Wednesday, March 25, 2015

माणूस नावाचा शोध

सामान्य वाचकांना व पु काळे , चेतन भगत आवडतात तर फोडणीच्या वाचकांना भालचंद्र नेमाडे आवडतात. 
सामान्य नाट्यप्रेक्षकांना बाळ कोल्हटकर , वसंत कानेटकर , पु ल देशपांडे आवडतात तर फोडणीच्या प्रेक्षकांना विजय तेंडूलकर , गिरीश कर्नाड , कारंथ आवडतात. 
सामान्य लोकांना संदीप खरे , मंगेश पाडगावकर हे कवी आवडतात तर फोडणीच्या लोकांना ग्रेस , पु शि रेगे , विंदा करंदीकर आवडतात.
सामान्य मराठी प्रेक्षकांना ' दुनियादारी ' , 'आंधळी कोशिंबीर ' , ' मुंबई - पुणे - मुंबई' हे चित्रपट आवडतात तर फोडणीच्या प्रेक्षकांना ' अ रेनी डे ' , ' जोगवा' हे चित्रपट आवडतात.
अशी मोठी यादी करता येईल.

If you divide into two groups ( Classes and Masses ) , then it is somewhat true. I have just classified into these two groups as an example. It may vary.

कधी कधी आपण सामान्य असतो तर कधी कधी आपण सामान्याहून वेगळे असतो. त्यामुळे कलाकृतीची mix निवड करतो. आवड निवड बदलते .


Good ones are those which are liked by masses as well as classes.
Now the problem is time. Masses like it short and sweet while classes do not mind a lengthy one provided it has readability.


माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात. एक : वाचलेली पुस्तके. दोन : भेटलेली माणसे. ही माणसे प्रत्यक्ष जीवनात भेटत असतातच. आपण ही माणसे पुस्तकासारखी वाचली पाहिजेत. आपल्याला जमतं असं नाही. पुस्तकातून , कादंबर्यातून , नाटकातून आणि सिनेमातून आपल्याला माणसे भेटत असतात. नाटकात/सिनेमात  आपण ती नटाच्या रूपाने पहात असतो. आपला माणसे वाचण्याचा अभ्यास नकळत होत असतो. 
हा माणसांचा शोध आपले जीवन समृद्ध करीत असतो.

ज्या ज्या वेळी मी एखादे नाटक , सिनेमा बघितला किंवा एखादे पुस्तक वाचले तेव्हा तेव्हा मी फेसबुकवर  त्या संबंधी माझ्या स्टेटसवर नोंदी केल्या , त्याच येथे देत आहे. मला जे आवडले किंवा खटकलं ते मी लिहिलं. प्रत्येकाची आवडनिवड निराळी असते ह्याची मला जाणीव आहे.

' एम. एच. ०२ डी.एल. ५२६२

'अविष्कार'ने मिलिंद बोकील ह्यांच्या 'संकेत' ह्या कथेवर आधारित ' एम. एच. ०२ डी.एल. ५२६२' हा दीर्घांक सादर केला. पार्ल्याच्या साठे महाविद्यालयाच्या सभागृहात बर्यापैकी प्रेक्षक आले होते.ह्यावरून प्रायोगिक नाटकाच्या चळवळीला बर्यापैकी गर्दी जमतेय हे चांगले लक्षण दिसतेय. प्रयोग ठीक होता. कथेचा जीव लहान होता. खाण्यापिण्याशिवाय शरीराला इतर ही गरजा असतात हा विषय. एक मुलगा असलेली तरुण घटस्फोटिता. कुणात तरी गुंतत जाते. शरीराची ओढ अस्वस्थ करते. स्वतःच्या मुलाची थोडीशी अडचण वाटू लागते. मनाची घालमेल चालू असते. जाणिवांचे इंजेक्शन असते कां? असेल तर किती बरे होईल. माणसाच्या विविध जाणीवा. त्यात शरीराच्या जाणीवा असतातच. अशा एका स्त्रीच्या मनाचा घेतलेला शोध. एका घटस्फोटीतेचं मन अस्थिर झालयं . तिच्या शारीरिक जाणीवामुळे. ह्या दीर्घांकात दोनच पात्रे. आई आणि मुलगा. मानसी कुलकर्णी आणि शशांक ह्या दोघांनी सुंदर काम केले आहे. अलिकडेच महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका सादर करण्यात आली होती. टीव्हीवर छोटीशी झलक पाहिल्याचे स्मरते. लेखकाने घेतलेला हा स्त्री मनाचा शोध.

समुद्र 


मिलिंद बोकील ह्यांच्या ' समुद्र ' ह्या कादंबरीवर आधारित चिन्मय मांडलेकर लिखित आणि दिग्दर्शित त्याच नावाचे नाटक पहाण्यात आले. प्रमुख भूमिका चिन्मय आणि स्पृहा जोशी ह्यांची. जरा वेगळा विषय. माणसाच्या मनाचा घेतलेला शोध. समुद्राची विविध रूपे असतात आणि त्याचा तळ शोधणे कठीण असते. तसेच माणसाचे मन . ते दोलायमान असते. बदलत असते. नवरा - बायकोची ही गोष्ट. त्यांच्यातील निर्माण झालेला तणाव. इंटुक बायको वेळ घालवण्यासाठी बुक क्लबमध्ये जात असते. स्वतःच्या व्यवसायात मग्न असलेला नवरा इंटुक पत्नीशी संवाद साधू शकत नाही. बुक क्लबमध्ये चर्चा करीत असताना बायको नकळत एका पुरुषाच्या सहवासात येते आणि गुंतत जाते व शरीरसंबंधापर्यंत प्रवास होतो. त्यामुळे दोघामध्ये वादळ निर्माण होते. दोघांची दुभंगलेली मने.
विकएन्डला एका समुद्रकाठी असलेल्या हॉटेलवर सुट्टीसाठी येतात. आणि त्यांच्यातील असलेल्या विसंवादावर संवाद म्हणजे भांडणच सुरु होते. दोघानाही दोघांच्याही मनाचा तळ समजत नसतो. त्यांच्यातील संवाद,वादविवाद म्हणजे हे नाटक. अलिकडे सर्वच तरुण मंडळीत असं घडताना दिसतंय. म्हटलं तर वास्तववादी. रिलेशनशिपच्या जमान्यात हे तसं नवीन नाही. स्त्री - पुरुषांची निखळ मैत्री असू शकते कां ? नेहमीच ह्या मैत्रीचा शेवट शय्येपर्यंत जात असतो कां? त्यात काही वावगं आहे कां? माणसाचे म्हणजे स्त्री- पुरुषांच्या मनाचा तळ समजू शकतो कां? पुरुष नेहमी कसा वागतो ? स्त्रीला म्हणजे तिच्या मनाला कसं समजून घ्यायचे ?

पुरुषाचा बाहेरख्यालीपणा समाज खपवून घेतो.बरेचदा रूढीपरंपरेत तो समजून घेतला जातो.पण एखाद्या बाईने पतीव्यातिरिक्त परपुरुषाशी कारणपरत्वे केलेला संग समाजमान्य नसतो. किंबहुना समाजात स्त्री लक्ष्मणरेषेपलीकडे गेलेली चालत नाही. याच कारणाने जेष्ठ नागरिकांना ही नाटकातील गोष्ट पटण्यासारखी नाही.
ह्या नाटकातील संवाद हेच माणूस मन शोधण्याचा प्रयत्न करतात. 'पुरुषी मन असेच असतं ' अशी प्रतिक्रिया एका स्त्री- प्रेक्षकाची. सिनियर मंडळीना हे नाटक मुळीच रुचलं नाही. नाटकातील स्त्रीपात्राने केलेलं स्वतःचे समर्थन त्यांना पटणं शक्य नव्हतं.
चिन्मय आणि स्पृहा ह्यांची कामे उठावदार झाली आहेत. पण नाटकातील स्त्रीपात्राच्या भूमिकेत ती शोभून दिसली नाही कारण ती वयाने खूप लहान वाटते.
नेपथ्य आवडले नाही. समुद्र किनारा आणि टेकडी उभी करणे अवघड होते तरीही नेपथ्य जमलेच नाही.
नाटक वेगळे आहे पण म्हणावे तसे जमले नाही. चिन्मय आणि स्पृहा ह्यांच्या लोकप्रियतेमुळे हे नाटक चालेल कदाचित. लेखकाचा माणूस शोध लक्ष वेधून घेतो. नव्या पिढीचे हे नवे प्रश्न आहेत. 


लग्न पहावे करून

 " लग्न पहावे करून " हा चित्रपट पाहिला. ही गोष्ट आहे ," शुभ विवाह " ही लग्न जुळवणारी संस्था काढणारे निशांत आणि आदिती ह्यांची . शेवटी ती दोघे आपलेच लग्न कसे जमवतात हे पाहण्यासाठी पूर्ण सिनेमा पहावा लागेल. त्यांच्या संस्थेचे ध्येय वाक्य आहे " इथे लग्न टिकते " . हा सिनेमा तसा हलका फुलका पण खूप काहीं सांगून जाणारा. १ १ वी १ २ वीच्या मुला- मुलीचे प्रेम प्रकरण , अमेरिकेला जायला मिळेल म्हणून लग्नाला तयार झालेली मुलगी मुलाला अमेरिकेत नोकरी मिळणार नाही हे कळल्यावर लग्न कसे मोडते , दोनदा जुळलेले लग्न होतच नाही कारण ज्या मुलांशी लग्न जुळते तीच मरण पावतात म्हणून लग्नाचा विचार सोडून देणारी आदिती " इथे लग्न टिकते " असे घोष वाक्य समोर ठेऊन विवाह जुळवणारी संस्था काढते. त्यावर काढलेला हा सिनेमा. कसलंही लॉजिक नसलेला हा म्याजीक सिनेमा. चांगला जमला आहे. संवाद छान आहेत. . कलावंत आपल्याला सिनेमा पूर्ण पहावयास लावतात हेच सिनेमाचे वैशिष्ट्य.
आजच मटात वाचलेले एक वाक्य. " विवाहसंस्था ही दोन जीवांच्या सुखासाठी निर्माण झालेली नसून स्त्रीपुरुषांची आर्थिक आणि लैंगिक युती होऊन त्या योगे समाजप्रवाहाचे सातत्य टिकवणे हा या मागील हेतू असतो. " असाच शोध ह्या चित्रपटात घेतला आहे असे वाटते.
पूर्वी लैंगिक युतीसाठीच विवाह होत असत. आज आर्थिक युती तितकीच महत्वाची ठरते आहे. मुलांना शिकलेली मुलगी किंवा कमावणारी मुलगी त्यासाठीच हवी असते. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे लैंगिक युती सहज शक्य झाली आहे त्यामुळे विवाह हवाच कशाला ? असाही नवा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्याच विषयावर Mr.and Mrs. हे  नवे नाटक आले आहे. त्या नाटकात असाच माणूस शोध घेतला आहे. मराठी नाटक वयात येऊन खूप वर्षे झाली. पण आजच्या तरुणाईचे प्रश्न घेऊन माणूस शोध करणारया कलाकृती अधिक लक्ष वेधून घेताना दिसतात.


मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटनी कम्प्युटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण Technical application मध्ये सर्वजनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.लेखकाने स्वतःचा घेतलेला शोध.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.


Lunch box - A Art Film

A quite different movie from regular films.I am impressed by the performance of Irrfan Khan. 
He has once again proved that he is a superb 
actor. His expressions with body language show that that he does not need any dialogue. One cannot forget his character - a widower who is going to retire. Nirmat Kaur who played the role of Ila , a woman in crises is a genius in 
acting. Ila is neglected by her husband because of his extra- marital relationship and she is trying to find out happiness in her life. Irrfan feels that Bhutan is the best place to settle as happiness index of Bhutanis is the  highest in the world. The movie tries to tell us that sometimes catching a wrong train may  take us to the right destination.The film is based on weak foundation and as such there is no logic in the story of Lunch Box.The Story has no good ingredients but gives many messages for understanding the  complex life. Watching Irrfan and Nirmat Kaur in the film is a great learning experience.

पीके

सध्या गाजत असलेला 'पीके' कसा आहे हे पाहण्यासाठी मुद्दाम गेलो आणि घोर निराशा झाली. ह्या पूर्वी ह्याच विषयाशी जवळचे असलेले ' देऊळ ( मराठी ) ' आणि ' OMG ( हिंदी )' हे दोन चांगले चित्रपट पाहीले होते. हा चित्रपट एकदम भंकस वाटला. दुसर्या ग्रहावरून पृथ्वीवर उतरलेला पण परत जाण्याचा रिमोट हरवलेला हा दुसर्या ग्रहावरचा माणूस म्हणजे आमिरखान. त्या ग्रहावरून येताना काय पिउन आला होता ते माहित नाही पण हा ' पीके ' तत्वज्ञानी आहे असे म्हणतात. त्याची वाह्यात बडबड विनोदाचा आधार घेऊन जे काही सांगते ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगितले असते तर लोकांचे अधिक चांगले प्रबोधन झाले असते.
ईश्वर, धर्म आणि देवाचे व्यवस्थापक ह्यांच्यावर विनोदाचा आधार घेत भाष्य करणारा हा 'पीके' काय पिउन आला आहे हे शेवटपर्यंत समजत नाही. त्यामुळे चांगला विषय भंकस पद्धतीने मांडला आहे. राजू हिराणी ह्यांचे लेखन , संपादन आणि दिग्दर्शन कल्पनाशून्य आहे. विनोदाला उंची नाही व प्रबोधन करण्यासाठी केलेला हा सिनेमा संवादामुळेच वादग्रस्त होणे स्वाभाविक आहे. आमिरखानचे एवढे वाईट काम मी ह्यापूर्वी पाहीले नाही. सत्यम , शिवम आणि सुंदरम नसलेला हा सिनेमा पूर्ण वेळ पाहणे ही एक शिक्षा आहे. असे असूनही मार्केटिंग खूप झाल्यामुळे गल्ला मात्र भरला आहे. 

निवडणुकीतील पुस्तक बॉम्ब

The Accidental Prime Minister - Sanjay Baru
 Crusader or Conspirator - P C Parakh 
' Insider ' can always creates problems if he is not taken care. Very good journalistic analysis based on political understanding. These books were released before Lokasabha elections. It has damaged the Congress party. हा ही माणूस शोध. राजकीय व्यक्तींच्या सहवासात आल्यावर पत्रकार आणि शासकीय अधिकारी त्यांना खूप जवळून पहातात. त्याचे बरे -वाईट गुण त्यांना माहित असतात. एकदा संबंध संपल्यानंतर ते मोकळे असतात. आणि आत्मवृत्त लिहिताना अनेक गोष्टीचा स्फोट करतात. त्यातील खरं काय खोटं काय?  हे  आपण शोधायचं ? 


आर के लक्ष्मण 


कित्येक वर्षे TOI किंवा मटा हातात घेतला की पहिले लक्ष जात असे ते आर. के. लक्ष्मणच्या कार्टूनकडे. ते भाष्य खूप काही सांगून जात असे. त्यामुळे ही बेरकी राजकीय मंडळी समजू लागली. व्यंगचित्रातून व्यक्तिमत्व उभे राहत असे. माणसांच्या अंगातील व्यंग दिसू लागले. ज्याचे व्यंगचित्र , तो माणूसही दिलखुलास हसत असे. प्रहार असे पण विखार नसे. 
एका समारंभात प्रत्यक्ष व्यंगचित्रे काढताना  आर.के .ना बघितले. WOW !! एका प्रतिभावंत कलाकाराला जवळून पहायला मिळाले. भाषण न करता व्यंगचित्र काढून खूप काही बोलणारा हा अनोखा माणूस. 
असा हा माणूस गेली काही वर्षे आजारी असल्याच्या बातम्या ऐकून मन उदास होत असे. आज सारे संपले. काही वर्षे नित्यनेमाने रोज भेटणारा हा भला माणूस गेला हे ऐकून मन उदास झाले. त्यांचे व्यंगचित्राचे पुस्तक पुस्तकाच्या कपाटात आहे. केंव्हा ही हातात घेतले की खूप काही सांगून जाते. व्यंगचित्रातून दिसणारे ही माणसे आपले जीवन समृद्ध तर करतातच पण आपल्याला माणसाची व्यंगे दाखवून अंतर्मुख करतात. आर के लक्ष्मण ह्यांनी हाच मोठा संस्कार वर्तमानपत्र  वाचणार्या आम्हा वाचकावर केला आहे. एक छोटेसे चित्र खूप काही शिकवून जाते. आपण त्या व्यंगचित्रातून माणसे शोधत असतो. 


drnsg@rediffmail.com 





No comments:

Post a Comment