Tuesday, November 18, 2025

 Climbing a Mountain

I have read a number of books written by Ranjit Kulkarni, “A bend in the Road” was inspired by a Road Trip. “Potpourri” was a short story book with many interesting characters you see and we could see many restless minds in his book “Melange”. I found his recent book “Climbing a mountain” very interesting. I have been to the Himalayas many times. But I am not a trekker. Ranjit’s experience of trekking is very interesting because he meets many co-trekkers. Each one is a different human being. You meet in this book many characters such as Rohan, Anjaneya, Kimberley, Sandip, Ramnath, Hari, Binita, Narendra, Eleanor and Margaret, Akanksha, Arjun. These Characters are mainly trekkers. But they are different human beings. Their attitudes towards life are quite different from each other. But their adventure is the same. That is trekking in the Himalayas. Ranjit has been to the Himalayas many times. He and his co-trekkers faced many challenges. This book has become interesting because of their experiences.

Ranjit’s friend Hemant Soreng climbed to the top of the mountain Sagarmatha, Chomolungma (The mother of Goddess of the Sky). During climbing this mountain, He saw:

-          Death staring at him in the face of every moment,

-          He saw accidents of nature which are a way of life for trekker,

-          He met many extra ordinary people during the memorable trek,

-          His journey was of spirit, courage and perseverance.

I liked many characters mentioned above. Their attitude towards life is different but as a trekker they are more or less same. I am impressed by these characters from this book.

Sandip, a trekker who was at 26,000+ feet close, remembered his mother who was a very practical woman and helped him to go on trekking and keep calm. Sandip was shocked when his tour leader Dorje Sherpa told him about the death of a Ugandan climber. He was also shocked when Dorje mentioned the death of a British Climber near the balcony. These events make you restless while climbing a mountain. Trekking becomes very difficult when they are focusing on the final stretch. They are more worried about ensuring their oxygen mask and cylinders. Their shoes, crampons, harness are very important to them when the summit is very close. As such short distances always take more time to climb when the summit is very close. Luck plays a very important role and well wishes from mother felt important. Of course, co-trekkers and tour guide Dorje Sherpa played an important role. One should not have any negative thoughts coming to mind. It is very dangerous. He saw one of his friend trekkers lose his sight during climbing due to lack of enough oxygen. Of course such difficulties are unpredictable. Only Tour Guide like Dorje Sherpa will be helpful during the climbing. He could hear the blessing of his mother, “Now go and climb that mountain”. He did achieve his target of reaching the summit.

In his story, “Peace and Noise”, we read about the interesting character Ramnath. We meet such people in our regular life. But Ramnath is not a good companion when you go trekking. We know Ramnath when we hear his behavior when he talks to his talkative driver Hari. Hari, though talkative, is a good driver as he knows what to see on the way to the summit. Hari was explaining to him in detail what to see on their way. He was mentioning him about DEV Prayag, Alaknanda, Bhagirathi, RudraPrayag, JoshiMath and Auli. Ramnath just did not hear him properly and he was more worried about a luxury resort with many amenities. Even he neglected his suggestion of Gondola ride or a village walk. He was just busy fiddling with his phone and Kindle. He could not find the peace he was searching for. As such he was not a good trekker. Such characters are not to be selected for trekking. When he was returning home, he told Hari, he will come again and Hari should show him all those places.

“Secret in Mountains” is a very interesting story about Village girl Binita and her mother Kamala. Binita changed her name to Jeevan when she became a trekker woman. She always looked at jagged peaks of the Himalayas. Accidentally when she met Narendra, tour leader, he gave her the job of accompanying two foreign ladies Eleanor and Margaret for carrying their luggage. Her forbidden dream of seeing the mountain was automatically fulfilled. She remembered the words of her mother Ama – “Girls don’t go to mountains and stay at home”. Margareta told Jeevan that the mountains don’t care who you are. Jeevan realized that by accompanying Eleanor and Margaret, she understood the secret of climbing a mountain.

The Story “A Burden off the Shoulder” is about a man named Vivaan who was fed up with his routine life. His attitude was different for fixing his priority, time and relationship. He had different views on earning money, doing a job and finding a friend. He knows that life is short and it will end anytime. He was staying near a beautiful village on the hills where trekkers and Kedarnath pilgrims stay. He was very happy in the village due to the silence of the valley and chirping of the birds. He wanted to go to Chandrashila peak to see the panoramic views of the Himalayas. His tour guide introduced him to Dachen who will take him to Tungnath temple of Chandrashila. Dachen goes on this way frequently. He was from Nepal and not from Garhwal. Dachen is not only a helping man for trekking. But he was really a good trekking guide. Dachen told him that people of the mountains have a lot of faith in deity. One should visit temples in the mountains.

“A NEW SUMMIT” is a very interesting story of Akanksha who was in the Himalayas for trekking. She was an orphan girl. Her father and mother died in an accident. At the age of 20, Akanksha left her home for freedom. She took a Bus heading to the mountains and landed in Sankri, Uttarkashi which is a starting point of many Himalayan treks. She accidentally met a group of trekkers and the group leader thought that she was a solo trekker. She requested the group leader and joined his group which had 4 men and 3 women members. She had no money but she was good at taking pictures and writing captions. Tour leader asked her to join as a photographer for his travel company. After a one hour journey they had a stop where a bunch of tents were installed. She was given a sleeping bag and her tent partner was Meera who was almost like her mother’s age. She was very friendly. She briefed her about her past life and her strict stepparents. She did mention her dreams of independence and her wish of taking a job in the city.

Arjun, team leader, was impressed by Akanksha and asked her to lead the group. She did it with full confidence. They reached the summit and saw the breathtaking panoramic view of the mountains. She has proven to herself and to others that she was capable. She was a dreamer and a fighter. Now, she was a woman with dreams, determination and courage to make life reality.

This book explains to you how trekking makes you a dreamer and how your courage and determinations become strong. One should start trekking at a young age and visit the Himalayas very often.

_____    

--
Dr Narendra S Gangakhedar
C 402, Dipti Greens, Chakala,
Andheri East ,Mumbai 400099
Mobile 9820082487

Wednesday, July 23, 2025

चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे ...


