Wednesday, January 22, 2020

MADANIKAS In Belur



Queen Shantala , Hoysala Dynasty - Famous Dancer 
Queen Shantala was the wife of King Harshavardhana who happened to be the most famous and glorified king of Hoysala dynasty. she was also a great dancer who used to offer her talent to the Lord Chenna Keshava in the dancing Hall ) Nrutya Mandapa ) of the temple.
a sculpture named " Chavana" has beautifully carved the mood of queen Shantala dancing to the beats of drummer in the temple ha;;. Hence this beautiful sculpture is called as " NATYARANI SHANTALA " or Dancing Queen Shantala.
In Belur temple, there are 38 freestanding bracket figures angled between the upper walls and the over hanging eaves around the outside of the temple and Navaranga ( pillared hall ) . The brackets are adorned with voluptuous beauties known as MADANIKAS in various dancing and ritual postures and depicts an amazing variety sculpted forms.


This is the statue of a lady who is trying to dry hair  fast squeezing the wet hair. One can also observe her assistants standing side by to assist the lady getting ready . The creeper behind the lady is delicately carved with many monkeys and birds in it giving a very natural look to it. 



Bhasmasura Mohini : Enchanting Lady

This carving of Mohini in dancing form to entice the demon Bhasmasura is one of the prettiest carving of all bracket figures of Belur Temple ( ShilaBalika ) . The dancing posture and ever lasing beauty of Mohini will take one to the land of Indian philosophy .Demon Bhasmasura was a great devotee of Lord Shiva who was blessed with fire in his hand.Bhasmasura once attempted to burn Lord Shiva by keeping his fire hand on Shiva's head. Lord Shiva realizing Bhasmasura's  evil thought disappeared and pleaded lord Vishnu to rescue him from the situation . This is when Lord Vishnu incarnated as Mohini in beautiful female form to entice the demon Bhasmasura and killed him trickfully 

Visha Kanya : Poisonous Woman

This marvelous piece of art depicts a naked woman observing a Scorpio near her left foot while draping her saree . She is fearless woman and having least bothered attitude. She is a VISHA KANYA in their palace and such a woman was used as a silent weapon against the enemy to kill..


Darpan Sundari
This beautiful lady is seen getting ready by looking into the hand mirror .Though she is well decorated with exclusive jewelries , she is not happy by looking at her facial expression. It seems that she is waiting for her lover to aaive. At the same time one can see a servant holding grapes in her right hand and a monkey in left hand . She is showing the grapes to monkey but not feeding it as a result the disappointed monkey is licking its fingers in the quest of the grape. 
HERE DISAPPOINTED MONKEY IS JUST LIKE DISAPPOINTED WOMAN WHO IS WAITING FOR A LOVER 

Beautiful Carving - Outsider Vandalism at Belur

MADANIKA IN CONVERSATION WITH HER PARROT

MOHINI
Many invades have always tried destroying the temples which was multi faceted platform of Indian culture and history;Royal families of mughal, Khilji, Ghajni and British are some of the well known names who destroyed many temples in India leaving them in a bad state of vandalism. Insider or local vandalism is also seen  because of lack of heritage awareness.

( REF: JEWEL BOX OF INDIA , VOL 1 by Dr Neelkanth Kote - Photos Neelima Gangakhedkar )


Thursday, December 26, 2019

माझे शिक्षक

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या  वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या  विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम  सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि  निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस  असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे  शिक्षक !

Dr N K Choudhuri , D.Sc.
माझे पीएच.डी. चे मार्गदर्शक

 I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research  and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color  science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Today is a Teacher's Day. I cannot forget my teacher  Dr N K Choudhuri , D.Sc. He was my Ph.D guide in physics  at the  University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the  importance of perfection in science research . He told me that in science research  , you have to have " non-compromising  attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.

Friday, December 13, 2019

भैरप्पा

कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा ह्यांची 876 पानाची ' तंतू ' ही महाकादंबरी वाचतोय . सौ उमा कुलकर्णी ह्यांनी केलेला  मराठी अनुवाद अप्रतिम . मला कन्नड येत नाही . ह्या पूर्वी ' मंद्र ' ही कादंबरी वाचली होती . आवडली होती . दोन्ही कादंबऱ्यांचे अनुवाद  अतिशय सुंदर आहेत . आपण एखादा अनुवाद वाचतोय असे वाटतच नाही . ह्या कादंबरीचा अवकाश खूप मोठा आहे . वाचकाला खिळवून ठेवणारी रसाळ कादंबरी . तशी मी उशिराच वाचली .( प्रकाशन 1997 , दुसरी आवृत्ती 2015 ) .कादंबरी 1947 पासून सुरु होते . स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र नागरिकांची व्यथा व्यक्त करणाऱ्या तुमच्या - माझ्या जीवनाची ही कादंबरी आहे . आपले सामाजिक - राजकीय चित्र ज्या वेगाने बदलत  आहे, ते सारे ह्या  कादंबरीत चित्रित झाले आहे . कादंबरी वाचताना आपला समाज किती गुंतागुंतीचा आहे हे तर लक्षात येतेच पण कादंबरीतील पात्रे आपण बघितलेलीच असतात . ती आपल्या  जीवनातील असतात.  तीन - चार पिढ्यांची, आपल्या  आजूबाजूची - शहरातली  तशीच  खेड्यातली .खऱ्या अर्थाने ही ' हिंदू ' समाजाची वैविध्यपूर्ण कहाणी आहे . भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीचे  नाव ' हिंदू ' असले तरी त्या  कादंबरीला  तो प्रचंड आवाका नव्हता . ती कंटाळवाणी वाटली होती. 'तंतू 'ही कादंबरी अधिक सुंदर विणलेली ' हिंदू ' समाजाची कादंबरी आहे . कुठेही कंटाळा येत नाही . रसाळ लेखन . खूप काही लिहिण्यासारखे आहे ह्या कादंबरी बद्दल . नंतर दीर्घ लेख लिहावा असे मनात आहे .
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1454501931231908&id=100000163447478

एपिक गडबड/ हैदर ते Hamlet






काल मकरंद देशपांडे ह्यांचा ' हसविण्याचा धंदा ' पहायला गेलो . 'एपिक गडबड'  हा त्यांचा फार्स आहे . त्याला नाटक म्हणायचं का ? असा मला पडलेला प्रश्न . हा माणूस पागलपणासाठी प्रसिद्ध आहे असे म्हणतात . त्यांचे हे ५० वे नाटक . ननाट्य असलेली बरीच नाटकं . 'त्यांची नाटकं समजत नाहीत पण बघतांना खूप मजा येते ',असे नासिरुद्दीन शहा म्हणाला होता . काल हा फार्स बघतांना मलाही तसेच वाटलं . ह्या नाटककाराला काय शोधायचे आहे , कोण जाणे ? तो आपल्याला थोडा वेळ पागल करतो ,हे खरे . हा माणूस क्रेझी आहे तशीच त्याची नाटकं ही भन्नाट आहेत . ह्याला काय सांगायचं ते कळत नाही .आपल्याला जे कळलं तेच खरं .
एका मुलीचे मामा आणि आई तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत असतात . पुण्याच्या पेशव्यांच्या १२ व्या पिढीचा एक मुलगा दाखविण्याचे ठरते . तो मुलीला  पहाण्यासाठी घरी येणार  असतो आणि अचानक ४०० वर्षांपूर्वीचा शेक्सपिअर पुण्यात येऊन त्यांच्याच घरात दाखल होतो आणि तोच मुलगा आपल्याला पहायला आला म्हणून ती मुलगी नुसती  आनंदी होत नाही तर त्याच्या  विषयी  प्रेम असल्यामुळे फिदा होते व  लग्नवेडी होते . मग काय काय होते?  . सगळेच क्रेझी ! नुसते भन्नाट . हसून हसून पोट दुखते . ह्या ननाट्यात काय नाही ? हसणे आहे म्हणजे विनोद आहे . गाणे आहे .नृत्य आहे . बडबड आहे . चर्चा आहे . मोनोलॉग आहे . पंचेस - कोपरखळ्या आहेत . शेक्सपिअर आहे . त्याचे चिंतन आहे . त्याची लांब पल्ल्याची वाक्ये असलेली स्वगतं आहेत . त्याचे कवितावाचन आहे . पुण्याचे पेशवे आहेत म्हणजे कोपरखळ्या ठोकायला खूप वाव आहे . मुंबई का  पुणे?, वाद आहे . नाटकातील  संवाद म्हणजे नुसते फटाके. कोपरखळ्या.   त्यात दगडूशेटचा  पुण्याचा गणपती आहे तर मुंबईचा लालबागचा राजा आहे .सामाजिक भाष्य करताना  नुसते  लोकरंजन आहे .
संपूर्ण नाटकांत  नुसती धमाल . बडबड असलेली गडबड  आहे . कल्पनाविलास नाटककाराचा . तसा तो पागलपणा . मॅडनेस .Crazy themes and ideas असलेले हे धमाल नाटक .म्हंटलं तर करमणूक .
सर्व कलाकार आपल्याला सतत हसत ठेवतात ते त्यांच्या अभिनयातून .
प्रयोग रंगत जातो . कालच्या  प्रयोगाला पहिल्या दोन रांगात अनेक नावाजलेले  रंगभूमीवरील नटनट्या उपस्थित होत्या .
निखळ करमणूक असलेला हा फार्स अनेक दिवस लक्षांत राहील .

