Friday, December 13, 2019

लंबक कुठे झुकतोय ?



मकरंद जोशी ह्या सयोंजकानी दीपावली अंकात घडवून आणलेली चर्चा.  भारतीय आणि जागतिक - राजकारणाचा एकूण लंबक डावीकडून उजवीकडे झुकतोय असे जाणवल्यामुळे घडवून आणलेली चर्चा. सर्व लेखक डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले .उत्तम कांबळे ह्यांना समाज धर्माच्या नावाने हळवा बनत चालला आहे असे वाटते .त्यांनी आरक्षणावर खूप सडेतोड विचार मांडले आहेत . बाकीचे विचार फारसे पटणारे नाहीत . मी त्यांचे मार्क केलेले लिखाण अवश्य वाचा.
जयदेव डोळे ह्यांना मी ते तरुण असताना केलेल्या युक्रांद चळवळीपासून ते जर्न्यालिझमच्या प्राध्यापकी पर्यंत ओळखतो . डावे- समाजवादी कल असलेले. त्यांनी मोदींचा उदय कसा झाला ?,आणि आजचा मध्यमवर्ग त्यास कसा जबाबदार आहे? समाजवाद्यांची - डाव्या विचारसरणीची पीछेहाट होण्यास सुखवस्तू मध्यमवर्ग जबाबदार कसा जबाबदार आहे? ,  असा विचार मांडताना समाजवादी लोकांचे काय चुकत गेलं ह्याचा आढावा घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं . त्यामुळे त्यांचे मुद्दे पटत नाहीत.
हेमंत देसाई , पूर्वी मटाचे लेखक-पत्रकार . डाव्या विचारसरणीचे . जगभराच्या राजकारणाचा धांडोळा घेतलाय .अति डावे - अति उजवे ह्याबद्दल लिहिलंय . कम्युनिस्ट राजवटीत हुकूमशहा कसे झालेत आणि त्यांनी मार्क्सला कसं मागे टाकलं , ह्या बद्दल लिहिलं असतं तर...!  कम्युनिझम जगातून कसा नाहीसा झाला ?,हे न सांगता उजव्यांना ठोकून काढण्यात लेखाची लांबी वाढवली . डावे किंवा समाजवादी कुठे चुकतात हे न सांगता उजव्यांना ठोकण्यात अर्थ तो काय?  कंबोडियाची कम्युनिस्ट हुकूमशाही राजवट , सोव्हिएत युनियनचे विघटन , चीनच्या  माओनंतर आजचा नवा भांडवली माओ , व्हिएतनाम मध्ये होत असलेले बदल आणि भारतात निष्प्रभ झालेली कम्युनिस्ट चळवळ ह्याचा कुठेच उल्लेख नाही . त्यामुळे लेख प्रभावी झाला नाही.
अच्युत गोडबोले तरुणपणी कम्युनिस्ट होते . नंतर आयटीत सीईओ होते. मोदी सरकारच्या तीन वर्षाचा आढावा घेताना त्यांच्यातील डावी विचारसरणी जागी झाली आणि त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर टीकात्मक लिहिलं. राजकारणावर त्यांनी खूप दिवसांनी लिहिलं असावं.
विश्वास पाठक हेच एक उजव्या राजकारणाचे प्रतिनिधी . त्यांनी भाजपचा बाजूने लिहिणे स्वाभाविकच आहे. काही ठोस मुद्दे मांडायला ते विसरले नाहीत. रवी आमले उदारमतवादी शहाणीव ह्याबद्दल लिहिताना उजव्यांना ठोकत होते.
पाठक सोडले तर सगळे डाव्या- समाजवादी वृत्तीचे . ह्या पुरोगामी - समाजवादी लेखकांना - डाव्या विचारसरणीचे लोक आणि पक्ष का मागे पडत आहेत? ,  त्यांचे कुठे चुकत आहे?, उजवे का सबल होत आहेत ?, व काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस का येत नाहीत ?, किंवा चांगला पर्याय का उभा राहात नाही?, ह्या विषयाचे चिंतन कोणीही केलेले नाही. ह्यावर चर्चा व्हावी हे नक्की. झापड लावून लिहिल्यामुळे मुद्दे पटत नाहीत.
काही लेखांचे मुद्दे सोबत जोडतो आहे.

Saturday, October 19, 2019

तिरू कोनेश्वरम


तिरू कोनेश्वरम , श्रीलंका 

श्रीलंकेच्या दौर्यावर होतो . कोलंबोला उतरलो .तेथून  १६२ मैलावर असलेल्या त्रिंकोमाली  ( गोकर्ण ) ह्या शहराकडे निघालो . रस्ता सुंदर होता . हिरवागार निसर्ग होता . पहिल्याच प्रवासात श्रीलंका खूप आवडले.

कोलोंबोचा समुद्र किनारा  

श्रीलंका म्हणजे लंकाधिपती रावणाचे एकेकाळचे राज्य . मुख्य रामायण  येथेच घडले . रावण हा श्रीलंकेत व्यापारी  म्हणून आला .म तो सुरवातीला चांचेगिरी करीत असे . नंतर आयात-निर्यात  व्यापार करू लागला आणि एक दिवस येथील राजा झाला. व्यापार करण्यासाठी येथे आला आणि प्रथम स्थाईक  झाला ते गोकर्ण ह्या नैसर्गिक बंदर असलेल्या शहरात. गोकर्णचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे . सोनेरी वाळूचा हा निसर्गरम्य किनारा. सुनील नभ हे , सुंदर नभ हे ...., सुनील सागर , सुंदर सागर.... असेच ह्वया किनार्याचे वर्णन करता येईल . संध्याकाळी ह्या शहरात पोहोचलो . अतिशय सुंदर अशा रिसोर्टमध्ये मुक्काम केला. संध्याकाळ फार  मजेत गेली . दुसरेदिवशी पासून भ्रमंती सुरु होणार होती, रामायण जेथे  जेथे घडले त्या त्या ठिकाणी भटकून येण्याचे ठरविले होते. गोकर्ण हे पहिले ठिकाण.
सुनील नभ हे , सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा
सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची अहा 
दुसरे दिवशी सकाळी निघालो . आम्ही प्रथम निघालो सिगीरीयाकडे ( सिंहगिरी ).  कुबेराची  ही राजधानी . तो येथील मोठा आयात - निर्यात करणारा मोठा  व्यापारी . तो नंतर येथील राजा झाला . सिगीरीयात  एका उंच डोंगरावर त्याने स्वतः चा महाल उभा केला होता  . तेथे त्या  उंच पाषाणावरील महालात जाणे तसे फारच कठीण .

सिगीरीया 
 रावण सुरवातीला येथे कधीच आला नव्हता. त्याचा व्यापार गोकर्णहून चालत असे . मग  तो कुबेराचा  उजवा हात झाला आणि एक दिवस तो त्याचा सैन्यप्रमुख  झाला . त्याच्या मेघदूत ह्या  पंतप्रधानाला कटकारस्थान करून मारल्यानंतर कुबेराचाच पंतप्रधान झाला आणि काही वर्षांनी  त्याचेच  राज्य ताब्यात घेतले . आमच्या गाईडने आमची गाडी मध्येच एका ठिकाणी थांबवली . ते होते तिरू कोनेश्वरम देऊळ  . ऋषी  विश्वामित्रांचा आश्रम येथेच होता . अगस्ती ऋषींनी हे देऊळ बांधले होते . प्रभू रामचंद्राने येथेच  भगवान शंकराची पूजा केली होती आणि  रावणवध करण्याची  शपथ घेतली होती ,असे म्हणतात.
सिगीरीया महालाकडे जाणारा रस्ता 
विश्वामित्राचे वास्तव्य कोनेश्वर मंदिरातच असे . ते भगवान रुद्राचे पूजक होते . हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे . हे पुराणकालीन मंदिर खूपच  देखणे आहे. समुद्रकिनारीच असलेले हे मंदिर म्हणजे एक  पुराणकालीन ठेवा आहे . बंगालच्या  उपसागराच्या नयनमनोहर लाटा वेगाने येऊन त्या मंदिराच्या भिंतीवर आदळत असतात . आजूबाजूला दाट जंगल आहे .येथे  वन्यपशू मुक्तपणे फिरतात . हरिणे खूप दिसतात.
पुराणकालीन कोनेश्वर मंदिर 
ह्या मंदिराबद्दल तशा  खूप कथा प्रचलित  आहेत . अशीच एक कथा ...आपल्याला  खूप काही सांगून जाणारी .. मला आवडलेली ... रामायण घडविणाऱ्या विश्वामित्रांची .....
कोनेश्वर मंदिर
कैकेसी ही रावणाची आई .ती रुद्रभक्त .ती गोकर्णला मुलाकडे रहात होती.  तिला विश्वामित्रांना भेटायचे होते .अशीच एका दिवशी कुंभकर्ण ह्या आपल्या धाकट्या मुलाला घेऊन ती कोनेश्वरला आली. त्या मंदिरातील धर्मशाळेत ती उतरली . तिचे पती ऋषी  विश्रवा ह्यांच्या आश्रमात ती विश्वामित्रांना २ वर्षापूर्वी  भेटली होती . अरीष्ट्नेमी हा त्यांचा उजवा हात होता .तिची आणि अरीष्ट्नेमीची चांगलीच ओळख होती. ती त्याला भाऊच मानीत असे . तिने अरीष्ट्नेमिला विश्वामित्रांची  भेट घडवून आण अशी कळकळीची विनंती केली. अरीष्ट्नेमीने तिला थोडे  बसण्यास सांगितले आणि तो  ऋषी विश्वामित्रांच्या कुटीत  गेला . त्यां दोघांचे बोलणे चालू होते . ते बोलणे  कैकेसिला  बाहेर ऐकू येत होते .विश्वामित्र कोणालाही भेटण्याच्या मन:स्थितीत नव्हते . त्यांना कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती . कैकेसीला थोडा अंदाज आला . ती कुंभकर्णाला घेऊन सरळ  त्यांच्या कुटीत  गेली आणि विश्वामित्रांच्या पुढे उभी राहिली.
नंदीची भव्य मूर्ती 

विशावामित्रांचे लक्ष तिच्याकडे गेले . त्यांच्या लगेच लक्षात आले की ही तर विश्रवा ऋषींची पत्नी . त्यांच्या हे ही लक्षात आले की त्यांच्या आजोबाच्या  एका शिष्याची ती  नात आहे . तिला पाहून त्यांची थोडी चिडचिड झाली . त्यांच्या  काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या . ते लगेच म्हणाले , ' हे बघ कैकेसी , तुझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर आम्हाला खूप त्रास दिला आहे . मला त्या जुन्या गोष्टी आठवून खूप त्रास होतो आहे . तुला भेटावे असे मला वाटत नाही.'.
हिंदी महासागर- बंगालचा उप्म्हसागर  

