्तींशी चांगली ओळख असते . ते सत्तेत असलेल्या पक्षाकडे संपर्क साधतात आणि आपली कामे करून घेतात .
कॉंग्रेस सत्तेवर असली की एक अधिकारी संपर्क साधतो . जनता पक्ष सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . भाजप सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . सगळी कामे अगदी सहज होतात . असेच  एक  उद्योगपती . केंद्रात सरकार  बदलले की त्यांचा सीइओ  बदलत  असे.  कॉंग्रेसचा अर्थमंत्री  आला की  एक अधिकारी.  जनता  राजवटीत  एक अधिकारी.  मी  ह्या  अधिकार्यांना भेटलो आहे . राजवट बदलली  की  त्यांची इतरत्र बदली होत असे किंवा  काहीच  काम  नसे . उद्योगपतींना असे करावेच लागते . नाहीतर उद्योग बंद पडतील . त्यांना जात नसते ,धर्म नसतो .पक्ष नसतो . ते सर्व पक्षांचे मित्र असतात . ते साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सुद्धा जवळचे मित्र असतात .
तसे उद्योजकांना कोणताही पक्ष नसतो . तो अदानी असो का अंबानी, बजाज असो का डीएचलवाला, टाटा असो का बिर्ला. त्यांना त्याचे काही देणे- घेणे नसते. राजकीय नेत्यांना फक्त घेणे असते. उद्योजकांचा नाईलाज असतो. त्यांचे देणार्यांचे हात असतात. भिकारी असतात ते राजकीय नेते आणि चिरीमिरी घेणारे शासकीय कर्मचारी.

सिंपल सरल टॅक्स .
नो' गब्बर सिंग टॅक्स' .
राहुल गांधी ह्यांची ही कल्पना एकदम भन्नाट !
 सर्व वस्तूवर एकच टॅक्स .
अन्नपदार्थ असो का मर्सिडीझ गाडी .
काहीही विकत घ्या . एकच कर भरा .
सिंगापूरला गेल्यासारखे वाटेल .
राहुलजी एक मात्र करा .
त्या चिदंबरमला अर्थमंत्री करू नका .
 ते अर्थमंत्री होते तेंव्हा
त्यांनी करव्यवस्था इतकी किचकट केली होती की
काही विचारू नका .
त्यांना तुमचा 'सिंपल सरल टॅक्स'
एकदा समजावून सांगा.
आणि हो ते सॅम पित्रोडा .
ते म्हणाले की
मध्यमवर्गीय लोकांनी थोडा जास्त कर भरावा
 म्हणजे अतिगरिबांच्या खात्यात ६००० रुपये टाकता येतील . अहो , त्या अल्पमध्यमवर्गीय मंडळींना गरिबीरेषेच्या खाली  ढकलू  नका हो !
 ६० वर्षे लागली त्यांना गरिबीतून वर यायला .
पुन्हा गरिबीत ढकलू नका .
 त्यांच्या मुलांना मध्यमवर्गीय व्हायचंय
आणि नातवंडांना निओरिच व्हायचंय .
मग त्यांची फॅमिली श्रीमंत होईल.
 खूप मालमत्ता  जमेल .
नुसत्या भाड्यावर
करोडो रुपये मिळतील .
मग राजकारणात जाता येईल .
अशी पॉलिसी आणा की
 देशात मध्यमवर्गीय वाढत जातील .
अंबानींचे ठीक आहे हो !
धीरूभाई गब्बर झाले ते तुमच्या पक्षाच्या  राज्यात.
 तुमच्यामुळेच  .
आता सगळे  अंबानी  'ग्लोबल 'श्रीमंत झाले आहेत .

 त्यांचा धंदा भारतात नाही जमला तरी  वाढेल सगळ्या जगांत .
ते जातील जिथे कर काहीच नसतो त्या  देशात .
मग  त्यांच्या पैशावर तुम्ही कर लावून  गरिबांच्या खात्यात ६००० रुपये कसे भरणार ?
 ते भारतातील धंदा बंद करून' ग्लोबल 'कारखानदारी करतील .
गरीब बिचारे रोज बँकेत जातील.
 आणि आपल्या  खात्यात ६०००  रु . जमा झाले  आहेत का  ते पाहतील  .
 झाले असतील तर मोबाईलवर सिनेमा पहात बसतील . चायपर चर्चा करतील .
 राजकारणाच्या .

No comments:

Post a Comment