Tuesday, April 28, 2020

Hire ,Fire ,Moon ,Business and Politics

Hire , Fire and Resignation for better prospects

Once, I was traveling to USA with the Director of my company which is one of the leading companies of India. We were visiting a American technology company in which he had interest of collaboration or representation in India. During the conference meeting , he introduced me in a American way. He said," We have recently hired Dr Gangakhedkar for this project". I was young and surprised with the word "HIRE". I did not like the word as we generally use it for hiring taxi. Later on ,I realized that it is a common word used in USA.
After a few days , one of my co-worker left the company  and I was with the same boss and he reacted, " Doctor, I have fired him as he was not giving required results". I understood the meaning of "Hire and Fire" policy. After a few days, another co-worker left for the better prospects. The same boss gave me a reaction on my co-worker's leaving the company. He said," Dr. I do not care for anyone who leaves the company for better prospects .If some one gets the Moon, he should go. I will not stop him. I have no problem. I cannot offer him the Moon". I  understood the meaning of " Hire, Fire and Resignation for better prospects". That day , I decided that after gaining sufficient experience in industry , I will stop working for someone and will work for myself. I will be my Boss. There is nothing like working for yourself. It is a hard learning.

उद्योजक आणि सत्ताधारी

उद्योगपतींना कोणताही पक्ष नसतो .त्यांना सर्व पक्ष सारखेच असतात . ते सत्तेवर असलेल्या  सर्व पक्षांना मदत करीत  असतात .
प्रत्येक उद्योगपतीकडे दोन तीन माणसे असतात  ज्यांची निरनिराळ्या पक्षातील प्रमुख  व्यक्तींशी चांगली ओळख असते . ते सत्तेत असलेल्या पक्षाकडे संपर्क साधतात आणि आपली कामे करून घेतात .
कॉंग्रेस सत्तेवर असली की एक अधिकारी संपर्क साधतो . जनता पक्ष सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . भाजप सत्तेवर असला की एक अधिकारी संपर्क साधतो . सगळी कामे अगदी सहज होतात . असेच  एक  उद्योगपती . केंद्रात सरकार  बदलले की त्यांचा सीइओ  बदलत  असे.  कॉंग्रेसचा अर्थमंत्री  आला की  एक अधिकारी.  जनता  राजवटीत  एक अधिकारी.  मी  ह्या  अधिकार्यांना भेटलो आहे . राजवट बदलली  की  त्यांची इतरत्र बदली होत असे किंवा  काहीच  काम  नसे . उद्योगपतींना असे करावेच लागते . नाहीतर उद्योग बंद पडतील . त्यांना जात नसते ,धर्म नसतो .पक्ष नसतो . ते सर्व पक्षांचे मित्र असतात . ते साम्यवादी आणि समाजवादी पक्षाचे सुद्धा जवळचे मित्र असतात .

उद्योग आणि कामगार

काल चेन्नईला व्यावसायिक कामासाठी गेलो होतो .एका  कारखान्याला भेट दिली .दुपारी लंच मीटिंगमध्ये काही अधिकाऱ्यांशी इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या . विषय कामगारासंबंधी निघाला . तामिळनाडूत तामिळ कामगार किंवा  स्थानिक कामगार मिळत नाहीत, अशी माहिती मिळाली . मला थोडे आश्चर्य वाटले .असे कसे ? कामगारांमध्ये ओरिसा आणि  प .बंगालच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे .लक्षणीय आहे.तामिळ कामगार मिळत नाहीत . ते आळसी झाले आहेत .त्यांना काम करायचे नाही . २ रु किलो तांदूळ मिळतो .१० रुपयात अम्मा किचनमध्ये इडली - वडा खायला मिळतो . केंद्र आणि  राज्य सरकारच्या विविध सामाजिक योजना, मनरेगा वगैरे योजनात पैसे मिळतात . ते पुरतात . त्यांना कामगार म्हणून काम करायचेच नसते . नवीन शिकायचे नसते . यंत्र चालवायची नसतात . रात्रपाळी  करायची नसते . सरकारने दिलेल्या २ रु किलो तांदळावर त्यांचे भागते .असे हे स्थानिक कामगार . त्यांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या ऐवजी गरिबीतच ठेवणाऱ्या  सरकारच्या सामाजिक कल्याण योजना .शेतकऱ्यांच्या ७० / ४० हजार कोटीच्या कर्जमाफी योजना अशाच गरिबाला गरिबीत ठेवणाऱ्या . लोकांना काम नको आणि फुकटचे स्वस्त धान्य हवे . जी राज्ये अविकसित आहेत त्या राज्यातील लोक मात्र दुसऱ्या राज्यात जाऊन काम मिळवताना दिसतात . ज्या राज्यात विकासाची कामे चालू असतात तेथील स्थानिक लोक मात्र आळसी .काम  मिळत असूनही  काम न करणारे . महाराष्ट्रातही वेगळे चित्र नाही . अम्माच्या कृपेने  येथे दहा रुपयात जेवण मात्र मिळत नाही .२ रु किलो तांदूळही मिळत नाही . असे राजकीय नेते .गरिबीचे राजकारण करून स्वतः ची सत्ता टिकविणारे . लोकांना भिकेला लावणारे .लाचार बनविणारे .गुंड बनविणारे व त्यांचा उपयोग करून घेणारे .

सौदी  अरेबियातील भारतीय

हैद्राबादच्या हुसैन मध्ये दिसला जावेद अख्तर .
मी व्यवसायानिमित्त जगभर फिरलो . सर्वत्र तेथे स्थाईक झालेले किंवा पैसा मिळवण्यासाठी नोकरी करणारे भारतीय भेटले . २५- ३० वर्षापूर्वी गल्फ मधील देशाचे एव्हढे आकर्षण नव्हते . खनिज तेलामुळे समृद्धी आलेले हे इस्लामिक देश . ड्रायव्हर पासून कंपनी सी इ ओ पर्यंत माणसांची गरज . ज्यांना इंग्लंड - अमेरिका जमले नाही ते तेथे गेले . भरपूर पैसा कमवतात . अधून मधून भारतात कुटुंबाला भेटायला येतात . पैसा पाठवीत असतातच .गल्फ मध्ये फार उशिरा गेलो .
ह्या भारतीयामध्ये मुस्लिम तरुण खूप असतात . हैद्राबाद ,अलिगढ ,झारखंड ,केरळ ,तामिळनाडू ,प बंगाल आणि कश्मीर . सर्व प्रांताचे .
असाच एक तेथे १५ वर्षे वास्तव्य असणारा हैदराबादचा मुस्लिम भारतीय भेटला . त्याची बायको - मुले हैदराबादेत . मुलीला चांगले शिक्षण त्या देशात मिळणे शक्य नाही म्हणून बायको तेथे  त्याच्याबरोबर  राहू शकत नाही असा त्याचा प्रश्न . बोलता बोलता तो म्हणाला ,' सारे जहांसे अच्छा ,हिंदोस्ता हमारा .मी म्हातारपणी इथे राहणार नाही . थोडे दिवस नोकरी करून पैसे मिळवणार आहे . मला मरण भारतात हवे .माझी कबर भारतात हवी. त्या जमिनीत मला शांत  व्हायचंय  '.  मला त्याचे देशप्रेम त्याच्या शब्दात नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते . तो देशप्रेमी चेहरा मी कधीच विसरणार नाही .
इतरही तरुण मला भेटले . त्यांची घालमेल  दिसून आली . इतर देशात गेलं की आपण अधिकच देशप्रेमी होतो . मनात हैदराबादचा  ओवैसी आणि गल्फ मधला  हैद्रबाद्चाच हुसैन उभा राहतो तेव्हा मला हुसैन  मध्ये जावेद अख्तर दिसतो .
( १७ मार्च २०१६, माझे फेसबूक स्टेटस )

1 comment:

  1. Even when one carry on a business as an entrepreneur he or she will be guided by market forces like demand and supply in respect of technological changes and labour demands etc. In that sense no one remains a boss for ever. The situation being that of a dynamic one, the so called boss be on his or her guard always!

    ReplyDelete