कैकेसी थोडी हिरमुसली . त्याच वेळी छोटा कुंभकर्ण चुळबुळ करीत होता . तो ६ वर्षांचा होता पण दिसायला  मोठा वाटत होता . थोडा कुरूप होता . त्याचे  केस लांब वाढलेले व अस्ताव्यस्त  . त्याच्या खांद्यावर अजून दोन हात आलेले . काही  जखमांचे व्रण दिसत होते . त्याचे  कान ही आकाराने  खूपच मोठे आणि विचित्र आकाराचे होते  . तो नागा आहे असे लोक म्हणत होते . तो  आर्य वाटत नव्हता . दिसायला अगदी वेगळा आणि कुरूप . त्याचे ते वेगळे दिसणे विश्वामित्रांच्या लक्षात आले . विश्वामित्र हे तसे  सुऱ्हदयी होते . ज्यांना काही व्यंग असते त्यांच्याबद्दल त्यांना विशेष  सहानुभूती असे. ते कैकेसीकडे पाहून उद्गारले ,' किती गोड आहे हा मुलगा !'  माता  कैकेसी थोडीशी आनंदली आणि म्हणाली , ' हो ! माझा कुंभ गोडच आहे !' . विश्वामित्रांनी कुंभकर्णाला जवळ घेतलं , कुंभकर्ण थोडासा  ओशाळला. कैकेसीला थोडा आनंद झाला, विश्वामित्रांनी कुंभकर्णाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला  प्रेमाने जवळ घेतलं  आणि ते त्याच्याकडे बघून  थोडेसे हसले . त्यांच्यासमोर लाडवाचे ताट होते . त्यातील एक लाडू त्यांनी कुंभकर्णाला दिला . त्याला लाडू आवडतच होता , त्याने एका दमात अधाशासारखा तो लाडू खाऊन टाकला . विश्वामित्रांना त्याने  दुसरा लाडू मागून घेतला आणि तोही  एका दमात  फस्त केला  . कैकेसीला  आपल्या मुलाचा हा  हावरटपणा आवडला नाही .
मंदिराच्या आजुबाहुला दाट जंगल - हरणाचा कळप 
कैकेसी उभी राहिली आणि विश्वामित्रांच्या पाया पडू लागली . ती  ऋषींना म्हणाली , ' हे ऋषी , माझ्या ह्या मुलाकडे बघा . त्याचे हे जास्तीचे आलेले दोन हात  , हे     मोठे आणि विचित्र आकाराचे  कान आणि ह्या त्याच्या  चिघळलेल्या जखमा.  ही कसली व्याधी झाली आहे ह्याला . हे कशामुळे होते  ? त्याच्यावर एखादा उपाय सांगा ना ! मी त्यासाठीच तुमच्याकडे आले आहे .' 
विश्वामित्र कैकेसीकडे पाहून म्हणाले ,' हे असेच असतं . हे एक  व्यंग आहे . काही लोकांना अशी अनैसर्गिक वाढ होत असते . त्यावर उपाय असा काहीच  नाही. तो  नागा आहे . जर त्याला रक्तस्त्राव झाला आणि वेदना झाल्या तर त्याचा मृत्यू जवळ येईल .'

कैकेसी घाबरून गेली . ती म्हणाली ,' तुम्ही तर आयुर्वेद तज्ञ आहात , काहीतरी उपाय सांगा '. विश्वामित्र तिला म्हणाले ,' ह्यावर काहीही  उपाय नाही . तरीही मी एक औषधी देतो . त्यामुळे त्याच्या वेदना थांबतील . रक्तस्त्राव थांबेल आणि त्याचे आयुष्य वाढेल . त्या औषधाचे नांव आहे   अगस्त्यकुटम . विश्वामित्रांनी अरीष्ट्नेमिला हांक मारली आणि ती औषधी  कैकेसिला देण्यास सांगितली. कैकेसी खूप आनंदली. तिच्या डोळ्यात पाणी आलं . ती नमस्कार करताना त्यांना म्हणाली , ' माझा मोठा मुलगाही असाच  नागा आहे . तो ही असाच दुर्दैवी आहे . त्यालाही  अशाच वेदना होत असतात . त्यालाही असेच वाढलेले अवयव आहेत '. विश्वामित्रांना त्यात  फारसे आश्चर्य वाटले नाही . त्यांना खरं म्हणजे हे आधीच  माहित होते . ते तिला म्हणाले , ' त्याचे नांव रावण आहे ना !  . तो मोठा चाचेगिरी करणारा खलाशी आहे  ना ! तो आयात - निर्यात व्यापार करतो . कुबेराचा तो उजवा हात आहे .  '
ती त्यांना म्हणाली , ' हो , ते खरे आहे , माझ्या पतीने तर मला सोडून दिले आहे .  तो तर परदेशी गेला आहे .मला सोडून दिले आहे . परदेशी  जाऊन त्यांनी तिकडे दुसरे लग्न केले आहे . मी ही अशी अभागी . आम्हो सध्या  वाईट परिस्थितीत दिवस काढतो आहोत . रावण खलाशी  आहे . त्याच्या २०० बोटी आहेत . तो आयात -निर्यात  करून पैसे मिळवतो. तो  दुसरे काय करणार ?  आम्हाला भरतवर्ष सोडून येथे  यावे लागले .तो स्वत:च्या हिंमतीवर व्यापार करतो'. विश्वामित्र तिला म्हणाले , ' काहीही काळजी करू नकोस . रावण खूप  हुशार आहे , मेहनती आहे , कार्यक्षम आहे , डोकेबाज आहे , बुध्दिमान आहे , योद्धा आहे .त्याचे स्वतः: चे असे  ध्येय आहे . तो त्याच्या  ध्येयासाठी लढतो आहे . तो ह्या भरतवर्षाचे  एक स्वप्न पूर्ण करणार आहे . ही माझी भविष्यवाणी आहे . तू काळजी करु नकोस . मी त्याच्यासाठीसुद्धा औषधी देतो '. कैकेसीच्या डोळ्यात पाणी आले . ती उठली . त्यांना नमस्कार करताना विश्वामित्रांनी तिच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला . ते तिला म्हणाले , ' हे सर्व कठीण आहे .तू  धीर धर . सर्व व्यवस्थित होईल . माझी औषधी लागू पडेल . त्या दोघांना  लवकर मरण येणार नाही '. 
कैकेसी कुंभकर्णाला घेऊन बाहेर पडली . अरीष्ट्नेमी विश्वमित्रांच्याकडे बघून म्हणाला ,'
गुरुवर्य , तुम्ही असे का केले ? रावणाला अशी औषधी  का दिली ? तो तर राक्षसी आहे ? तो क्रूर आहे . तो  आता अधिक क्रूर होणार !' 
विश्वामित्र त्याला म्हणाले  , ' हे वत्सा , तू  काही काळजी करू नकोस . प्रत्येकाचे एक आयुष्य असते . त्याचे एक जीवितकार्य असते . त्यासाठी परमेश्वराने त्याला येथे पाठविलेले असते . रावण हा एक शिवभक्त आहे . तो त्याचे परमेश्वराने दिलेले कार्य  पूर्ण करणार . तो आपल्या कामाला येणार आहे .  मला त्याचा उपयोग होणार आहे . काही  वर्षांनी एका नव्या विष्णूचा अवतार येणार आहे . त्याला दोन कार्ये   पूर्ण करावयाची आहेत . 
पहिले कार्य म्हणजे महादेवाला म्हणजे रुद्राला एक  मदतनीस हवा आहे . रावण हा रुद्राचा भक्त असेल . तो नष्ट करेल ह्या  जगातील दुष्टपणा .
दुसरे कार्य म्हणजे ह्या पृथ्वीवर एक  नवा विष्णू  अवतार जन्माला येणार आहे आणि त्यामुळे एक आदर्श राज्य निर्माण  होणार आहे . सूर - असुरांच्या युद्धात रावण उपयोगी पडणार आहे . तेच त्याचे जीवित कार्य आहे . तुला हे येत्या काळात दिसून येईल आणि मग मी हे का करीत आहे , हे समजेल . हा नियतीचा खेळ खेळण्यासाठीच मला ह्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे . मी माझे काम करीत आहे .रावणाचा जन्म हा शिवाच्या  मदतीसाठी आहे तर  सीता ही नवी विष्णू अवतार असेल  . ती एक भूमिकन्या असेल . ती  रावण जेंव्हा क्रूर होईल तेंव्हा त्याचा नाश करील आणि आपल्या पतीच्या मदतीने येथे रामराज्य निर्माण करीन. 
अरीष्ट्नेमी अचंबित झाला . त्याला विश्वामित्रांचे मन समजले . त्यांची चाल ही समजली . त्यांचे जीवित कार्य समजले . विश्वामित्र  म्हणूनच आर्यावर्त सोडून श्रीलंकेत  कोनेश्वरला  आले होते . नियतीनेच हे सर्व रचले होते.  असे हे तिरू  कोनेश्वर मंदिर  . विश्वामित्रांच्या पदकमलाने पवित्र झालेला हा परिसर . ते जणूकाही नवे विश्व निर्माते होते  .ते  रामराज्य निर्माते होते . ह्या  विश्वाचे ते खरे सूत्रधार . असे हे विश्वामित्र . रामायण घडले ते त्यांच्यामुळेच . ह्या नियतीचा  निर्माता म्हणजे विश्वामित्र . 

गोकर्ण 















Wednesday, September 4, 2019

I SALUTE MY TEACHERS

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

आज शिक्षक दिन . काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षक !

Today is a Teacher's Day in India . I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Dr N K Choudhuri, D.Sc.
My Research Guide 
 I cannot forget my teacher Dr N K Choudhuri . He was my Ph.D guide in physics at the University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the importance of perfection in science research . He told me that in science research , you have to have " non-compromising attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Tuesday, September 3, 2019

शिकणे आनंदाचे


Image may contain: one or more people and people sitting

संगणकीय प्रौढ शिक्षण वर्ग 

चाळीस तासांचा वर्ग !
भारतात ३५ कोटी लोक निरक्षर आहेत. त्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत निरक्षर प्रौढांना साक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाची गती खुंटण्याचं, गरिबीबरोबरच निरक्षरता हेही एक कारण आहे. १५ ते ३० वयोगटातील निरक्षर लोक शाळेत जाण्यासाठी तयार नसतात. वृद्धांना त्यांच्या मुला-मुलींकडून शिकायचे नसते. पोटापाण्यासाठी त्यांना छोटीमोठी कामे करावी लागतात. त्यातून त्यांना वेळ मिळू शकत नाही. आता ह्या वयात शिकून काय करायचे? - असा त्यांचा मूळ प्रश्न. एकदा वय वाढल्यानंतर साक्षर करणे फार कठीण असते. त्यांना विकासात सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना किमान लिहिणे-वाचणे आले पाहिजे. त्यांना सही करता आली पाहिजे. निरनिराळे फॉर्म भरता आले पाहिजेत. हिशोब समजला पाहिजे आणि किमान दोन अंकी आकडेमोड आली पाहिजे.
Image may contain: 2 people, people sitting
साक्षरतेसाठी नवे तंत्रज्ञान 
निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नवे डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. आता प्रौढ शिक्षण सहज शक्य आहे. या नव्या डिजिटल क्रांतीमुळे ४० तासात निरक्षर लोकांना साक्षर करणे सहज शक्य आहे. या,वर्गात बसा,टीव्ही पाहिल्यासारखे स्क्रीनवर बघा आणि हसत-खेळत शिका. टीव्हीवर जशी सिरीयल नेमाने बघतात, तसे हे ४०- ५० धडे नुसते मन लावून ऐका. ३०० ते ५०० शब्दांची ओळख होईल आणि हे निरक्षर लोक वर्तमानपत्र वाचू लागतील. हे शक्य झाले आहे. ह्या योजनेत २ लाख निरक्षर लोक साक्षर झाले आहेत.
Image may contain: 1 person, smiling, standing and indoor
डॉ नरेंद्र गंगाखेडकर  ह्या प्रकल्पाची माहिती देत आहेत . शेजारी आहेत  जॅकोब कोशी  रोटरी क्लब ऑफ मुंबई अंधेरीचे अध्यक्ष . ह्यांनी रोटरीच्या माध्यमातून साक्षरतेसाठी अशी ८ केंद्रे सुरु केली होती.
या साक्षरता अभियानासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसिएस)चे माजी संचालक फकीरचंद कोहली ह्यांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे एक योजना राबवली. प्रौढ शिक्षणतज्ञांचा सल्ला घेऊन एक अतिशय सोपी संगणकीय प्रणाली तयार केली. दृक्‍-श्राव्य तंत्र असल्यामुळे प्रौढ निरक्षर लोक ऐकत–पहात शिकतात. कोणत्याही शिक्षकाची गरज नसते. क्लिक करा आणि कार्यक्रम बघा. ऍनिमेशन तंत्र वापरून वर्गपाठ आखलेला असतो.
या प्रणालीमुळे रोज नवे शिकता येते. रोज थोडी-थोडी शब्दांची ओळख होत जाते. शिकण्याचा उत्साह वाढत जातो. रोज वर्गावर यावेसे वाटते. आधी शब्द समजू लागतात आणि मग अक्षरओळख होते. निरक्षर व्यक्तीला शब्द माहीत असतातच. त्यांना अक्षरओळख नसते. शब्दातून अक्षराकडे असा हा प्रवास आहे. शब्द ओळखू लागले की अक्षरांची ओळख होत जाते. रोज ३० शब्द समजतात. पाच शब्द एका मिनिटात लिहिता येतात. १ ते १०० आकडे मोजता-लिहिता येतात. तीन आकडी बेरीज–वजाबाकी करता येते. दोन आकडी गुणाकार-भागाकार करता येतो. असे हे सोपे तंत्रज्ञान आहे.
महाकालीच्या वृद्ध आजी आता नातवाबरोबर अभ्यास करू लागल्यात. बसचा नंबर, स्टेशन कोणते आले हे वाचून समजते, बँकेत सही करता येते आणि वर्तमानपत्रातील ठळक बातम्या सहज वाचता येतात याचा त्यांना अधिक आनंद आहे.
-डॉ नरेंद्र गंगाखेडकर , मुंबई
संपर्क: TCS Corporate Adult Literacy Program (ALP) Group Tata Consultancy Services Ltd. (022) 6778 9393, (022) 6778 9378 (Direct) Email: Corporate.CBFL@tcs.com Website: www.tcs.com/cs
पुर्व प्रसिद्धी 

