Monday, September 11, 2017

THE DRAMATIC DECADE


राजकारणातील घडामोडी आपण रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो . पत्रकार त्यांच्याजवळच्या पुड्या सोडतच असतात . राजकीय विश्लेषक त्यांचे अभ्यासपूर्ण लेख छापतच असतात . अग्रलेखातून प्रतिक्रिया समजतच असतात . गप्पामध्ये राजकारणावर चर्चा चालूच असते .ह्या सर्वाहून अधिक स्फोटक असते ते राजकारणातील व्यक्तींचे चरित्र - आत्मचरित्र . पी व्ही नरसिंहराव ह्यांनी Insider ही कादंबरी लिहिली पण ते त्यांचे आत्मचरित्रच अधिक आहे . संजय बारू ह्यांनी डॉ मनमोहन सिंग ह्यांच्या सहवासातील क्षण टिपताना पंतप्रधानांचे राजकीय जीवन लोकांच्या पुढे आणले . ही दोन्ही पुस्तके राजकारणाची दशा आणि दिशा समजावून सांगणारी होती . प्रणव मुखर्जी ह्यांचे ' The Dramatic Decade ' हे पुस्तक हातात पडलं आणि वाचताना तो सर्व काळ आठवू लागला . आपलं ज्ञान वर्तमानपत्रातील माहितीवरचे . ह्या व्यक्तीने तर ते राजकीय जीवन जगलेलं . स्वतःचे अस्सल अनुभव . राजकारणाची गुंतागुंत पूर्ण माहित असलेली ही व्यक्ती राजकीय गुंता कसा सोडवायचा ह्यातच तद्न्य . राजकीय शक्तिकेंद्राची एक शक्ती . राजकारणात मानलेल्या नेतृत्वाला लॉयल असणारी आणि म्हणूनच प्रभावी असणारी व्यक्ती . रूढार्थाने तळागाळातून वर आलेली लोकप्रिय राजकीय व्यक्ती नव्हे . केवळ बुद्धी सामर्थ्यावर राजकारणात स्थिर असलेली ही राजकीय व्यक्ती . आत्मचरित्रात सगळंच काही लिहायचं नसतं .त्यामुळे ते वाचताना आपणच शोधून काढायचं असतं . नेमकं काय काय झालं असेल त्यावेळी ? दिल्लीच्या राजकारणात प्रदीर्घ काळ ज्यांनी घातला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतं . हाच मोठा वाचन अनुभव . इंदिरा गांधी ह्यांच्याबद्दल अधिकरवाणीने दुसरा कोण सांगणार ? मोरारजी - चरणसिंग - जगजीवनराम ह्या त्रिकुटातील सत्तेतील भांडणे त्यांनीच जवळून पाहिलीत . जॉर्ज फर्नांडिस आणि मधू लिमये ह्यांनी जनता प्रयोग अयशस्वी करण्यासाठी कसा हातभार लावला . राजनारायण ह्यांनी संजय गांधींच्या बरोबर कसा संपर्क साधून जनता पार्टीत खिंडार पाडले . यशवंतराव आणि शरद पवार ह्यांच्या इंदिरा विरोधी राजकारणामुळेच काँग्रेसमध्ये फूट पडण्यास वेग आला पण त्यांना दिल्ली जिंकता आली नाही . देवराज उर्स ह्यांनी इंदिरा गांधी ह्यांना दक्षिणेतून विजय मिळवून दिला आणि त्यांना वाटू लागले की आपणच खरे नेते . शेवटी त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले . हे सर्व वाचताना भारतीय राजकारण कसे चालते ह्याची झलक वाचायला मिळते . ही राजकीय मंडळी छोटी वाटू लागतात . शेवटी माणूस असाच असतो . सत्तेचे राजकारण असेच असते . नरसिंहराव ह्यांची 'इनसायडर' ही कादंबरी अधिक मनोरंजक झाली आहे . ह्या आत्मचरित्रातून व्यत्तिचित्रे मात्र अधिक ठळक दिसू लागतात . त्यातील खरं - खोटं मात्र शोधनं आवश्यक आहे . कारण लिहिणार्याची दृष्टी एकांगी असू शकते .
बंगालचे राजकारण स्वातंत्र्यापूर्वीपासून असेच होते . मुस्लिम अनुनय किंवा मुस्लिम वर्चस्व ह्या भोवतीच ते फिरत होते . प्रणव मुखर्जी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यावेळच्या मुस्लिम राजकारणाचा सुंदर आढावा घेतला आहे . प्रणव मुखर्जी काँग्रेसच्या आधी बंगला काँग्रेसमध्ये होते . त्यांनी बंगालच्या राजकारणावर सविस्तर लिहिलं आहे . ते वाचलं की त्यावेळची काँग्रेस , मुस्लिम लीगचे राजकारण आणि बंगला देशची निर्मिती ह्यावर पूर्ण प्रकाश पडतो . मुस्लिम संख्या खूप अधिक असल्यामुळे ( त्यावेळी ४० % पेक्षा अधिक होती ) तेथील राजकारण कसे होते आणि आजही तसेच आहे ह्याची कल्पना येते .
सीपीएम असो का ममताचा पक्ष त्यांनी मुस्लिम अनुनय केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली . काँग्रेसचा तर तो इतिहास होताच . काँग्रेसने मुस्लिमांचा कितीही अनुनय केला असला तरी काँग्रेसला तेव्हाही हिंदूंचा पक्ष असेच मुस्लिमांनी संबोधले .
भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला मुस्लिम अनुनय जबाबदार आहे . ते त्यांचे प्रतिक्रियावादी राजकारण आहे . त्यात चूक त्यांची नाही .
इतिहासकार गुहा ह्यांनी ' हिंदू पाकिस्तान ' असा नवा शब्द वापरून लोकांची दिशाभूल करून नवे राजकारण सुरु केलेले दिसते . हिंदू इंडिया / मुस्लिम इंडिया असे शब्द पूर्वी राजकारणात होतेच . ब्रिटिशांनी त्या शब्दांची पेरणी खुबीने केली होती . देशाच्या फाळणीचा इतिहास गुहा ह्यांना नीट माहित असेलच . आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांचे The Dramatic Decade ' हे आत्मचरित्र त्यांनी वाचले असेलच .
स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम मताला अधिक महत्व देऊन काँग्रेसने त्यावेळी बंगालमध्ये कसे राजकारण केले ह्याचा आढावा ह्या पुस्तकात दिला आहे . स्वातंत्र्यानंतरही जेथे जेथे मुस्लिम बहुसंख्या आहे (उदाहरणार्थ प बंगाल )तेथे मुस्लिमांचा अनुनय काँगेसने केला आहे . तेच सीपीएम आणि ममता दीदींच्या पक्षाने केले आहे .
आजचे' इंडिया' गुहा ह्यांना ' हिंदू पाकिस्तान' झाले आहे असे वाटते . त्याची काय कारणे आहेत हे गुहा ह्यांनी आपल्या इतिहासात शोधून काढावीत . लोकांची उगाच दिशाभूल करू नये . We must talk of only India , Not Hindu India or Muslim India or Hindu Pakistan.
प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे जे राजकारण चालले होते त्या पुढे काँग्रेस Backfoot वरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती . 
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे . 
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते . 
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो . 
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संख्येमुळेच .



1 comment:

  1. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली !

    ReplyDelete