Saturday, August 10, 2019

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून...

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

1 comment: