Tuesday, April 28, 2015

चांदोरे- एक अनोखे गाव

चांदोरे - एक अनोखे गाव 
२6 एप्रिल २०१५ : कालचा दिवस एक वेगळा दिवस. दिवसभर चांदोरे ह्या गावात फेरफटका मारण्यात घालविला. हे एक तंटामुक्त गाव. हे एक स्वछ, सुंदर गाव. ह्या गावात प्रत्येक घरात शौचालय आहे. कोणीही रस्त्यावर विधी करू शकत नाही. गावात केरकचरा फेकला तर ग्राम पंचायत ५०० रु. दंड वसूल करते. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळवणारी ही ग्राम पंचायत. आता अखिल भारतीय पुरस्कार मिळवीत आहे. असे हे  सुंदर ,स्वछ , साक्षर आणि तंटामुक्त गाव. मुंबई - गोवा रस्त्यावर माणगाव जवळ असलेले , माणगाव- श्रीवर्धन रस्त्यावर वसलेले आणि म्हळसा ह्या नैसर्गिक बंदरापासून जवळच असलेले पश्चिम घाटाच्या परिसरातील हिरवेगार गाव. 
  चांदोरेला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे चालू असलेले उत्खनन आणि संशोधन .
Excavation Site 
 माझा एक कामधंद्यात रमलेला मित्र अरुण भार्गव हा मुंबई विद्यापीठात पुराणवस्तू शास्त्रात अंशकालीन अभ्यासक्रम करीत असतो. डॉ कुरुष दलाल आणि त्यांचे ८-१० विद्यार्थी तेथे उत्खनन आणि संशोधन करीत असतात.
डॉ दलाल ह्यांचा ९३ वर्षाचा एक विद्यार्थी आमच्याबरोबर होता. त्यांचे नाव केशव खामबडकोणे. .त्यांचा उत्साह पाहून आपण थक्क होतो.  सध्या त्यांचा तेथेच मुक्काम असतो. हे काम प्रत्यक्ष पाहण्याची अपूर्व संधी आम्हाला मिळाली. दिवसभर त्यांच्याबरोबर तो परिसर पहात होतो. तो एक वेगळा अनुभव होता. 

ह्या उत्खननामुळे चांदोरे गावाचा १००० वर्षापूर्वीचा इतिहास पुढे येत आहे. शिलाहारा राजवटीच्या काळातील काही अवशेष उत्खननात  सापडले आहेत. मराठा साम्राज्यापुर्वीचा हा काळ आहे. तीन देवालये सापडली आहेत. एका झाडाजवळ एक नंदी दिसून आला. त्यामुळे तेथे एखादे देवालय असण्याची शक्यता असल्यामुळे उत्खनन सुरु केले आणि एक शिवाचे मंदिर सापडले. त्याच्या बाजूला एक पायर्या असलेली विहीर सापडली व त्या विहरीत एक विहीर सापडली. काही हिरो स्टोन्स आणि सती स्टोन्स सापडले आहेत. 

मुंबई विद्यापीठाचे इतिहास संशोधन विभागाचे प्रा. डॉ. कुरुष दलाल आणि त्यांचे विद्यार्थी गेल्या तीन वर्षापासून तेथे उत्खनन करीत आहेत. अशा संशोधनाला निधी उपलब्ध नसतो. काही सामाजिक संस्था आणि महाड येथील उद्योग संस्था सढळ हाताने मदत करताना दिसतात. एका झाडाजवळ नंदीची मूर्ती सापडली आणि देवालयाचा शोध सुरु झाला.सध्या उत्खननाचे काम चालू आहे. 


आम्ही काढलेले फोटो टाकतां येत नाहीत. खूप समजून घेण्यासारखे आहे.

सध्या तीन देवालये, हारागौरी मूर्ती , नंदी, सती  मूर्ती, अनेक नाणी , विष्णू , हनुमान ह्यांच्या मूर्ती, देवालयाच्या आजूबाजूचा परिसर, अनेक स्तंभ सापडले आहेत. हे सर्व वेगवेगळ्या परिसरात सापडले आहेत.
म्हळसा  हे नैसर्गिक बंदर जवळच आहे. ह्या बंदरातूनच आंतरराष्ट्रीय व्यापार होत असावा. अशाच ऐका बोटीतून काही ज्यू येथे येऊन पोहोचले. ते व्यापारी होते . त्यांच्या बोटीला काहीतरी झाले आणि ती बिघडली त्यामुळे ते आपल्या मायदेशी परतू शकले नाही. त्यांनी येथेच वस्ती केली . ते कोकणी झाले. त्यांनी चांदोरकर हे आडनाव लावले. त्यांचा तेली हा व्यवसाय होता. ते येथील संस्कृतीत मिसळले . १९९० मध्ये सर्वजण इस्त्रायलला निघून गेले. तेथे त्यांची सेमिटरी- स्मशानभूमी - आहे.



NANDI -  Excavation started after finding out Nandi
ह्या भागाला ' कलावंतीनीचे घरटे ' असे म्हणतात, व्यापारी आणि खलाशी ह्या भागात येतजात असत. त्या गरजेतून असे नाव पडले असावे. 
हा भाग अश्मयुगी असण्याची शक्यता आहे , असा संशोधकाचा अंदाज आहे. सध्यातरी ८०० ते १००० वर्षाचा इतिहास शोधण्यात काहीसे यश मिळाले आहे. 