SuperSchool :स. भू. शिक्षणसंस्थेचा नवा शैक्षणिक उपक्रम


SuperSchool - आहे काय ?
काल औरंगाबादेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या एका आगळ्यावेगळ्या शिक्षणउपक्रमाच्या समारंभाला गेलो होतो . उपक्रम होता' सुपर स्कूल ' च्या उदघाटनाचा . माझा मेव्हणा केदार देशपांडे ह्याने त्याच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'सुपर स्कूल 'साठी ६ पैकी एक अत्याधुनिक वर्ग उभारण्यासाठी देणगी दिली होती . त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्हांला आमंत्रित केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या अत्याधुनिक वर्गखोलीचे उदघाटन झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष वर्गात जाऊन बसलो आणि ह्या नव्या शैक्षणिक पद्धतीची थोडी ओळख झाली . नंतरच्या दिमाखदार समारंभात संस्थेचे अध्यक्ष राम भोगले ह्यांचे ह्याच उपक्रमाबद्दल खूप विस्ताराने सुरेख भाषण झाले .सध्या ६ वर्गखोल्यासाठी ६ देणगीदार संस्थेस मिळाले आहेत. पालक - शिक्षक खूप उत्साही आहेत . त्या समारंभाची काही क्षणचित्रे खाली देत आहे . 

केदार देशपांडे ह्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरस्वती भुवन प्रशाळेतील एक वर्गखोली देणगी देऊन अत्याधुनिक केली . 