नाटककार मितभाषी असला तरी तो संवादी लेखक असतो. नट हा व्यक्त होणारा संवादी असतो. प्रेक्षक हा मन लावून बघणारा श्रोता असतो. दिग्दर्शक हा सतत संपर्क, चर्चा आणि भावना  व्यक्त करणारा असतो. तो नाटककारांशी, नटाशी आणि रंगभूमी तंत्रज्ञाशी चर्चा करीत असतो. चंद्रकांत कुलकर्णी हा एक असा दिग्दर्शक आहे की जो बोलण्यातून व्यक्त होत असतो. तो नाटककार, नट संच आणि रंगभूमी तंत्रज्ञाशी ह्या पुस्तकातून बोलताना आपणास दिसतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व नाटकांचा इतिहास ह्या पुस्तकात आहे. त्यांनी वेळोवेळी केलेल्या चर्चांचे हे पुस्तक आहे. ८३हून अधिक नाटकांचे ते दिग्दर्शक आहेत. ते सतत चर्चा करतात नाटकासंबंधी. त्या आपण वाचत असतो ह्या पुस्तकातून. त्यांनी कलाकारांबरोबर केलेल्या अर्थपूर्ण चर्चा जसे आपण वाचत जातो तसेच तंत्रज्ञाबरोबरच्या अनेक गोष्टी आपल्याला नवीनवी माहिती देत जातात . त्यांनी प्रायोगिक व व्यावसायिक ह्या दोन्ही रंगभूमीवर काम केलेलं आहे. 

चंद्रकांत हे आमच्या औरंगाबादचे. मी १९६६ साली औरंगाबाद सोडलं. त्यांनीं १९६६ ते १९७६ या काळातच नाट्य क्षेत्रात सुरवातीची काही वर्षे औरंगाबादमध्ये घालविली. ते मुळचे परभणीचे. पाथ्री जवळच्या हमदापुर गावचे. कोरडवाहू शेती करणार्या एका शेतकर्यांचा चंद्रकांत हा मुलगा आहे. त्यांच्या आईने परभणी सोडून औरंगाबादला येण्याचा निर्णय घेतला. अतिशय कष्टमय दिवसांचा तो काळ होता. त्यावेळच्या औरंगाबादचे त्यांनी जे वर्णन ह्या पुस्तकात केले आहे, ते वाचताना मला आमचे औरंगाबादचे दिवस आठवत होते. कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांचे ते जगणे आम्हीही  जगलो होतो. त्याचीच आठवण मला होत गेली. मुख्य म्हणजे सुपारी मारुती जवळच्या नगारखाना गल्लीचा ते उल्लेख करतात. त्याच गल्लीतील मुळे मास्तरच्या वाड्यात आम्ही रहात होतो. गुलमंडी, गुजराती शाळा, पैठण गेट परिसर, औरंगपुरा आणि मराठवाडा विद्यापीठ याचे जे वर्णन त्यांनी केलं आहे ते तंतोतंत बरोबर आहे. 

मी  १९६८ला औरंगाबाद सोडलं होतं आणि त्यानंतरच  मराठवाडा विद्यापीठात नाट्य विभाग सुरू झाला होता. चंद्रकांत हे तेथील नाट्य पदवीधर. त्यांनी लक्ष्मण देशपांडे ह्यांचा विशेष उल्लेख केला आहे.  लक्ष्मण हे माझे मित्र. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे. आम्ही औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी. लक्ष्मण देशपांडे तेथूनच पदवीधर झाले. शिकतांना ते नाटकांत चमकू लागले. विद्यापीठात  नाट्यशास्त्र विभागात ते प्राध्यापक होते. चंद्रकांत आणि त्याचे इतर मित्र मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातूनच पदवीधर झाले.   

बाबा दळवी औरंगाबादच्या 'मराठवाडा' दैनिकात अनंत भालेराव यांचे सहकारी होते. मी बाबा दळवी यांना चांगले ओळखत असे. मला त्यांनी चांगले लिहिते केले. माझे लिखाण 'मराठवाड्या'त प्रसिद्ध होत असे. मी त्यांना अनेकदा भेटलो आहे.अजित आणि प्रशांत दळवी ही त्यांची दोन मुलं. अजित हा लेखक आणि प्राध्यापक तर प्रशांत हा नाटककार आणि रंगकर्मी. चंद्रकांत हा दोन्ही दळवी बंधूचा जिगरी दोस्त. ते समवयस्क आणि नाटक वेडे.  माझा चंद्रकांत आणि दळवी बंधू यांच्याशी कधीच संपर्क नव्हता. मी त्या काळात औरंगाबाद सोडले होते. त्यांची औरंगाबादची नाट्य कारकीर्द सुरू झाली होती. मुंबईत त्यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर मी त्यांची १५च्यावर नाटकं बघितली असतील. दीनानाथ आणि शिवाजी मंदिरला मी चंद्रकांतला अनेकदा बघितलं आहे. पण ओळख अशी करून घेतली नाही. मी तसा एक प्रेक्षक. नाटक पहायला जाणारा.

चंद्रकांत हा औरंगाबादच्या ज्ञानविज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्याने पुस्तकात प्रा. वसंत कुंभोजकरांचा विशेष उल्लेख केला आहे. ते माझे ही शिक्षक आणि प्राध्यापक. मी १९६३-६६ मध्ये त्याच  महाविद्यालयात होतो. मी विज्ञानाचा विद्यार्थी. अभ्यासक्रमात मराठी ही माझी दुसरी भाषा. त्यावेळी मराठीचे प्रसिद्ध साहित्यिक मा.गो.देशमुख आमचे प्राचार्य होते. भगवंत देशमुख, गो.मा.पवार आणि वसंत कुंभोजकर ह्यांनी त्यावेळी महाविद्यालयाचा मराठी विभाग गाजवला होता. भगवंतराव नंतर कोल्हापूरला बदलून गेले. गो मा पवार आणि वसंत कुंभोजकर आम्हाला मराठी शिकवीत असत.  त्यावेळी विद्यापीठात मराठी विभाग नव्याने सुरू झाला होता. प्रसिद्ध समीक्षक म्हणून नावाजलेले मुंबईचे वा.ल.कुलकर्णी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते. त्याच वेळी विनोदी लेखक द.मा.मिरासदार हे औरंगाबादचे देवगिरी कॉलेज गाजवित होते. मला ते दिवस आजही आठवतात.

चंद्रकांत यांना वसंत कुंभोजकर सरांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यावयास लावला. त्यांनी त्याला खूप प्रोत्साहन दिले व त्यांनी अनेक स्पर्धातून बक्षिसे मिळविली. त्याबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे मला ही अशीच आठवण झाली.  मलाही कुंभोजकर सरांनी प्रसिद्ध अशा रानडे वादविवाद स्पर्धेत भाग घ्यावयास लावला होता. त्यांनी मला विशेष मार्गदर्शन केले होते. मी त्या स्पर्धेत मराठवाडा विभागात दुसरे पारितोषिक मिळविले होते. त्यावेळी ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि शिक्षक इतके नावाजलेले होते की मी विज्ञान सोडून मराठी भाषेचा विद्यार्थी झालो असतो तर कदाचित मराठी साहित्यात अधिक रमलोही असतो.

चंद्रकांत यांनी कमलाकर सोनटक्के यांचा विशेष उल्लेख केला आहे. तो महत्वाचा आहे. मराठवाड्याचा नाट्यक्षेत्रातला तो पहिला प्राध्यापक. नाट्य विभाग सुरू झाला तो त्याच्या प्रयत्नांमुळेच. लक्ष्मण देशपांडे आणि कमलाकर सोनटक्के हे मराठवाड्याचे नाट्यऋषी. त्यांच्यासारखे लोक विद्यापीठाच्या नाट्यविभागात होते. त्यामुळेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारखे दिग्दर्शक आज पुढे आले आहेत.

चंद्रकांत हा प्रशांत दळवी आणि अजित दळवी यांचा मित्र. सुरवातीला 'जिगिषा' ही नाट्यसंस्था उभारुन चंद्रकांत, दळवी बंधू आणि त्यांच्या मित्रांनी औरंगाबादच्या वातावरणात खूप मोठा बदल घडवून आणला. त्याच मित्र - मैत्रीणी हयानी औरंगाबाद सोडून मुंबईला येण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.  आणि नंतरच्या  ४-५ वर्षातच मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांचा गेल्या ३५-४० वर्षातील नाट्यप्रवास जवळून पहावयाचा असेल तर चंद्रकांत कुलकर्णी यांचे हे पुस्तक अवश्य वाचा.

नाट्यशास्त्राचा पदवीधर असलेला आणि २० नाटकं दिग्दर्शित करणारा चंद्रकांत कुलकर्णी मुंबईत आल्यानंतर सर्व प्रथम भेटला तो व्यावसायिक रंगभूमीच्या मोहन वाघ यांना. त्यांनी त्याची नेमणूक केली ती दिग्दर्शन सहाय्यक म्हणून. 'रमले मी!' हे प्र.ल. मयेकर यांचे नाटक चंद्रकांत यांनी दिग्दर्शित केलं. संजय मोने, वंदना गुप्ते हे प्रमुख कलाकार या नाटकात होते. त्या प्रयोगानंतर चंद्रकांत कुलकर्णी यांची चढती भाजणी सुरूच  झाली आणि त्यांनी त्या नंतर ८०-९०नाटकं रंगभूमीवर आणली. 'रंग उमलत्या मनाचे' हे वसंत कानेटकर यांचे पहिले नाटक मोहन वाघांनी चंद्रलेखातर्फे सादर केलं. त्यांचे दिग्दर्शक होते चंद्रकांत कुलकर्णी. त्यात प्रदीप वेलणकर, वंदना गुप्ते हे कलावंत होते. ह्या नाटकाने रंगभूमी वरील वातावरण अक्षरशः दणाणून गेलं. नंतर गाजलं ते 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' . या नाटकात कलाकार होते सुहास जोशी, मोहन गोखले आणि सुनील शेंडे. या नाटकाच्या प्रेमात पडला महेश मांजरेकर. त्यानंतर महेश मांजरेकर यांची नाटके चंद्रकांत कुलकर्णी यांना दिग्ददर्शनाला मिळत गेली. 

१९८४ मध्ये त्यांचे 'चारचौघी' गाजलं. त्यात कलाकार होते दीपा श्रीराम, आसावरी जोशी, वंदना गुप्ते आणि प्रतीक्षा लोणकर. आजही या नाटकाने नाट्य क्षेत्रात अनेक विक्रम मोडले आहेत. त्या नाटकातील कलाकार आहेत रोहिणी हट्टगंडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे आणि मुक्ता बर्वे. मी ह्या नाटकांचा हाऊसफुल्ल प्रयोग बघितला होता. चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले हे एक अप्रतिम नाटक. या आशयप्रधान नाटकाची पाठराखण करणार्या महाराष्ट्रातील सजग, सुजाण, सुबुद्ध आणि असामान्य प्रेक्षकांना हे नाटक अर्पण केलेलं  आहे असं नाटकाच्या पुस्तक प्रस्तावनेत लिहिलं आहे. हे विशेष. असं हे अविस्मरणीय नाटक.

मी पाहिलेली चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकं:

* चारचौघी - प्रशांत दळवी
* वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार
* मग्न तळ्याकाठी - महेश एलकुंचवार
* गांधी विरुद्ध गांधी - अजित दळवी
* हमिदाबाईची कोठी - अनिल बर्वे
* हसवाफसवी - दिलीप प्रभावळकर
* हॅम्लेट- शेक्सपिअर - जिगीषा
* संज्याछाया - प्रशांत दळवी - जिगीषा
* नियम व अटी लागू - संकर्षण कर्हाडे

दिग्दर्शक म्हणून वाटचाल करताना चंद्रकांत यांनी जमविलेले हे अनुभवाचे गाठोडं खूप मोलाचं आहे. ह्या पुस्तकात हे गाठोडे मोकळं सोडलं असल्यामुळे आपण हा नाट्यप्रवास त्यांच्या बरोबर करीत राहतो व पडद्यामागचे त्यांचे नाट्य अनुभव ऐकत राहतो. 'जिगीषा' ही औरंगाबादची नाट्यसंस्था मोठी होत गेली ती चंद्रकांत कुलकर्णी आणि दळवी बंधू यांच्या मुळेच. मुंबईला ही मराठवाडी मंडळी आली. सुरवातीला दूरदर्शनचे बातमीदार प्रदीप भिडे यांच्या मैत्रीमुळे ती येथे छान स्थिरावली. हे नमूद केले आहे चंद्रकांत कुलकर्णी यांनी. 

त्यांना ह्या पुढील नाट्य कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !

*****

Tuesday, July 22, 2025

ऐवज: अमोल पालेकर


मी १९६६ मध्ये बीएआरसी मधील एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईत आलो. त्यानंतर युडीसीटीमध्ये पदार्थविज्ञान शास्रात पीएच.डी.साठी रिसर्च फेलो म्हणून निवडला गेलो. तेथील वसतीगृहात रहात होतो. औरंगाबादच्या वातावरणातून मुंबईत आल्यावर नाटक-सिनेमा हाच एक माझा विरंगुळा होता. मी वसतीगृहात नसलो की माझा पत्ता होता 'शिवाजी मंदिर किंवा तेजपाल सभागृह' असा होता, असे माझे मित्र म्हणत असत. प्रायोगिक रंगभूमीवरची नाटकं जशी बघत असे तसेच व्यावसायिक रंगभूमीवरची नाटकं बघणं हा माझा छंद होता. त्यावेळी प्रायोगिक रंगभूमीवर विजय तेंडुलकर आणि व्यावसायिक रंगभूमीवर वसंत कानेटकर हे आघाडीचे नाटककार होते. सध्या मी 'ऐवज' हे अमोल पालेकर यांचे पुस्तक वाचत होतो आणि त्यानंतर वाचायला घेतलं 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे..' हे पुस्तक. त्या बद्दल नंतर लिहिन.

'गिधाडे,अवध्य, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल', ही अमोल पालेकर हे प्रमुख नट असलेली नाटकं मी तेजपालला पाहिली होती. त्यावेळी सत्यदेव दुबे यांचे प्रायोगिक रंगभूमीवर फार मोठे प्रस्थ होते. हा माणूस म्हणजे एक अक्राळविक्राळ दोन हात करणारा दिग्दर्शक, असे वर्णन अमोल पालेकर यांनी 'ऐवज'मध्ये केलं आहे, ते तंतोतंत बरोबर आहे. तेजपाल सभागृहामध्ये ७०० सीट आहेत, पण त्यावेळी दुबे यांच्या प्रयोगिक नाटकांना केवळ ८-१० प्रेक्षक असत. त्यात मी ही असे. याउलट शिवाजी मंदिरात होणाऱ्या नाटकाला तिकीट मिळणे कठीण असे.
इंडियन नॅशनल थिएटर, रंगायन, आविष्कार, पुण्याचे पीडीए यांच्यापेक्षा दुबेचें 'थिएटर युनिट' अधिक प्रसिद्ध होते. मला आठवतो तो १९६८चा सत्यदेव दुबे दिग्दर्शित 'आधे अधुरे' हा प्रयोग. मोहन राकेश हे नाटककार त्या नाटकामुळे खूप गाजले. अमरीश पुरी, ज्योत्स्ना कार्येकर, भक्ती बर्वे, दीपा बसरूर आणि अमोल पालेकर हे कलाकार त्या नाटकात होते. अमरीश पुरी ह्या कलाकाराची भूमिका मला 'अप्रतिम नाट्याभिनय' म्हणून आजही आठवते. अमोल पालेकर यांचे बादल सरकार यांच्या 'पगला घोडा' तील काम मला आजही आठवते. १९७०चा तो प्रयोग उल्लेखनीय होता. अमोल पालेकर नंतर दिग्दर्शक म्हणून नावाजला तो मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांच्या मुळे. १९७६मध्ये अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले उल्लेखनीय नाटक होतं महेश एलकुंचवार यांचे 'पार्टी' हे नाटक. महेश एलकुंचवार हे माझे आवडते नाटककार. विजय तेंडुलकर ह्या ख्यातनाम नाटककाराची नंतर माझी छान ओळख झाली. पार्ल्याच्या माझ्या कार्यालयात ते अनेकदा आले. मी ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. नागपूरला मी गेलो होतो तेंव्हा महेश एलकुंचवार यांना मुद्दाम भेटलो होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. चि त्र्यं खानोलकर यांचे 'अवध्य' हे सुंदर नाटक. पण आरती प्रभूंच्या हळूवार कविता मला अधिक आवडत असत. तेजपाल मध्ये 'अवध्य'च्या प्रयोगाला त्यांना जवळून बघितलं. छबिलदास मध्ये त्यांना काही वेळा बघितल्याचे आठवते.
डॉ. लागू यांची प्रमुख भूमिका असलेलं  'काचेचा चंद्र' हे नाटक शिवाजी मंदिर मध्ये बघितल़ेलं आठवतं. व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेलं ते प्रायोगिक वळणाचं नाटक.
अमोल पालेकर हा नट, दिग्दर्शक म्हणून गाजत होता तो प्रायोगिक रंगभूमीवर. तेंडुलकर, खानोलकर, गिरीश कर्नाड, सई परांजपे हे नाटककार, डॉ लागू, अरविंद आणि सुलभा देशपांडे, दीना पाठक, तरला मेहता, पर्ल पदमसी या कलाकारांच्या सहवासात तो समांतर चळवळीत पुढे आला आणि चमकला. ,'ऐवज' मध्ये त्याने ह्या सर्वांच्या बद्दल खूप मनमोकळेपणाने लिहिले आहे.
रंगभूमीवर काम करणारा अमोल पालेकर रुपेरी पडद्यावर गाजू लागला तो त्याच्या साध्या दिसण्यामुळे. 'बॉय नेक्स्ट डोअर' असणारा हा साधा, लोभस, अडखळणारा मुलगा चित्रपट जगतात गाजू लागला. १९७८-७९ मध्ये त्यांचे रजनीगंधा, छोटीसी बात, चित्तचोर हे चित्रपट हिट झाले. १९९०मध्ये संध्या गोखले ही चुणचुणीत मुलगी त्याच्या आयुष्यात आली. वकीली करणारी ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली. त्यावेळी तो चित्रपट दिग्दर्शित करीत होता. 'कैरी' ची कथा तिला आवडली होती. तो दिग्दर्शक झाला तेंव्हा तिने त्याला एक वकीली सल्ला दिला होता तो असा.' दिग्दर्शक म्हणून काम स्वीकारताना एकतर्फी अटी मान्य करू नका'. अमोल पालेकर तिच्यात भावनिक गूंतत गेला आणि एक दिवस संध्याने चित्राची जागा घेतली. हे 'ऐवज' मध्ये त्याने विस्ताराने लिहिले आहे. 
चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात फार छान लिहिले आहे. नाटककार आकृती देतो, दिग्दर्शक प्रकृती देतो, नट कृती देतो, तंत्रज्ञ अलंकृती देतो, तेंव्हा प्रेक्षक स्वीकृती देतो. अमोल पालेकर हा एक यशस्वी नट आणि दिग्दर्शक. त्याला प्रेक्षकांनी स्वीकृती तर दिली. 'आक्रीत'  त्याने दिग्दर्शित केला. तो यशस्वी झाला. त्याची पटकथा लिहिली होती विजय तेंडुलकर यांनी . मानवत खून खटल्यावर अमोल पालेकर यांनी चित्रपट काढला. ती पटकथा लिहिली होती  तेंडुलकर यांनी. दुबे यांच्यामुळेच अमोल पालेकर पुढे आला. दुबे मुळेच त्याची ओळख झाली मराठी नाटककार तेंडुलकर, खानोलकर आणि चेतन दातार यांच्याशी. अमरीश पुरी हा कलाकार शोधून काढला होता तो दुबेनीच. अमोल पालेकरला नट बनविले ते सत्यदेव दुबे हयानीच. 'Boy next door',असलेला अमोल पालेकर मधील नट शोधला तो दुबेंनीच. सत्यदेव दुबे जेव्हा अंथरुणावर खिळून पडले होते तेंव्हा त्यांना भेटायला अमोल पालेकर गेला होता, तेंव्हा तो त्यांना  म्हणाला, 'मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही दुबे' .
अशा अमोल पालेकर यांचे आत्मचरित्रात्मक असलेलं 'ऐवज' हे पुस्तक वाचनीय तर आहेच. ते मराठी प्रायोगिक रंगभूमी व चित्रपट याचा इतिहास आहे. या पुस्तकाचे कुशल संपादन झाले असते व पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी झाली असती तर ते अधिक वाचनीय झाले असते, असे मला वाटते. मी एकाच बैठकीत ते वाचू शकलो नाही. मला हे पुस्तक वाचायला ८-१० दिवस लागले.  

*****
 

Thursday, October 3, 2024

Crossing to Talikota: Girish Karnad

विजयनगरचे साम्राज्य 

गिरीश कर्नाड यांचे खिळवून ठेवणारे इंग्रजी नाटक “Crossing to Talikota” – हे पुस्तक हाती पडले आणि एका दमात वाचून काढले. माझा नातू पार्थ कुलकर्णी याने ते पुस्तक वाचायला दिले. “ आजोबा, तुम्हाला हे नाटक आवडेल. मी त्या नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला आहे. मला तो आवडला म्हणून मी हे पुस्तक विकत घेतले. तुम्हाला आवडेल. अवश्य वाचा.”, असे त्याने जोरात संगितले व पुस्तक देऊन गेला. मी पूर्वी त्याच्याशी बोलतांना विजय तेंडुलकर आणि गिरीश कर्नाड यांच्या नाटकासंबंधी  अनेकदा बोललो होतो. ते त्याच्या लक्षात असावे. मागच्या वर्षीच तो इंग्लंड मध्ये LSE ला शिक्षणासाठी गेला होता तेव्हा त्याने  तेथून जवळच असलेल्या नाट्यगृहातील अनेक नाटके पाहिली होती. त्यामुळे त्याची नाट्यजगताची जाण खूप वाढली होती. त्याने त्यामुळे हे नाट्य पुस्तक वाचायला दिले.

गिरीश कर्नाड हे माझे आवडते नाटककार. हयवदन हे त्यांचे गाजलेले नाटक मी पाहिले होते. मुंबईच्या प्रयोगिक रंगभूमीवर तेंडुलकर आणि कर्नाड यांची नाटके खूप गाजत होती. त्यावेळी तेंडुलकर-कर्नाड या दोन नाटककारांनी  राष्ट्रीय नाट्यक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली होती.

धारवाडच्या विद्यापीठातून कर्नाड हे गणित विषयात पदवीधर झाले. त्यांना Rhodes Scholarship मिळाली व ते Oxford ला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले. तत्वज्ञान, अर्थशास्त्र व राजकारण हे त्यांचे आवडते विषय. ते पुढे जर नाटककार झाले नसते तर एक गणितज्ञ किंवा अर्थशात्रज्ञ झाले असते. त्यांना त्याचवेळी होमी भाभा शिष्यवृत्ती मिळाली व त्याच वेळी त्यांनी प्रकल्प संशोधनासाठी हयवदन हे नाटक लिहून काढले. ते प्रसिद्ध नाटककार म्हणून कन्नड रंगभूमीवर गाजू लागले. ते नुसते नाटककार नव्हते तर चांगले नट होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी कानडी भाषेला व रंगभूमीला समृद्ध केले. त्याचमुळे Film and Television Institute of India आणि संगीत नाटक अकादमी या संस्था त्यांच्या अधिकाराखाली आल्या व त्यांनी आपला राष्ट्रीय ठसा उमटविला. लंडनच्या भारतीय वकिलातीच्या नेहरू सेंटर मधील त्यांचे कार्य लक्षवेधी होते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात ते नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच वेळी नागमंडल हे त्यांचे नाटक खूप प्रसिद्ध झाले. त्या नाटकाच सुंदर प्रयोग मी मुंबईत पाहिला होता. The Dream of Tipu Sultan  हे नाटक ही खूप गाजले.

तालिकोटाची लढाई म्हणजे विजयनगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी यवनांनी केलेले महायुद्ध. ज्यांनी हम्पी बघितले आहे त्यांना ह्या युद्धाची कल्पना येईल. कृष्णदेवरायाच्या काळात हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. आज आपण हम्पीला भेट देतो तेंव्हा आपल्याला कल्पना येते की विजयनगरची राजधानी असलेले हे शहर खूप सुंदर शहर होते. चालुक्क्यांनी दक्षिण भारतात आपले प्रस्थ निर्माण केले होते. विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे यवनांनी रचले होते. आदिलशाही, कुतुबशाही व निझामशाहीच्या राज्यकर्त्यांनी विजयनगरचे साम्राज्य धुळीला मिळवण्यासाठी एकी केली होती. त्यासाठीच तालिकोटाची लढाई झाली. ह्यावर लिहिलेले हे नाटक. तसं हे नाटकाचे पुस्तक ७६ पानाचे आहे. कर्नाड यांनी हे अतिशय सोप्या व सुंदर भाषेत लिहिलेले नाटक वाचतांना आपण विजयनगरचे साम्राज्य यवनांनी कसे धुळीस मिळविले हे समजून घेतो.

नाटक बघणे आणि वाचणे यात खूप फरक आहे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि समोर हम्पीचा तो परिसर आठवू लागलो. मी हम्पीला दोन वेळा भेट दिली असल्यामुळे मला विजयनगरच्या साम्राज्याची व त्या इतिहासाची थोडीशी माहिती आहे. हे पुस्तक वाचत गेलो आणि हे नाट्यवाचन  करीत असताना त्या काळात रमत गेलो. ते एक युद्धं होते व त्या काळातील विजयनगरची लढाई कशी झाली असेल व हम्पी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर त्या वेळी कसा असेल? तो उज्वल इतिहास कसा नष्ट झाला असेल हे चित्र समोर उभे रहात होते. आज हम्पीचे जे अवशेष दिसतात त्यावरुन त्या सुंदर राजधानी असलेल्या शहराची कल्पना येते. मन उद्विग्न होते व विजयनगरच्या त्या काळातील वैभवाची कल्पना येते.

गिरीष कर्नाड यांनी नाटकातील संवादातून उभे केलेले चित्र त्यावेळच्या राजकारणाची माहिती देत असते व ती व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

विजापूरचा अली आदिल शहा, अहमदनगरचा हुसेन निझाम शहा, बिदरचा अली बरीद शहा आणि गोलकोंड्याचा इब्राहीम कुतुबशहा या चार यवनी सत्ता एकत्र येवून विजयनगरचे साम्राज्य कसे उद्ध्वस्त करतात आणि विजयनगरचा आलिया रामराया कसा मारला जातो हे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. त्यावेळी सेनापति असलेले वेंकटाद्री आणि तिरूमला राया हे राजाचे धाकटे बंधू युद्ध कसे हरतात ते दिसून येते. मुख्य म्हणजे विजयनगरचा सम्राट सदाशिव राया हा एक काठपुतळी राजा (पपेट सम्राट) असतो. रामरायाची आई तिरूमलांबा आणि पत्नी सत्यभामा ह्या दोघी स्त्रिया त्यावेळच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावताना दिसतात. यवनी सत्तेतही हुसेन निझाम शहाची पत्नी बेगम हुमायून सुलताना ही राजकारणात तरबेज असते व प्रमुख भूमिका बजावत असते. ह्या नाटकात वरील पात्रामध्ये होणारे संवाद आपल्याला त्यावेळच्या युद्ध परिस्थितीची ओळख करून देतात. कर्नाड यांनी या पात्रांच्या होणार्‍या संवादातून आपल्यापुढे त्यावेळचे युद्ध उभे केले आहे. त्यात त्यांचे यश दिसून येते. चित्रपटात तसे करणे सहज शक्य असते. रंगभूमीवर युद्ध कसे सादर करणार ?

ह्या नाटकातील संवाद लक्षवेधी तर आहेतच. या संवादातूनच आपणास त्यावेळच्या यवनी सत्तेची कारस्थाने आणि हिंदू राजांच्या मनोवृत्तीचे दर्शन होत जाते. तेथे कर्नाड यशस्वी झाले आहेत.

ह्या नाटकाचा पहिला प्रवेश थोडासा कंटाळवाणा वाटतो व नाटक पुढे  वाचावे की नाही असा प्रश्न मला पडला. ह्या प्रवेशात आपणा समोर येतात ते दोन शिपाई आणि युद्धमुळे गर्भगळीत झालेले दोन सामान्य लोक. त्याच वेळी घरात लपून बसलेली एक स्त्री रणरागिणी होते व त्या दोन शिपायांचे मुंडके उडविते.

विजापूरच्या अली आदिल शहाला हिंदू राजांच्या बरोबर युद्ध नको असते. व तो प्रत्यक्ष युद्धात भाग ही घेत नाही. शेवटी नाईलाजाने अहमद नगरच्या निझाम शहा, बिदरचा बरीद शहा व गोळकोंड्याचा कुतुबशहा यांच्या युतीत तो सामील होतो. विजयनगरच्या राम रायाची विजापूरच्या अली आदिल शहा बरोबर चांगली मैत्री असते. राम रायाला फारसे अधिकार नसतात. कारण तो विजयनगरचा वंशज नसतो. ती एक शोकांतिका असते.

तिरूमला राया आणि सत्यभामा यांच्यातील संवाद विजयनगरच्या राजघराण्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करतात. सदाशिव राया हा पपेट सम्राट असतो तर राम राया वंशज नसल्यामुळे राजा होऊ शकत नाही. सत्यभामा ही वंशज असली तरी मुलगी असल्यामुळे राज सिंहासनावर हक्क सांगू शकत नाही व तिचा नवरा राम राया राजा होऊ शकत नाही. आदिल शहा व राम राया यांच्यातील संवाद अनेक गोषतीचा उलगडा करतात पण सत्यभामाला राजकारणाची जी जाण आहे ती राम रायाला नाही. ती त्याला पटवून देण्यात मात्र यशस्वी होते. अहमदनगरच्या निझामाची बेगम ही सूदधा राजकारणात  पारंगत असते. पण निझाम शहा तिच्या शब्दाला किंमत देत नाही. स्त्रियांना राजकारणातील काय कळते ? असा त्याचा विचार असतो. असे असून सूदधा विजापूरच्या अली आदिल शहाला जवळ करण्यासाठी निझाम शहाची बेगम आपली मुलगी चांदबिबी हिला आदिल शहा ला देण्याचा विचार मांडते व तिची खेळी यशस्वी होते व आदिल शहा हा शहा गटात सामील होतो. ती राजकीय खेळी यशस्वी होते.

एका प्रवेशात राम राया, वेंकटाद्री आणि तिरूमला राया यांची बोलणी चालू असतात. तो संवाद कृष्णदेव रायाच्या शत्रूंची माहिती देत असतो. परंतु राजाने राम रायालाच कसे दू:खी केले याची चर्चा करतो. चालुक्य युगात बदल घडवून आणण्यासाठी राम राया त्याच्या हालचाली सुरू करून स्वता:कडे साम्राज्याच्या किल्ल्या कशा राहतील याचीच कारस्थाने करताना  

दिसतो. एका प्रवेशात बरीद शहा, निझाम शहा, आदिल शहा आणि कुतुब शहा यांच्यातील संवाद खूप महत्वाचे आहेत. तेथेच विजयनगरच्या साम्राज्याला खाली खेचण्यासाठी युद्धनीती तयार होते. हा नाट्यप्रवेश अतिशय महत्वाचा आहे. राजकारणाची कूटनीती कशी असते वा असावी हे आपल्यासमोर येते.

आदिल शहा कॅम्प व निझाम शहा कॅम्प मध्ये काय ठरते हे संवडातून उभे करताना विजय नगरचे साम्राज्य लवकरच नष्ट होणार याची जाणीव आपल्याला होते. नाटककाराने हे चांगले उभे केले आहे.

शेवटच्या प्रवेशात रूमी खान राम रायाचे मुंडके कसे उडवितो व विजयनगरचे साम्राज्य यवनाच्याकडे कसे जाते हे चित्रित केले आहे.

विजयनगरचा अस्त कसा होतो यावर आधारलेले हे नाटक म्हणजे तालिकोटची लढाई. Ruthless Ambition, Cast and Religious Conflict, Family Intrigue and Betrayal  म्हणजेच तालिकोटची लढाई – विजयनगर साम्राज्याचा अस्त. कृष्ण देव रायाचा जावई  असलेला राम राया हा विजयनगरचा सम्राट होऊ शकला नाही. तो खरा राजकारण धुरंधर होता. त्याने विजयनगर वर आपली सत्ता गाजवली पण तो लोकांचा राजा झाला नाही. तो अप्रियच होता कारण त्याच्या रक्तात राजघराण्याचे रक्त नव्हते.

या नाटकात गिरीश कर्नाड यांनी उभी केलेली ही व्यक्तीचित्रे सुंदर आहेत. विजयनगर साम्राज्याचा तो वैभवकालीन इतिहास त्यांनी सुंदर पद्धतीने सादर केला आहे. त्यामुळे हे नाटक प्रभावी झाले आहे. त्या वैभवशाली इतिहासाला त्यांनी रंगभूमीवर त्यांच्या शब्द सामर्थ्याने उभे केले आहे. असेहे प्रभावी नाटक. नाट्यप्रयोग देखणा झाला असेलच.

*****


Saturday, September 14, 2024

गीतारहस्य

 लोकमान्य टिळकांचे “गीतारहस्य”

गजानन महाराजांचा आशीर्वाद


गणेशदादा खापर्डे हे अमरावतीचे बडे गृहस्थ. त्यांना लोक अनभिषिक्त राजाच समजत असत. त्यांची इंग्रजांच्या काळातील भारताच्या स्वातंत्र्याची व नव्या राष्ट्रनिर्मितीची तळमळ भारतीय लोकांनी ओळखली होती. त्यांच्यावर लोकांचे अलोट प्रेम होते. लोकांचा खूप लोभ होता. ह्या खापर्डे साहेबावर संत गजानन महाराजांचा वर्दहस्त होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यात अपयश कधीच आले नव्हते. खापर्डे ह्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खापर्डे यांच्यामुळेच टिळक आणि गजानन महाराज यांची नुसती ओळखच झाली नाही तर त्यांनी टिळकावर कृपाप्रसाद केला. त्यांना आशीर्वाद दिला. ज्या प्रमाणे भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवदगीतेचा उपदेश केला व त्या गीतेमुळे जगाला थक्क करून सोडले, तसेच कार्य टिळकांच्या हातून होणार हे गजानन महाराजांच्या लक्षात आले होते. पार्थ जरी देवाचा भक्त होता तरी त्यालाही वनवास सहन करावा लागला होता. भगवंताचे प्रेम असूनही अर्जुनाचा वनवास चुकला नाही. अगदी तसेच टिळकांचे झाले. इंग्रजांच्या राजवटीत लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्या मंडालेच्या कोठडीतच राहून टिळकानी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आणि तो आबालवृद्धानी मान्य केला. त्यावेळी लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांनी कोल्हटकरांच्या हस्ते भाकरीचा प्रसाद पाठविला. तो प्रसाद टिळकांना मुंबईत मिळाला खरा. लोकमान्य टिळकांनी गीतेवर लिहिलेले हे सहावे भाष्य होते. त्यातील पहिले भाष्यकार होते आद्य शंकराचार्य. दुसरे भाष्यकार होते रामानुजाचार्य. मध्वस्वामी होते तिसरे भाष्यकार तर वल्लभ गुरु होते चौथे भाष्यकार. पांचवे भाष्यकार होते ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी नंतर भावार्थदीपिका हा टीकाग्रंथ ही लिहिला. त्यानंतर दोन-तीन जणांनी टीकाग्रंथ लिहिले खरे! पण त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची सर कसली येणार!


ज्ञानेश्वरानंतर गीतेचा खरा अर्थ – कर्मज्ञान – सांगीतले ते लोकमान्य टिळकांनी. गीतारहस्य हा सहावा महान ग्रंथ. गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वाद असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी तो ग्रंथ पूर्ण केला, असे म्हणतात ते खरे आहे.   

संदर्भ : संतकवी श्री दसगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्त्रोत्र श्लोक १३ ते २९

 *****

Wednesday, August 28, 2024

शेगांव: गजानन महाराज समाधी स्थळ

 


आळंदी, पैठण, देहू,आष्टी, तेर

तैसा तो साचार सज्जनगड

अरण, मंगळवेढे, संताची ही गावे

तैसेच लेखावे शेगावला

कोणत्याही अंशी फरक नाही यांत

शेगांव साक्षात संतभूमी

संतकवी दासगणू महाराज  यांनी अतिशय साध्या, सुंदर आणि काव्यमय शब्दात श्री गजानन विजय ग्रंथ लिहून संतपुरुष गजानन महाराजांचे चरित्र लिहिले. ती काव्यमय भाषा इतकी साधी आणि सोपी आहे की त्याच ओवी वापरुन मी हा लेख लिहिला आहे. मी शेगांवला समाधी स्थळ बघितले आणि आजूबाजूचा सुंदर परिसर बघितला आणि थक्क झालो. सिटी बँकेचे माजी चेअरमन विक्रम पंडित यांचे नांव ऐकले होते. त्यांनी शेगांवच्या गजानन महाराज समाधी मंदिर विकासासाठी ३५० कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली होती. त्या वेळच्या ट्रस्टच्या संचालकांनी केवळ १७ कोटी रुपयांची देणगी स्वीकारली व बाकीचे पैसे पंडितांना परत केले. हे भव्य आणि सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा गजानन भक्तांच्या पैशातून उभा राहिला आहे, हे विशेष.  येथील भव्य प्रसादलयात रोज ४५००/ ५००० गजानन भक्तांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. हे वैशिष्ठ्य. ही व्यवस्था आणि तेथील सेवेकरी बघून आपल्याला आश्चर्यच वाटते. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून भक्तगण येतात , त्यांच्यासाठी सुंदर निवास संकुले बांधली आहेत. हे संस्थान विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे.

जें जें काही ब्रम्हांडात|
तें तें तुझें रुप सत्य|
तुझ्यापुढे नाही खचित|
कोणाचीही प्रतिष्ठा|

गजानन महाराज वयाच्या 30व्या वर्षी १८७८च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला शेगावला दिसले. हा दिन प्रकट दिन म्हणून पाळतात. ते महान संत होते. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश त्यांनी दिला.


तूंच काशी विश्वेश्वर|
सोमनाथ बद्रिकेदार|
महांकाल तेवि ओंकार|
तूंच की रे त्र्यंबकेश्वरा|

भीमाशंकर मल्लिकार्जुन|
नागनाथ पार्वतीरमणI
श्री घृष्णेश्वर म्हणून|
वेरुळगावी तुंच कीं |
तूंच परळी वैजनाथ|
निधीतटाला तूंच स्थित|
रामेश्वर पार्वतीकांत|
सर्व संकट निवारता|

गजानन महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग आत्मज्ञान देणारे मार्ग आहेत हे भक्तांना संगितले. ते शुद्ध ब्रम्ह होते. एक परमहंस सन्यासी होते. ते पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते दिगंबर अवस्थेत असत.

तुला काय करणे यासी|

चिलीम भरावी वेगेसी|

नसत्या गोष्टीसी|

महत्व न द्यावे |

पादुका, पादत्राणे त्यांनी कधीच वापरली नाहीत.  क्वचित ते चिलीम ओढत त्या चिलीमीवरून ते ओळखळे जात असत.