गौरी हारा – शिव पार्वतीची मूर्ती 





Friday, April 24, 2015

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ? – त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात......
डॉ स्वामिनाथन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय समिती (National Commission of Farmers –NCF) नेमण्यात आली होती. ह्या समितीचा अहवाल २००७ साली संसदेला सादर करण्यात आला होता. २०१४ सालापर्यंत यूपीए सरकार राज्यावर होते. ह्या समितीच्या ज्या शिफारशी होत्या त्यापैकी एकही शिफारस त्या काळात अंमलात आणली गेली नाही. आणि तो अहवाल तसाच पडून राहिला.  
दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्मह्त्तेचे प्रमाण वाढत आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यांची  जिद्द्द संपल्यामुळे ते आत्महत्तेचा मार्ग निवडत आहेत ही दुर्दैवी बाब आहे.
हे असे कां घडते आहे ? ह्याचा उहापोह डॉ स्वामीनाथन ह्यांनी अनेक वेळा केला आहे. त्यांनी लिहलेल्या एका लेखातून घेतलेले खालील महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.
Dr M S Swaminathan 
१)    ४५ टक्के शेतकर्यांना शेती व्यवसाय सोडून द्यायचा आहे असे एका सरकारी पाहणीत लक्षात आले आहे.असे असेल तर कृषी पदवीधर आणि साक्षर तरुण शेती व्यवसायात जातीलच कसे ? हा एक प्रमुख प्रश्न आहे. मुळात शेती पदवीधर शेती न करता नोकरीच्या मागे लागला आहे.
२)    अल्प भूधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती वाढतच जाणार. उदाहरणार्थ ५० वर्षापूर्वी एका शेतकर्याकडे १०० एकर जमीन होती. त्याला ६ मुली आणि ३ मुले होती. प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी त्याने काही एकर जमीन विकली. उरलेल्या जमिनीचे वाटप ३ मुलात झाले. प्रत्येकाला २ किंवा ३ मुले-मुली आहेत. त्यांच्यात पुन्हा जमिनीचे वाटप झाले. म्हणजे सध्या प्रत्येकाकडे १० -१५ एकर किंवा त्याहून कमी जमीन आहे . अजून १० वर्षाने बहुधा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या वाट्याला एकही एकर जमीन येणार नाही. आजच जे अल्प भूधारक आहेत त्यांची परिस्थिती ह्याहून वाईट असणार आहे. म्हणजे अल्प भूधारक दिवसेंदिवस वाढतच जाणार.
३)    जर अल्प भूधारकांची संख्या अधिक आहे तर शेतीतून फायदा होण्याची शक्यता फारच कमी होत जाणार. शेतकरी कर्जबाजारी होत जाणार आणि त्याला आत्महत्तेशिवाय पर्याय नसणार . त्याकरिता शेती आणि शेती व्यतिरिक्त पण शेतीला पूरक असे उत्पन्नाचे साधन शेतकऱ्याला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
४)    प्रत्येक शेतकऱ्याला ( स्त्री- पुरुष) कमी व्याजाचे (म्हणजे ४ %)  कर्ज उपलब्ध होऊन देणे आवश्यक आहे. जमीन पुरुषाच्या नावावर असल्यामुळे स्त्रीला कर्ज मिळू शकत नाही. स्त्रीला किसान क्रेडीट कार्डही मिळत नाही.  हे ही लक्षात घेतले पाहिजे . ते चुकीचे आहे. विदर्भात हे आढळून आले आहे,
५)    हंगाम संपल्यानंतर धान्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहतो. डेअरीच्या क्षेत्रात तशी बर्यापैकी उत्तम व्यवस्था आहे. अन्नधान्य साठ्याची सोय आणि योग्य ते बाजार मूल्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
६)    अन्नधान्यासाठी संपूर्ण भारतासाठी एकच बाजारपेठ ( Indian Single Market ) असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात धान्य विकण्याची मुभा असली पाहिजे. फक्त त्याच प्रांतात शेती माल विकण्याची सक्ती नको.
७)    धान्याला योग्य तो बाजारभाव मिळालाच पाहिजे. खर्च वजा जाता ५० टक्के अधिक फायदा होईल असा भाव मिळणे आवश्यक आहे. तशी शिफारस करण्यात आली होती. त्या बाबतीत काहीच झाले नाही. ऊसाला खूप जास्त भाव वाढवून मिळाले आणि ऊस cकारखाने तोट्यात गेले हे ही लक्षात ठेवले पाहिजे.    
८)    जो पर्यंत अन्नधान्याला योग्य ते विक्री मूल्य मिळत नाही तो पर्यंत तरुण मंडळी शेतीकडे आकर्षित होणार नाही व हे लोक शहराकडे धाव घेतील आणि बेकारांचा तांडा वाढत जाइल.
९)         शेती व्यवसायातून फायदा होण्यासाठी अनेक उपायांची गरज आहे. त्यासाठी अनेक मार्ग दाखविण्यात आले आहेत. प्रत्येक धान्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत.
१०)                       जो पर्यंत शेती आणि शेती व्यतिरिक्त उत्पन्नाची साधने वाढत नाहीत तो पर्यंत शेती करणे कठीणच होत जाणार.
११)                       शेती व्यवसायाकडे तरुण कसा आकर्षित होईल ह्यासाठी अनेक उपाय समितीने सुचविले आहेत. कृषी महाविद्यालये , कृषी विद्यापीठे आणि भारत सरकारच्या अनेक कृषी विकास संस्थांच्या( ICRI, IARI, ETC.,) माध्यमातून हे काम  करणे सहज शक्य आहे.
१२)                       शेती व्यवसायातून फायदा आणि बौद्धिक आनंद जर मिळत असेल तरच तरुण मंडळी शेतीकडे वळतील. शेतकऱ्यांची मुले शेतीत रमली तरच चांगली शेती शक्य आहे.
१३)                       कृषी उत्पादन करताना नवीन तंत्रशास्त्राचा उपयोग अत्यंत  महत्वाचा आहे. शेतीचे आधुनिकीकरन अत्यंत महत्वाचे आहे. बायोटेक्नोलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान ह्याचा उपयोग फार महत्वाचा आहे. शेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला तसे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. हवामान शास्त्र, बाजारपेठ आणि व्यापार क्षेत्र ह्यासाठी तरुण शेतकरी ज्ञानी असणे आवश्यक आहे.
१४)                       तरुण शेतकरी हा आधुनिक झाला , शिक्षित झाला आणि शेती हा एक फायदा मिळवून देणारा व्यवसाय आहे असे समजून हा व्यवसाय करू लागला तरच तो यशस्वी होईल. उत्तम शेती , मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण होती. आज अल्प भूधारकाची शेती उत्तम असू शकत नाही. मध्यम धंदा उभारण्याची मानसिकता तरुणांमध्ये नाही आणि कनिष्ठ नोकर्या उपलब्ध नाहीत. Skilled and trained Labour उपलब्ध नाहीत.
१५)                       आज जमीन थोडी व त्यावर अवलंबून असलेली माणसे  खूप अधिक आहेत व ती वाढतच आहे. पण शेतकऱ्यांच्या जवळ असलेली जमीन मात्र कमी होत आहे त्यामुळे  अल्प भूधारकांची संख्या वाढतच राहणार . कारण कुटुंबामध्ये जमिनीचे विभाजन होतच राहणार. हे जसजसे होत जाते तसतसे आपल्याजवळ असलेली जमीन विकण्यासाठी शेतकरी पुढे येत जातात आणि शेत जमीन इतर व्यवसायासाठी विकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ४५ टक्के शेतकरी जमीन विकण्याच्या विचारात आहेत. शेतीत त्यांना फायदा होत नाही. ते कर्जबाजारी आहेत आणि शेतीला लागणारे भांडवल ते उभे करू शकत नाहीत.
१६)                       शेती करताना इतर उद्योग करीत पैसा मिळविता आला तरच तरुण शेतकरी आपल्या गावात राहण्याची शक्यता आहे आणि हा प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यावरच शेतीचे भविष्य अवलंबून आहे.
१७)                       अल्प भूधारक शेतकर्यांना शेती पासून फायदा जो पर्यंत होणार नाही व त्यासाठी योग्य ती साधने , शिक्षण आणि तंत्र त्याला उपलब्ध नसेल तो पर्यंत परिस्थिती सुधारणे कठीण आहे. शेतकर्याला बाजार मूल्य मिळणे महत्वाचे आहेच. Conservation – Cultivation – Consumption – Commerce ह्या चार गोष्टीचा विचार करून शेतीकडे पाहणे आवश्यक आहे.
१८)                       शेतीला पूरक उद्योगाची उभारणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. हे छोटे उद्योग गावाच्या परिसरातच असणे आवश्यक आहे. ‘ शेतातून घराकडे – Farm to Home ही साखळी निर्माण झाली पाहिजे .
१९)                       सर्विस सेक्टर शेताच्या जवळ आला पाहिजे तरच शेतीची अर्थ व्यवस्था आणि शेतीचे आधुनिकीकरन होणे शक्य आहे.
२०)                       पाणी उपलब्धता आणि बाजार हमी हे दोन प्रमुख अडथळे दूर होण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हे शासकीय लक्ष हवे. More CROP per DROP ही घोषणा न राहता त्यासाठी यंत्रणा उभी करणे महत्वाचे आहे.
भारतीय शेती कठीण काळातून जात आहे. हरित क्रांती झाली . आज अल्प भूधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या हीच एक मोठी समस्या आहे. त्यांना शेती किफायतशीर नाही. म्हणूनच आत्महत्या प्रमाण वाढत आहे. त्यासाठी वर उल्लेख केलेले उपाय योजने अवश्य आहे. Right to Food योजना आली हे खरे आहे . पण शेती उत्पादन कमी झाले तर पुन्हा देशाला PL४८० चे दिवस येणे दूर असणार नाही. ही धोक्याची घंटा आहे.

( मी शहरातला माणूस . शेतीचे काय माहित ? असा प्रश्न विचारला जाईल . आमची शेती कुळ कायद्यात गेली. ते बरेच झाले म्हणायचे . शिक्षण मिळाले हे नशीब. M.Sc. Physics झाल्यानंतर मी सर्वात प्रथम मराठवाड्यातील शेतकी कॉलेजमध्ये  Soil Physics हा विषय काही महिने शिकवीत होतो. त्यामुळे शेतीविषयी माहिती झाली. पुढे Ph.D. करीत असताना शिष्यवृत्ती संपल्यामुळे माटुंग्याच्या Cotton Technological Research Laboratory मध्ये Senior Scientific Assistant (Information)  म्हणून काम करताना कापूस संशोधनाची भारतातील सर्व संस्थांची माहिती एकत्रित करण्याचे काम माझ्याकडे होते. ही माहिती ICAR आणि भारत सरकारकडे जात असे. त्यामुळे कापूस आणि इतर शेती विषयाची भरपूर माहिती मिळत असे . त्यामुळे शेती संबंधी सर्व बाजूनी विचार होत असे. तो अनुभव पाठीशी होता. पुढे मी दुसर्या क्षेत्रात गेलो. पण हा विषय मला बर्यापैकी माहित असल्यामुळे मी ह्या विषयावर लिहिण्याचे ठरविले  गेल्या काही वर्षापासून हा विषय खूप चर्चिला जात असून त्याचेच राजकारण केले जात आहे. वरील मूळ प्रश्नांना उत्तरे शोधली जात नाहीत व राजकीय सोय पहिली जाते त्यामुळे हा प्रश्न आहे त्या ठिकाणीच राहतो आहे. ) p

Sunday, April 12, 2015

इंटरनेट सुरु होण्यापूर्वी ......


युरोपमधील सर्व विद्यापीठातील संगणक एकमेकांना जोडले गेले होते व संशोधक माहितीची आदानप्रदान करीत होते. त्याच वेळी (१९७५- १९७६ )TIFR मधील महासंगणक प्रायोगिक म्हणून युरोपमधील मुख्य संगणकाला जोडला गेला होता. VJTI मध्ये त्या संगणकाचे एक टर्मिनल होते. संशोधकांना एका क्षणात जगातील संशोधनाची माहिती उपलब्ध होत होती. 
भारतातील सर्व संशोधन प्रयोगशाळा , IIT, आणि विद्यापीठे ह्यांच्यातील संगणक एकमेकांना जोडावे आणि TIFR च्या संगणकाच्या साह्याने जगातील इतर संशोधन संस्थांशी संबंध जोडला जावा असे प्रयत्न चालू होते.
BARC , INSDOC , DRTC , आणि DST ह्या संस्था एकत्र येउन Information Science and Technolgy प्रकल्प राबवीत होत्या.
ह्या सर्व संस्थांनी एकत्र येउन Information Scientist साठी नवा अभ्यासक्रम सुरु केला होता व तसा शिक्षणक्रम आखला होता. मी माटुंग्याच्या CTRL ह्या संस्थेतर्फे ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही इतर वैज्ञानिकांना डेमो देण्याचे काम करीत असू.
मी TIFR मध्ये असाच डेमो देत होतो. त्या दिवशी डॉ जयंत नारळीकर ते बघण्यासाठी आले होते . मला त्यांच्याबद्दल माहिती होतीच. मी संगणकामध्ये त्यांचे नाव टाकले आणि काही क्षणातच त्यांचे सर्व रिसर्च पेपर असलेली यादी छापून बाहेर आली . मी ती यादी जपून ठेवली होती . माझा संगणकाशी विज्ञान माहिती अधिकारी म्हणून आलेला हा अनोखा संबंध . त्यावेळी IE किंवा गुगल नव्हते .
इंटरनेट येण्यापूर्वीचा हा अनुभव खूप मजेशीर होता. संशोधकाला तासच्या तास वाचनालयात अनेक ग्रंथात व जर्नलमध्ये शोधत बसावे लागत असे , ते लगेच सापडत नसे. हा संगणकाचा उपयोग क्रांतिकारी होता. Current Awareness Abstract काही मिनिटात उपलब्ध करून देण्याचे काम सहाय्यक विज्ञान अधिकारी करून देत असत.
भारतात ही यंत्रणा असावी म्हणून प्रयत्न चालू होते पण त्यावेळी कोणीही ह्या तंत्रज्ञानाकडे तेवढे लक्ष दिले नव्हते .
आज गुगलने जग पादाक्रांत केले आहे. माझा ६ वर्षाचा नातू मला म्हणतो , ' आजोबा , कशाला शोधत बसतां ? गुगल करा , पाहिजे ती माहिती लगेच मिळते ' .