SuperSchool  मधील हा अत्याधुनिक वर्ग 
Superschool 
महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ह्या सरकारी संस्थेने विद्यार्थ्यांना सुपर परफॉर्मर होण्यासाठी आखलेला हा नवा शिक्षण उपक्रम .
हसत खेळत शिका . 
कंटाळा आलेल्या मुलांना अभ्यासात रस निर्माण करणारा हा शिक्षण प्रयोग . 
शिक्षकांना शिकविण्यासाठी उपलब्ध असलेले डिजिटल तंत्रज्ञान . डिजिटल नेटिंग असलेला विद्यार्थी अवघड संकल्पना सहज आत्मसात करू शकेल असा हा एक शिक्षण प्रयोग .
E-Learning शिक्षण प्रणाली .
भाषा - गणित - विज्ञान - समाजशास्त्र ह्या सर्वच विषयातील अवघड संकल्पना सोप्या करून सांगतणारा व रुची निर्माण करणारा संगणक असलेला सहशिक्षक .
शिक्षक - विद्यार्थी संवाद ,
विद्यार्थी - विद्यार्थी चर्चा घडवून आणणारा संवादक , 
प्रतिक्रिया देऊन मनोगत व्यक्त करण्याची सोय ,
विद्यार्थ्यांची आकलनक्षमता किती आहे ह्याचे शिक्षकांना सहज लक्षात आणून देण्याची सोय असलेले संगणकीय संख्याशास्त्र . शिक्षक - विद्यार्थी ह्यांचा आनंदी सहभाग .
दर १० मिनिटांनी शिक्षकाला सहज उपलब्ध होणारा वर्गखोलीचा रिपोर्ट - 
आपण शिकविलेले किती विद्यार्थ्यांना नीट कळले आहे ते समजणारे नवे तंत्र .
गृहपाठ - वर्गपाठ - मूल्यमापन ह्याची उत्तम सोय असलेला हा एकत्रित डिजिटल पाठ्यक्रम .
सध्यां ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध.

MKCL प्रशिक्षित शिक्षिका , लॅपटॉप . MKCL शेक्षणिक सॉफ्टवेअर , प्रोजेक्टर , वायफाय ,
प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक सिमकार्ड नसलेले आयपॅड ( कॅमेरा , ब्लु टूथ ,अँड्रॉइड ,माईक उपलब्ध ), शिक्षक-विद्यार्थी संवाद उपलब्ध  

MKCL Superschool
काय हवे ह्या वर्गात :
शिक्षक - प्रशिक्षित
लॅपटॉप
वायफाय
प्रत्येक विद्यार्थ्याला हवा एक मोबाईल किंवा आयपॅड - त्यात कॅमेरा ,माईक ,ब्लूटूथ ,स्पिकर ,अँड्रॉइड असणे
आवश्यक. सिम कार्ड - Deactivated - नो फेसबुक , कोणतेही इतर अँप्लिकेशन नाही . ते नाहीतच . त्यामुळे कोणताही गैरवापर होणार नाही.
MKCL Superschool software
शिक्षकाला विद्यार्थी काय करतो ,कसा वापरतो हे सहज समजते .
( See MKCL Website for Demo - Video )
हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. MKCL च्या शास्त्रज्ञ - तंत्रज्ञ मंडळीचे मनापासून अभिनंदन.

लोकसहभाग हवा असा हा एक शैक्षणिक उपक्रम आहे.

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष SuperSchool ची संकल्पना मांडताना 
राम भोगले ह्यांनी त्यांच्या सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेसाठी हा शिक्षणउपक्रम अतिशय जोमाने सुरु केला असून त्याला उत्तम प्रतिसाद दिसून येतो आहे . ही नवी शिक्षणक्रांती असेल .

केदार देशपांडे ह्यांना ह्या  शिक्षणक्रमाला  देणगी देऊन जी अत्याधुनिक वर्ग खोली उभी राहिली त्याबद्दल झालेला आनंद .     

Saturday, August 10, 2019

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून...

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

Friday, August 2, 2019

A SHORT WALK IN HINDUKUSH


गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया .

इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .