Thursday, May 31, 2018

माणसं: विजय तरवडे


आपल्या आयुष्यात भली-बुरी माणसे येतात , चांगली- वाईट भूमिका पार पडतात आणि भूमिका संपली की विंगेत जातात . आपण वाईट लोकांना हाकलू शकत नाहीत नि चांगल्या लोकांना थांबवू शकत नाही.” हाच माणसाकडे बघण्याचा विजय तरवडे ह्यांचा दृष्टीकोण .
अशीच विविध रंगी माणसे त्यांच्या जीवनात आली आणि गेली .त्या माणसांच्या आठवणीतून त्यांनी उभी केली व्यक्तिचित्रे . त्या माणसांच्या चटका लावणाऱ्या आठवणी त्यांनी आपल्याला सांगितल्या आहेतमाणसंह्या त्यांच्या पुस्तकातूनदीडदोन पानांत असे व्यक्तिचित्रण करणे तसे कठीण . मोजके शब्द .खुसखुशीत भाषा . मित्राशीच बोलतो आहोत असे संवाद . विजय तरवडे ह्यांना ही माणसे शाळेत , कॉलेजमध्ये आणि ते ज्या छोट्यामोठ्या नोकर्या करीत असत त्या कार्यालयात भेटली. म्हणजे ही सारी माणसं आपल्याही  आजूबाजूची . त्यांनी विमा कंपनीत अनेक वर्षे विविध पदावर काम  केलं असल्यामुळे त्यांना अनेक बेरकी , विचित्र स्वभावाची माणसे भेटली. ह्या कनिष्ठ- मध्यम वर्गीय माणसात त्यांचा माणूस शोध चालू होता .तसे पाहिलं  तर हे लिखाण थोडेसे आत्मचरित्रात्मक असेल जर ही माणसे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात आली असतील तर किंवा त्यांचा माणूस शोध चालू असेल आणि एखाद्या कथाकादंबर्यातील ही पात्रे असतील. मला ती शक्यता कमी वाटते कारण ह्या पुस्तकातीलमीविजय तरवडेच आहेत. खरं तर ही माणसं तुम्हा-आम्हाला नेहमीच भेटतच असतात म्हणून हे पुस्तक वाचताना आपणच आपल्या जीवनातील अशी माणसं शोधत जातो किंवा आठवत राहतो
विजय तरवडे ह्यांना परचुरे सरांसारखा माणूस भेटला नसता तरजिंदगी जिंदादिली का नाम है ! ‘ हे सहजासहजी समजलं नसतं .
भावे आणि शंकर सारडा सारखी माणसं भेटली नसती तर त्यांचालेखकूझाला नसता
विजय तरवडेसाधनापरिवाराशी संबंधित . त्यामुळे लेखक, स्तंभ लेखक आणि पत्रकार .
विजय तरवडे ह्यांनी वसंत बापट , प्र प्रधान , रवींद्र पिंगे , सुहास शिरवळकर , शी भावे , जयवंत दळवी आणि शंकर सारडा ह्यांची व्यक्तिचित्रे खूप सुंदर उभी केली आहेत . ही मंडळी जनातली आणि मनातली . आपण ह्या सर्वाना त्यांच्या साहित्यातून अनेकदा भेटलेलो आहोतच . शेवटी लेखकातील माणूसही आपण शोधतच असतो. त्यांनी तो जवळून पाहिला.
विजय तरवडे त्यांच्या एका प्राध्यापकाच्या आठवणीने फार व्याकूळ होतात . ते लिहितात ....
तो भूतकाळ आता फक्त माझ्या मनात आहे . तो पुन्हा जीवंत करण्याचा अट्टाहास का धरू ? तो आहे फक्त माझ्या आणि कुणा कुणा संबंधित स्वजनापुरता. कधी कधी तो स्मरतो . कंठ दाटून आला तर आवंढा गिळतो. वर्तमान हा फक्त नावापुरता वर्तमान असतो . त्यांचे एकमेव शांतीस्थान म्हणजे भूतकाळ , स्मरणकाळ !’ 
वय झालं की आपण सगळे तेथेच रमतो . हे सत्य नाही का ? हेच त्यांनी ह्या पुस्तकातून त्यांना भेटलेल्या माणसाविषयी सांगितलं आहे . ते खूप भावपूर्ण आहे . अंतर्मुख करणारे आहे
ह्या पुस्तकातील माणसं त्यांना जीव लावतात . भांडकुदळ नातेवाइकांच्या आणि खडूस साहेबांच्या विश्वात त्यांना आपण एकटे नाहीत असे वाटते म्हणून ते भरभरून ह्या माणसांवर लिहितात
अग्निमित्र प्रधान सरांनी त्यांना लिहितं केलं , वसंत बापटानी विजय तरवडे ह्यांची कवितासाधनेतछापली . कुसुमाग्रजांनी त्या कवितेचे कौतुक केलं . विजय तरवडे ह्यांच्या सारख्या नवोदित लेखकाला त्यावेळी नोबेल प्राईज मिळाल्यासारखा आनंद झाला . त्याच वेळी जयवंत दळवी ह्यांनी त्यांच्या लिखाणाचे कौतुक केलं पण सत्यकथेने  त्यांना नव्याने लिखाण करण्याचा सल्ला दिला . त्यामुळे त्यांनी तो नादच सोडून दिला
असा हा लेखक, कथाकार , कादंबरीकार आणि स्तंभ लेखक विजय तरवडे
ह्या पुस्तकात वर्णन केलेली काही माणसे त्यांना सोडून गेली. तेव्हा त्यांना अशा बातम्यांची संवय करून घ्यावयास हवी असे वाटू लागते ते भावनाविवश होताना दिसतात
अशा माणसातच रमायला हवे. जिंदगी जिंदादिली का नाम है ! हेच खरं .
( विजय तरवडे माझे फेसबुक मित्र . अजून आमची प्रत्यक्ष भेट झालेली  नाही. एकदा फोनवर बोलणे झाले होते .भेटू लवकरच . पुण्यात किंवा मुंबईत )

No comments:

Post a Comment