हैदर ते Hamlet
विशाल भारद्वाज ( विभा ) हा डाव्या विचारसरणीचा लेखक. “मी डाव्या विचारसरणीचा आहे म्हणूनच कलावंत / कलाकार/ लेखक आहे” असे ज्यांना वाटते त्यांचा हा नवा चित्रपट “ हैदर “ . सध्या खूप चर्चेत असलेला. शेक्सपियरच्या Hamlet ह्या नाटकावर आधारलेला किंवा बेतलेला. “शेक्सपियर /Hamlet” ही नावे घेतलीकी प्रेक्षक थोडे आकर्षित होतात. मी ही त्यापैकी एक. काही परीक्षणे वाचली. विभाच्या मुलाखती वाचल्या.  म्हणून सिनेमा पहावयास गेलो. शेवटी शेवटी कंटाळलो. सिनेमा पूर्ण पाहिला. ह्या शेक्सपियरला ( विभा ) नेमके काय म्हणायचे आहे ह्याचा शोध घेऊ लागलो. कलाकृतीची एक मोठी गंमत असते. प्रेक्षक आपला आपला अर्थ लावतो. त्याच्यासाठी दोन शब्द पुरे असतात . १) आवडले २) नाही आवडले. पण समीक्षक खूप लिहून जातात. मग माझ्यासारखा गोंधळून जातो. समीक्षकाला आवडलेले आपल्याला आवडत नाही तेंव्हा मन जास्त विचार करू लागते. कलाकृतीचा असा आस्वाद घेण्याची मला सवय झाली आहे.
हैदरची गोष्ट अशी. हैदरचा काका त्याच्या डॉक्टर असलेल्या वडिलांना मारतो आणि त्याच्या आईशी लग्न करतो. आपल्या वडिलांना कोणी मारले हे त्याला समजते आणि आपली आई त्याच्याशी लग्न करणार आहे हे त्याला जेंव्हा समजते तेंव्हा ह्या हैदरचा शेक्सपियरचा Hamlet होतो. “ सूड घ्यायचा की घ्यायचा नाही “ अशा द्विधा मनस्थितीत तो असतो.
अशी ही विभाच्या  शेक्सपियरच्या Hamlet वर बेतलेली कलाकृती. काहीजणांना ती खूप लक्षवेधी वाटली. ह्या कलाकृतीत काश्मीर हे एक नवीन पात्र. विभाच्या ह्या काश्मीरमध्ये शिकारा आणि शम्मीकपूरची प्रेमाची गाणी नाहीत. तेथे आहे भारतीय सैन्य. सैन्य आणि तेथील नागरिक ह्यांच्यातील तणाव. डाव्या विचारसरणीचा लेखक असल्यामुळे मानवी अधिकाराची गळचेपी करणारे सैनिक अधिकारी तेथे नकोसे वाटतात. 
हैदरचे डॉक्टर वडील हिलाल मीर एका आतंकवादी काश्मिरीला आपल्या घरी आणतात आणि त्याच्यावर घरातच शस्त्रक्रिया करतात . हे त्याच्या बायकोला धोक्याचे वाटते. डॉक्टर म्हणून मानवतावादी प्रवृतीचा असलेला हा डॉक्टर हा धोका पत्करतो. मिलिटरीच्या लोकांना ह्या आतंकवादीचा सुगावा लागतो. ते डॉक्टरला पकडतात . त्याला बंदिस्त करतात. त्याचे घर उध्वस्त करतात कारण त्यात आतंकवादी असतात व ते सैनिकावर उलट गोळीबार करीत असतात. ह्या डॉक्टरला  छावणीत ठेवतात व  माहिती काढून घेण्यासाठी त्याचा छळ करतात. हा डॉक्टर तेथून सुटतो खरा पण त्याचाच भाऊ त्याला झेलम नदीत बुडवून मारण्याचे षड्यंत्र रचतो कारण त्याला आपल्या वहिनीबरोबर लग्न करावयाचे असते. आणि अलीगढला शिकण्यासाठी गेलेला हैदर परत येतो. आपले उधवस्त घर पाहतो. वडिलांचा शोध घेतो. आई काकाबरोबर रमलेली पाहून दु:खी कष्टी होतो. आणि ह्या सर्वांचा बदला कसा घ्यावयाचा ह्याचाच विचार करीत तो आतंकवादी होतो.
असा हा हैदर. माणसे आतंकवादी कां होतात ? ह्याचा शोध घेण्यासाठी विभाने घेतलेला शेक्सपियरचा आधार.
मुख्य भाष्य आहे ते AFSPA ह्या आर्मीला दिलेल्या विशेष अधिकारावर. स्वतंत्र काश्मीर कां हवे ? भारतापासून आणि पाकिस्तानपासून स्वातंत्र्य कां हवे हे मांडण्याचा केलेला प्रयत्न. सार्वमतावर मांडलेले हैदारचे विचार. हे लेखकाचे भाष्य की तेथील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन. सैनीक अधिकारी कसे छळ करतात व त्यांना मिळालेल्या अमर्याद अधिकाराचा दुरुपयोग करतात असे सांगण्याचा प्रयत्न ह्या कलाकृतीतून करण्याचा प्रयत्न दिसून येतो. हे सर्व हैदरच्या तोंडून व्यक्त होते. सिनेमाला प्रेमाची  गोष्ट असावी लागते म्हणून ती सारी पात्रे आहेतच. कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध असावे लागतात म्हणून हैदर , त्याचे काका व त्याची आई ह्यांच्यातील संबंध , हैदरची प्रेयसी , प्रेयसीचे वडील आणि त्यांचा काकाला असलेला छुपा पाठींबा . अशा अनेक कौटुंबिक व राजकीय गुंतागुंती. त्याचा काका म्हणजे तेथील राजकारणातील एक कारस्थान करणारे पात्र.
ह्या सिनेमातील काश्मीरमधील अलगतावादी म्हणजे शेक्सपियरच्या नाटकातील राजे , हैदरचा काका खुर्रम म्हणजे क्लाऊडीयस हे पात्र,
विभा एका बाजूला म्हणतात की मी राजकीय भाष्य करीत नाही. मी फक्त माणूस म्हणून राजकीय प्रश्नाकडे बघतो आहे. काश्मीरमधील विचित्र परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींच्या दृष्टीकोनातून बघतो आहे. AFSPA ह्या राजकीय समस्येकडे मी लक्ष वेधून घेतो आहे. त्या पैलूचा काय परिणाम होतो आहे ते शोधतो आहे. त्याचप्रमाणे असंख्य विधवा बायकांच्या प्रश्नाकडे पाहतो आहे.
हाच तर ह्या फिल्मचा उद्देश होता. पण भाष्य करताना विभांचा कल कोणत्या बाजूला आहे हे सतत जाणवते आणि त्यांच्या डाव्या विचारसरणीमुळे ह्या संपूर्ण प्रश्नाकडे कसे बघतात हे प्रकर्षाने जाणवते. आणि तेथेच ह्या कलाकृतीचे कलामूल्य नाहीसे होते व शेक्सपियरच्या पात्राशी  ह्याचा काहीच संबंध नाही असे वाटू लागते.
आतंकवादी का होतात ? हे शोधताना एका बाजूला आतंकवादी समर्थन, सार्वमताचा मुद्दा ठासून मांडणे , मानव हक्क चळवळीचे आपण विचारवंत असल्यामुळे भारतीय सैनिकांनी केलेला अत्याचार योग्य नाही अशी भूमिका घेणे हाच तर ह्या कलाकृतीचा उद्देश असावा हे चित्रपट पाहून जाणवते. काश्मीर मधील अलगतावादी मंडळीना हा सिनेमा अधिक आवडण्याची जास्त शक्यता आहे. ते अंतर्मुख होऊन विचार करणारे असतील असे वाटत नाही. आपल्यासारख्या प्रेक्षकांना हा विचार मुळीच योग्य वाटणार नाही म्हणून हा चित्रपट कितीही कलात्मक करण्याचा प्रयत्न केला असला तरी आवडत नाही. काश्मीरचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. तेथील राजकर्ते , केंद्रात राज्य करणारे आपले सरकार , तेथील अलगतावादी  गट आणि भारतीय सेनेला देण्यात आलेले विशेष अधिकार ह्या सर्वांचा विचार सर्वांनी करावा म्हणून मी हा चित्रपट काढला असे विभांचे म्हणणे आहे. पण त्यांचे भाष्य हे संतुलित नसल्यामुळे पटणारे नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. 
विभा म्हणतात मी हे सारे मला मांडायचे म्हणून मांडतो.  मी अंतर्मुख होऊन विचार केला आहे. तुम्हीही विचार करा असे ते एका बाजूला सांगतात तर मला प्रेक्षकाशी काही देणं घेणं नाही. त्यांना पाहिजे तो अर्थ त्यांनी लावावा. मी लोकप्रियतेच्या मागे लागून काहीही लिहित नाही, असेही ते म्हणतात.
शेक्सपियरकडे लोक पुन्हा पुन्हा जातात. त्याच्या Hamlet चा आधार घेऊन काश्मीर प्रश्नाकडे तेथील आतंकवादी चळवळीकडे एक छोटीशी गोष्ट घेऊन जाणारा हा कलावंत उगाचच साम्य शोधतो आहे असे मला तरी सिनेमा बघितल्यावर वाटले. शेक्सपियरच्या नाटकात मानवी संबंधाचे गुंतागुंतीचे संबंध दिसून येतात. अनेक भावभावनांना वाट करून दिलेली असते. प्रेम , राग , द्वेष , मत्सर , कुटुंब व त्यातील विविध प्रकारची माणसे आणि देश आणि प्रांत ह्या सर्वांचे विलक्षण मिश्रण त्याच्या नाटकात होते. तसे काही ह्या चित्रपटात दिसून आले नाही. तेंव्हा शेक्सपियरचा आधार घेऊन असा चित्रपट काढला असे म्हणणे योग्य नाही.

लंबक कुठे झुकतोय ?



मकरंद जोशी ह्या सयोंजकानी दीपावली अंकात घडवून आणलेली चर्चा.  भारतीय आणि जागतिक - राजकारणाचा एकूण लंबक डावीकडून उजवीकडे झुकतोय असे जाणवल्यामुळे घडवून आणलेली चर्चा. सर्व लेखक डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले .उत्तम कांबळे ह्यांना समाज धर्माच्या नावाने हळवा बनत चालला आहे असे वाटते .त्यांनी आरक्षणावर खूप सडेतोड विचार मांडले आहेत . बाकीचे विचार फारसे पटणारे नाहीत . मी त्यांचे मार्क केलेले लिखाण अवश्य वाचा.
जयदेव डोळे ह्यांना मी ते तरुण असताना केलेल्या युक्रांद चळवळीपासून ते जर्न्यालिझमच्या प्राध्यापकी पर्यंत ओळखतो . डावे- समाजवादी कल असलेले. त्यांनी मोदींचा उदय कसा झाला ?,आणि आजचा मध्यमवर्ग त्यास कसा जबाबदार आहे? समाजवाद्यांची - डाव्या विचारसरणीची पीछेहाट होण्यास सुखवस्तू मध्यमवर्ग जबाबदार कसा जबाबदार आहे? ,  असा विचार मांडताना समाजवादी लोकांचे काय चुकत गेलं ह्याचा आढावा घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं . त्यामुळे त्यांचे मुद्दे पटत नाहीत.
हेमंत देसाई , पूर्वी मटाचे लेखक-पत्रकार . डाव्या विचारसरणीचे . जगभराच्या राजकारणाचा धांडोळा घेतलाय .अति डावे - अति उजवे ह्याबद्दल लिहिलंय . कम्युनिस्ट राजवटीत हुकूमशहा कसे झालेत आणि त्यांनी मार्क्सला कसं मागे टाकलं , ह्या बद्दल लिहिलं असतं तर...!  कम्युनिझम जगातून कसा नाहीसा झाला ?,हे न सांगता उजव्यांना ठोकून काढण्यात लेखाची लांबी वाढवली . डावे किंवा समाजवादी कुठे चुकतात हे न सांगता उजव्यांना ठोकण्यात अर्थ तो काय?  कंबोडियाची कम्युनिस्ट हुकूमशाही राजवट , सोव्हिएत युनियनचे विघटन , चीनच्या  माओनंतर आजचा नवा भांडवली माओ , व्हिएतनाम मध्ये होत असलेले बदल आणि भारतात निष्प्रभ झालेली कम्युनिस्ट चळवळ ह्याचा कुठेच उल्लेख नाही . त्यामुळे लेख प्रभावी झाला नाही.
अच्युत गोडबोले तरुणपणी कम्युनिस्ट होते . नंतर आयटीत सीईओ होते. मोदी सरकारच्या तीन वर्षाचा आढावा घेताना त्यांच्यातील डावी विचारसरणी जागी झाली आणि त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर टीकात्मक लिहिलं. राजकारणावर त्यांनी खूप दिवसांनी लिहिलं असावं.
विश्वास पाठक हेच एक उजव्या राजकारणाचे प्रतिनिधी . त्यांनी भाजपचा बाजूने लिहिणे स्वाभाविकच आहे. काही ठोस मुद्दे मांडायला ते विसरले नाहीत. रवी आमले उदारमतवादी शहाणीव ह्याबद्दल लिहिताना उजव्यांना ठोकत होते.
पाठक सोडले तर सगळे डाव्या- समाजवादी वृत्तीचे . ह्या पुरोगामी - समाजवादी लेखकांना - डाव्या विचारसरणीचे लोक आणि पक्ष का मागे पडत आहेत? ,  त्यांचे कुठे चुकत आहे?, उजवे का सबल होत आहेत ?, व काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस का येत नाहीत ?, किंवा चांगला पर्याय का उभा राहात नाही?, ह्या विषयाचे चिंतन कोणीही केलेले नाही. ह्यावर चर्चा व्हावी हे नक्की. झापड लावून लिहिल्यामुळे मुद्दे पटत नाहीत.
काही लेखांचे मुद्दे सोबत जोडतो आहे.

Saturday, October 19, 2019

तिरू कोनेश्वरम


तिरू कोनेश्वरम , श्रीलंका 

श्रीलंकेच्या दौर्यावर होतो . कोलंबोला उतरलो .तेथून  १६२ मैलावर असलेल्या त्रिंकोमाली  ( गोकर्ण ) ह्या शहराकडे निघालो . रस्ता सुंदर होता . हिरवागार निसर्ग होता . पहिल्याच प्रवासात श्रीलंका खूप आवडले.

कोलोंबोचा समुद्र किनारा  

श्रीलंका म्हणजे लंकाधिपती रावणाचे एकेकाळचे राज्य . मुख्य रामायण  येथेच घडले . रावण हा श्रीलंकेत व्यापारी  म्हणून आला .म तो सुरवातीला चांचेगिरी करीत असे . नंतर आयात-निर्यात  व्यापार करू लागला आणि एक दिवस येथील राजा झाला. व्यापार करण्यासाठी येथे आला आणि प्रथम स्थाईक  झाला ते गोकर्ण ह्या नैसर्गिक बंदर असलेल्या शहरात. गोकर्णचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे . सोनेरी वाळूचा हा निसर्गरम्य किनारा. सुनील नभ हे , सुंदर नभ हे ...., सुनील सागर , सुंदर सागर.... असेच ह्वया किनार्याचे वर्णन करता येईल . संध्याकाळी ह्या शहरात पोहोचलो . अतिशय सुंदर अशा रिसोर्टमध्ये मुक्काम केला. संध्याकाळ फार  मजेत गेली . दुसरेदिवशी पासून भ्रमंती सुरु होणार होती, रामायण जेथे  जेथे घडले त्या त्या ठिकाणी भटकून येण्याचे ठरविले होते. गोकर्ण हे पहिले ठिकाण.
सुनील नभ हे , सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा
सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची अहा 
दुसरे दिवशी सकाळी निघालो . आम्ही प्रथम निघालो सिगीरीयाकडे ( सिंहगिरी ).  कुबेराची  ही राजधानी . तो येथील मोठा आयात - निर्यात करणारा मोठा  व्यापारी . तो नंतर येथील राजा झाला . सिगीरीयात  एका उंच डोंगरावर त्याने स्वतः चा महाल उभा केला होता  . तेथे त्या  उंच पाषाणावरील महालात जाणे तसे फारच कठीण .

सिगीरीया 
 रावण सुरवातीला येथे कधीच आला नव्हता. त्याचा व्यापार गोकर्णहून चालत असे . मग  तो कुबेराचा  उजवा हात झाला आणि एक दिवस तो त्याचा सैन्यप्रमुख  झाला . त्याच्या मेघदूत ह्या  पंतप्रधानाला कटकारस्थान करून मारल्यानंतर कुबेराचाच पंतप्रधान झाला आणि काही वर्षांनी  त्याचेच  राज्य ताब्यात घेतले . आमच्या गाईडने आमची गाडी मध्येच एका ठिकाणी थांबवली . ते होते तिरू कोनेश्वरम देऊळ  . ऋषी  विश्वामित्रांचा आश्रम येथेच होता . अगस्ती ऋषींनी हे देऊळ बांधले होते . प्रभू रामचंद्राने येथेच  भगवान शंकराची पूजा केली होती आणि  रावणवध करण्याची  शपथ घेतली होती ,असे म्हणतात.
सिगीरीया महालाकडे जाणारा रस्ता 
विश्वामित्राचे वास्तव्य कोनेश्वर मंदिरातच असे . ते भगवान रुद्राचे पूजक होते . हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे . हे पुराणकालीन मंदिर खूपच  देखणे आहे. समुद्रकिनारीच असलेले हे मंदिर म्हणजे एक  पुराणकालीन ठेवा आहे . बंगालच्या  उपसागराच्या नयनमनोहर लाटा वेगाने येऊन त्या मंदिराच्या भिंतीवर आदळत असतात . आजूबाजूला दाट जंगल आहे .येथे  वन्यपशू मुक्तपणे फिरतात . हरिणे खूप दिसतात.
पुराणकालीन कोनेश्वर मंदिर 
ह्या मंदिराबद्दल तशा  खूप कथा प्रचलित  आहेत . अशीच एक कथा ...आपल्याला  खूप काही सांगून जाणारी .. मला आवडलेली ... रामायण घडविणाऱ्या विश्वामित्रांची .....
कोनेश्वर मंदिर
कैकेसी ही रावणाची आई .ती रुद्रभक्त .ती गोकर्णला मुलाकडे रहात होती.  तिला विश्वामित्रांना भेटायचे होते .अशीच एका दिवशी कुंभकर्ण ह्या आपल्या धाकट्या मुलाला घेऊन ती कोनेश्वरला आली. त्या मंदिरातील धर्मशाळेत ती उतरली . तिचे पती ऋषी  विश्रवा ह्यांच्या आश्रमात ती विश्वामित्रांना २ वर्षापूर्वी  भेटली होती . अरीष्ट्नेमी हा त्यांचा उजवा हात होता .तिची आणि अरीष्ट्नेमीची चांगलीच ओळख होती. ती त्याला भाऊच मानीत असे . तिने अरीष्ट्नेमिला विश्वामित्रांची  भेट घडवून आण अशी कळकळीची विनंती केली. अरीष्ट्नेमीने तिला थोडे  बसण्यास सांगितले आणि तो  ऋषी विश्वामित्रांच्या कुटीत  गेला . त्यां दोघांचे बोलणे चालू होते . ते बोलणे  कैकेसिला  बाहेर ऐकू येत होते .विश्वामित्र कोणालाही भेटण्याच्या मन:स्थितीत नव्हते . त्यांना कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती . कैकेसीला थोडा अंदाज आला . ती कुंभकर्णाला घेऊन सरळ  त्यांच्या कुटीत  गेली आणि विश्वामित्रांच्या पुढे उभी राहिली.
नंदीची भव्य मूर्ती 

विशावामित्रांचे लक्ष तिच्याकडे गेले . त्यांच्या लगेच लक्षात आले की ही तर विश्रवा ऋषींची पत्नी . त्यांच्या हे ही लक्षात आले की त्यांच्या आजोबाच्या  एका शिष्याची ती  नात आहे . तिला पाहून त्यांची थोडी चिडचिड झाली . त्यांच्या  काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या . ते लगेच म्हणाले , ' हे बघ कैकेसी , तुझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर आम्हाला खूप त्रास दिला आहे . मला त्या जुन्या गोष्टी आठवून खूप त्रास होतो आहे . तुला भेटावे असे मला वाटत नाही.'.
हिंदी महासागर- बंगालचा उप्म्हसागर  

कैकेसी थोडी हिरमुसली . त्याच वेळी छोटा कुंभकर्ण चुळबुळ करीत होता . तो ६ वर्षांचा होता पण दिसायला  मोठा वाटत होता . थोडा कुरूप होता . त्याचे  केस लांब वाढलेले व अस्ताव्यस्त  . त्याच्या खांद्यावर अजून दोन हात आलेले . काही  जखमांचे व्रण दिसत होते . त्याचे  कान ही आकाराने  खूपच मोठे आणि विचित्र आकाराचे होते  . तो नागा आहे असे लोक म्हणत होते . तो  आर्य वाटत नव्हता . दिसायला अगदी वेगळा आणि कुरूप . त्याचे ते वेगळे दिसणे विश्वामित्रांच्या लक्षात आले . विश्वामित्र हे तसे  सुऱ्हदयी होते . ज्यांना काही व्यंग असते त्यांच्याबद्दल त्यांना विशेष  सहानुभूती असे. ते कैकेसीकडे पाहून उद्गारले ,' किती गोड आहे हा मुलगा !'  माता  कैकेसी थोडीशी आनंदली आणि म्हणाली , ' हो ! माझा कुंभ गोडच आहे !' . विश्वामित्रांनी कुंभकर्णाला जवळ घेतलं , कुंभकर्ण थोडासा  ओशाळला. कैकेसीला थोडा आनंद झाला, विश्वामित्रांनी कुंभकर्णाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला  प्रेमाने जवळ घेतलं  आणि ते त्याच्याकडे बघून  थोडेसे हसले . त्यांच्यासमोर लाडवाचे ताट होते . त्यातील एक लाडू त्यांनी कुंभकर्णाला दिला . त्याला लाडू आवडतच होता , त्याने एका दमात अधाशासारखा तो लाडू खाऊन टाकला . विश्वामित्रांना त्याने  दुसरा लाडू मागून घेतला आणि तोही  एका दमात  फस्त केला  . कैकेसीला  आपल्या मुलाचा हा  हावरटपणा आवडला नाही .
मंदिराच्या आजुबाहुला दाट जंगल - हरणाचा कळप 
कैकेसी उभी राहिली आणि विश्वामित्रांच्या पाया पडू लागली . ती  ऋषींना म्हणाली , ' हे ऋषी , माझ्या ह्या मुलाकडे बघा . त्याचे हे जास्तीचे आलेले दोन हात  , हे     मोठे आणि विचित्र आकाराचे  कान आणि ह्या त्याच्या  चिघळलेल्या जखमा.  ही कसली व्याधी झाली आहे ह्याला . हे कशामुळे होते  ? त्याच्यावर एखादा उपाय सांगा ना ! मी त्यासाठीच तुमच्याकडे आले आहे .' 
विश्वामित्र कैकेसीकडे पाहून म्हणाले ,' हे असेच असतं . हे एक  व्यंग आहे . काही लोकांना अशी अनैसर्गिक वाढ होत असते . त्यावर उपाय असा काहीच  नाही. तो  नागा आहे . जर त्याला रक्तस्त्राव झाला आणि वेदना झाल्या तर त्याचा मृत्यू जवळ येईल .'

कैकेसी घाबरून गेली . ती म्हणाली ,' तुम्ही तर आयुर्वेद तज्ञ आहात , काहीतरी उपाय सांगा '. विश्वामित्र तिला म्हणाले ,' ह्यावर काहीही  उपाय नाही . तरीही मी एक औषधी देतो . त्यामुळे त्याच्या वेदना थांबतील . रक्तस्त्राव थांबेल आणि त्याचे आयुष्य वाढेल . त्या औषधाचे नांव आहे   अगस्त्यकुटम . विश्वामित्रांनी अरीष्ट्नेमिला हांक मारली आणि ती औषधी  कैकेसिला देण्यास सांगितली. कैकेसी खूप आनंदली. तिच्या डोळ्यात पाणी आलं . ती नमस्कार करताना त्यांना म्हणाली , ' माझा मोठा मुलगाही असाच  नागा आहे . तो ही असाच दुर्दैवी आहे . त्यालाही  अशाच वेदना होत असतात . त्यालाही असेच वाढलेले अवयव आहेत '. विश्वामित्रांना त्यात  फारसे आश्चर्य वाटले नाही . त्यांना खरं म्हणजे हे आधीच  माहित होते . ते तिला म्हणाले , ' त्याचे नांव रावण आहे ना !  . तो मोठा चाचेगिरी करणारा खलाशी आहे  ना ! तो आयात - निर्यात व्यापार करतो . कुबेराचा तो उजवा हात आहे .  '
ती त्यांना म्हणाली , ' हो , ते खरे आहे , माझ्या पतीने तर मला सोडून दिले आहे .  तो तर परदेशी गेला आहे .मला सोडून दिले आहे . परदेशी  जाऊन त्यांनी तिकडे दुसरे लग्न केले आहे . मी ही अशी अभागी . आम्हो सध्या  वाईट परिस्थितीत दिवस काढतो आहोत . रावण खलाशी  आहे . त्याच्या २०० बोटी आहेत . तो आयात -निर्यात  करून पैसे मिळवतो. तो  दुसरे काय करणार ?  आम्हाला भरतवर्ष सोडून येथे  यावे लागले .तो स्वत:च्या हिंमतीवर व्यापार करतो'. विश्वामित्र तिला म्हणाले , ' काहीही काळजी करू नकोस . रावण खूप  हुशार आहे , मेहनती आहे , कार्यक्षम आहे , डोकेबाज आहे , बुध्दिमान आहे , योद्धा आहे .त्याचे स्वतः: चे असे  ध्येय आहे . तो त्याच्या  ध्येयासाठी लढतो आहे . तो ह्या भरतवर्षाचे  एक स्वप्न पूर्ण करणार आहे . ही माझी भविष्यवाणी आहे . तू काळजी करु नकोस . मी त्याच्यासाठीसुद्धा औषधी देतो '. कैकेसीच्या डोळ्यात पाणी आले . ती उठली . त्यांना नमस्कार करताना विश्वामित्रांनी तिच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला . ते तिला म्हणाले , ' हे सर्व कठीण आहे .तू  धीर धर . सर्व व्यवस्थित होईल . माझी औषधी लागू पडेल . त्या दोघांना  लवकर मरण येणार नाही '. 
कैकेसी कुंभकर्णाला घेऊन बाहेर पडली . अरीष्ट्नेमी विश्वमित्रांच्याकडे बघून म्हणाला ,'
गुरुवर्य , तुम्ही असे का केले ? रावणाला अशी औषधी  का दिली ? तो तर राक्षसी आहे ? तो क्रूर आहे . तो  आता अधिक क्रूर होणार !' 
विश्वामित्र त्याला म्हणाले  , ' हे वत्सा , तू  काही काळजी करू नकोस . प्रत्येकाचे एक आयुष्य असते . त्याचे एक जीवितकार्य असते . त्यासाठी परमेश्वराने त्याला येथे पाठविलेले असते . रावण हा एक शिवभक्त आहे . तो त्याचे परमेश्वराने दिलेले कार्य  पूर्ण करणार . तो आपल्या कामाला येणार आहे .  मला त्याचा उपयोग होणार आहे . काही  वर्षांनी एका नव्या विष्णूचा अवतार येणार आहे . त्याला दोन कार्ये   पूर्ण करावयाची आहेत . 
पहिले कार्य म्हणजे महादेवाला म्हणजे रुद्राला एक  मदतनीस हवा आहे . रावण हा रुद्राचा भक्त असेल . तो नष्ट करेल ह्या  जगातील दुष्टपणा .
दुसरे कार्य म्हणजे ह्या पृथ्वीवर एक  नवा विष्णू  अवतार जन्माला येणार आहे आणि त्यामुळे एक आदर्श राज्य निर्माण  होणार आहे . सूर - असुरांच्या युद्धात रावण उपयोगी पडणार आहे . तेच त्याचे जीवित कार्य आहे . तुला हे येत्या काळात दिसून येईल आणि मग मी हे का करीत आहे , हे समजेल . हा नियतीचा खेळ खेळण्यासाठीच मला ह्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे . मी माझे काम करीत आहे .रावणाचा जन्म हा शिवाच्या  मदतीसाठी आहे तर  सीता ही नवी विष्णू अवतार असेल  . ती एक भूमिकन्या असेल . ती  रावण जेंव्हा क्रूर होईल तेंव्हा त्याचा नाश करील आणि आपल्या पतीच्या मदतीने येथे रामराज्य निर्माण करीन. 
अरीष्ट्नेमी अचंबित झाला . त्याला विश्वामित्रांचे मन समजले . त्यांची चाल ही समजली . त्यांचे जीवित कार्य समजले . विश्वामित्र  म्हणूनच आर्यावर्त सोडून श्रीलंकेत  कोनेश्वरला  आले होते . नियतीनेच हे सर्व रचले होते.  असे हे तिरू  कोनेश्वर मंदिर  . विश्वामित्रांच्या पदकमलाने पवित्र झालेला हा परिसर . ते जणूकाही नवे विश्व निर्माते होते  .ते  रामराज्य निर्माते होते . ह्या  विश्वाचे ते खरे सूत्रधार . असे हे विश्वामित्र . रामायण घडले ते त्यांच्यामुळेच . ह्या नियतीचा  निर्माता म्हणजे विश्वामित्र . 

गोकर्ण 















Wednesday, September 4, 2019

I SALUTE MY TEACHERS

तुम्ही खरे विद्यार्थी असाल तर शिक्षक तुमच्या आजूबाजूलाच असतात हे लक्षात असू द्यावे.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

आज शिक्षक दिन . काही शिक्षक तुमच्या आयुष्यात येतात . त्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष शिकविलेले नसते . तुम्ही त्यांच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी नसतात .त्यांचे तुमच्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांसारखे प्रेम असते . आपुलकी असते . असा एक शिक्षक मला मिळाला . त्यांचे नांव प्रोफेसर जे जी काणे . ते युडीसीटीचे डायरेक्टर होते . त्यांचा विषय होता ऑइल टेक्नॉलॉजी . मी युडीसीटी मध्ये पदार्थविज्ञान विभागात पी. एचडी .करीत होतो . यूजीसीची ३ वर्षाची शिष्यवृत्ती संपली होती .थिसीस लिहिण्याचे काम सुरु होते . म्हणून मी औरंगाबादच्या ज्ञान -विज्ञान महाविद्यालयात लेक्चरर झालो . माझे मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे सुरु झाले . त्यामुळे थिसिसचे काम मागे पडले . काही प्रयोग करणे राहिले होते . असेच एके दिवशी काणे सर मी प्रयोग करीत असताना आमच्या प्रयोगशाळेत आले . त्यांनी माझी विचारपूस केली .माझी युजीसी शिष्यवृत्ती संपली आहे हे त्यांना माहित होते . मी मुंबई - औरंगाबाद येणे - जाणे करतो हे त्यांना समजले होते . माझे काम मागे पडते आहे हे त्यांना समजले . त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटीसाठी बोलविले . मी भीतभीत त्यांना भेटायला गेलो . त्यांनी मला कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅब , माटुंगा - युडीसीटीच्या जवळच असलेली - ह्या संस्थेत सायंटिफिक असिस्टंटची जागा आहे . तेथे प्रयत्न कर असा सल्ला दिला . 'तेथे नोकरी मिळाली तर तुला सोयीचे होईल . तुला युडीसीटी जवळ असेल . तुझ्या कामाला गती येईल .लवकर थिसीस पूर्ण करता येईल .तुझी आर्थिक विवंचना संपेल ' . मी अर्ज केला आणि निवडला गेलो. मी त्या संस्थेतील संचालकांचा सायंटिफिक इन्फर्मेशन सहाय्य्क झालो . युडीसीटी जवळ होती . संध्याकाळी प्रयोगशाळेत हजर असे . लायब्ररी उघडी असे . माझे काम वेगाने झाले . मी सहा महिन्यात थिसीस सबमिट केला . काणे सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले . विद्यार्थ्यांबद्दल एवढी आपुलकी असलेला , त्यांच्या समस्यांची जाण असणारा देवमाणूस असलेला शिक्षक म्हणजे काणे सर . आजही त्यांची मूर्ती मला माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे . माझ्या पाठीवर हात ठेऊन ते मला हाक मारीत आहेत ...' नरेंद्र .... ' .
मी त्या देवमाणसाला नमस्कार करतो . असे माझे शिक्षक नसलेले शिक्षक . खरे मार्गदर्शक . माझे आयुष्य बदलून टाकणारे शिक्षक !

Today is a Teacher's Day in India . I pay my respect to my two great teachers who have made a great impact on my life . 1) Dr N K Choudhury, D.Sc. , my Ph.D research guide who guided me for achieving excellence in physics research and 2) Dr Billmeyer F W Jr of Rensselaer Polytechnic Institute , Troy , N Y who taught me Color science and technology which helped me to use it in industrial Color applications . Indian Color industry saved millions of Rupees by using industrial Color control.

Dr N K Choudhuri, D.Sc.
My Research Guide 
 I cannot forget my teacher Dr N K Choudhuri . He was my Ph.D guide in physics at the University Department of Chemical Technology , University of Bombay . He taught me the importance of perfection in science research . He told me that in science research , you have to have " non-compromising attitude". A great personality. Thank you Dr Choudhuri.