ते फेब्रुवारी १८७८मध्ये शेगाव मध्ये अचानक प्रकट झाले आणि त्यानंतर ते शेगावचे संत झाले. गजानन महाराज हे गांजा आणि चरस यांचे प्रमुख वापरकरते  होते. त्यांच्या अनेक प्रतिमा मधून हे दिसून येते. काही भक्त त्यांना समर्थ रामदासचे रूप मानतात. काही भक्त त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थांचे जवळचे शिष्य मानतात. दोघेही परमहंस आणि अजानबाहू होते. ते एकाच स्त्रोतापासून घेतलेल्या वेगवेगळ्या रूपांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात.

गजानन महाराज म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान योगाचे खरे प्रतिपादक.


तूं वृंदावनी श्रीहरी|
तूं पांडुरंग पंढै|
व्यंकटेश तूं गिरीवरी|
पुरीमाजी जगन्नाथ|
द्वारकेसी नंदनंदन|
नाम देती तुजकारण|
जैसे भक्तांचे इच्छील मन|
तैसे तुज ठरविती|

ते दरवर्षी भक्तांच्या बरोबर पंढरपूरला जात असत. त्र्यंबकेश्वरला ही जात असत. ब्रम्हगिरी पर्वतावर अनेकदा जाने असे. हरी पाटील यांच्याबरोबर बरोबर ते पंढरपूर ला गेले तेंव्हाच त्यांचा पंढरपूरला समाधी घेण्याचा विचार होता. परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेंगावला समाधी घेतली.

 


गजानन जें स्वरूप कांही|
तें तुझ्याविण वेगळें नाहीं|
दत्त भैरव मार्तंड तेही|
रुपे तुझीच अधोक्षजा|
माघमासी सप्तमीस|
वद्यपक्षीं शेगांवांत|
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष|
पंथाचिया माझारी|
उष्ट्या पत्रावळी शोधन|
तुम्हीं केल्या म्हणून|
मिळालें कीं नामाभिधान|
पिसा पिसा ऐंसे तुम्हा|

बंकटलाल अग्रवाल या  सावकाराने २३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराजांना अचेतन अवस्थेत रस्त्यावर फेकलेले अन्न खातांना पाहिले. तो सामान्य माणूस नव्हे, हे त्यांच्या लक्षांत आले व त्यांनी त्याला आपल्या घरी रहण्यास संगितले. त्याच वेळी गजाननाने चमत्कार केला आणि जानराव देशमुखांना जीवदान दिले. तो त्यांचा पहिला दैवी चमत्कार
बंकटलालाचे सदनास|
तुम्ही राहिला कांही दिवस|
तेथे जानराव देशमुखास|
मरत असतां वांचविले|

तुंबा बुडेल ऐसें पाणी|
नव्हतें नाल्यालागुनी|
विश्वास ठेवोनिया वचनीं|
ऐसे केलें पितांबरे|

कोरडी विहीर पाण्याने भरणे, हाताने उसांचा काढणे, कुष्ठरोग बरा करणे, असे अनेक चमत्कार करणारे गजानन महाराज शेगांवचे झाले.

तुझें स्वरुप यथातथ्य|
मानवासी नाही कळत|
म्हणून पडती भ्रमांत|
मायावश होऊनी|


जानकीराम सोनार
द्यावयास कुरकुर|
करूं लागला असे कीं|
स़ोनार विस्तव देण्याला |
नाही ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला|
राग भगवंताकारणे|
चिलीम विस्तवांवाचून|
पेटूनिया दाविली|
चिंचवणें तें सोनाराचें|
नासले अक्षय तृतीयेंचें|
प्राणघातक किड्यांचे|
झाले त्यांत साम्राज्य|
अवघे टकामका पाहती|
एकमेका सांगती|
हे चिंचवणे खाऊं नका!.....
हे बघून चरण धरीलें
सोनाराने
तुम्ही चिंचवण्यासी लाविले करा..
चिंचवणे तेची झाला झरा|
अमृताचा विबुधह़ो|
जानकी शरण आला
बंकटलाले आपणासी
नेले खावया मक्यासी
मोहळे होती मळ्यांत
मधमाश्यांची भव्य सत्य
लोक करिती पलायन
तुम्ही मात्र निर्धास्त
कांही वेळ  गेल्यावरी
तुम्हीच आज्ञा केली खरी|
मधमाशांस जाया दुरी|
आपल्या आज्ञेनुसार|
मधमाशा झाल्या दूर|
क्षेत्र ओंकारेश्वरी
महानदी नर्मदेत
नौका फुटली अकस्मात
पाणी येऊं लागले आंत
नाव बुडू लागली
त्या नौकेत आपण होता
ऐसा प्रभाव आपला  हो
नौका कांठांसी लावली
नर्मदेनें आणूनी भली
आपणां वंदून गुप्त झाली

 लोकमान्य टिळकांनी खापर्डे यांनी त्यांना अमरावतीला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते त्यावेळी गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना संगितले की इंग्रज त्यांना कठोर शिक्षा देतील. पण तुम्ही खूप मोठे कार्य करणार आहात. त्यावेळी इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या  तुरुंगात पाठविले आणि टिळकानी त्याच तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. हाच गजानन महाराज यांचा आशीर्वाद होता.  बाळ गंगाधर टिळकाला.

तुम्हीच कृपा केलीत|

संतकृपा असून

त्यांना शिक्षा झाली दारुण

ब्रम्हदेशी नेऊन|

मंडाल्याशीं ठेविले त्या

गीतारहस्य केला ग्रंथ|

मान्य झाला सार्यांना|

या शेगांवाचे भाग्य मोठे|

जरी आपण देह ठेविला|

तरी पावतसे भाविकाला|

याचा अनुभव आला सार्यांना|




शेगांवचा योगीराणा|
सर्वदा पावो तुम्हातें|
गजाननाशी मुळीं न विसरा|
त्याच्या चरणी भाव धरा|
म्हणजे जन्म सफल होई|

महाप्रसादालय


अतिशय सुंदर असा परिसर. गजानन महाराज तेथील संस्थान कार्यकर्त्यांच्या समवेत असताना सहज म्हणू गेले या जगी राहील रे. त्या पवित्र स्थळी १२ विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली आणि त्यांनी हे समाधी स्थळ तर उभे केलेच पण हे भव्य संकुल उभे केले. भक्तांनी भरघोस देणग्या दिल्या. अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. आनंद सागर प्रकल्प उभा राहिला.    

गजानन महाराज ट्रस्टतर्फे होणारी ४२समाजसेवी सेवाकार्ये



संदर्भ : श्री दासगणू विरचित – II श्री गजानन विजय सार II संक्षेपकर्ता – कै. ना.श्री.आगाशे

*****