Friday, April 10, 2015

धर्म ही अफूची गोळी नाही -२

श्रद्धा  / एक अदृश्य शक्ती  
महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध शस्त्रक्रिया विशारद होते. त्यांनी लाखो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. प्रत्येक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ते शस्त्रक्रिया सभागारातील देवाच्या फोटोपुढे नतमस्तक होत आणि मगच शस्त्रक्रिया सुरु करीत असत. एकदा त्यांना ह्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी असे उत्तर दिले , ' माझ्या हाताच्या पलिकडेही अशी काही शक्ती आहे की तिच्या हातात संपूर्ण यश मिळण्याची किमया आहे म्हणून मी त्या शक्तीला नमन करतो, माझा तसा विश्वास आहे. माझी तशी श्रद्धा आहे.माणसाची अशी श्रद्धा असते. इतरांच्या दृष्टीने ती अंधश्रद्धा असू शकते. ती नास्तिक माणसे आस्तिक माणसाला विनाकारण दोष देत असतात. 
आपण परीक्षेला जात असतो . खूप अभ्यास केलेला असतो. आपल्याला आपले मित्र - हितचिंतक शुभेच्छा देतात . ' बेस्ट ऑफ लक ' असे म्हणतात . हे लक कुठे असतेत्याचा काही उपयोग होतो कांयश तर आपल्या अभ्यासावर अवलंबून असते. मग ह्या शुभेच्छांचा काय उपयोग?
रशियातील चर्च 
पाश्चिमात्य देशातही अशा शुभेच्छा कां देत असतात ?
त्यांच्याकडे बहुतेक सर्वजण बोलताना शेवटी ' God Bless You ' असे कां म्हणतात?
एवढेच कायसकाळी कोणी भेटल्यास ओळख नसली तरी ' Good Morning ' असे कां म्हणतात ? त्यामुळे आपली सकाळ खरोखरच चांगली जाते कां? ह्या शुभेच्छा कोण अंमलात आणतो ? ही अदृश्य शक्ती कुठे असते. त्याचा आपल्याला काय उपयोग होतो?  
आपण आपल्या आई- वडिलांच्या किंवा वडीलधार्या माणसांच्या पाया पडतो किंवा वाकून नमस्कार करतो. त्यांचे हात आपल्या पाठीवर पडतात व ते आपल्याला ' यशस्वी भव ' असा आशीर्वाद देतात. त्या आशीर्वादामुळे आपण यशस्वी होतो कांह्या शुभेच्छा किंवा आशीर्वादामुळे आपणास नकळत एक शक्ती प्राप्त होत असते कां ? एक आत्मिक बळ मिळत असते कां?
Life After Death: पुनर्जन्म
I read biography of Steve Jobs. At the end of the book there are comments on existence of God and Life after death by Steve. 
स्टीव जॉब्स 

He says,
"I am fifty-fifty on believing in God. For most of my life, I have felt that there must be more to our existence than meets the eye. I like to think that something survives after you die. It is strange to think that you accumulate all this experience, and may be a little wisdom, and it just goes away. So I really want to believe that something survives, that may be consciousness endures.
But on the other hand, perhaps it is like an On-Off switch- Click! And you are gone.
May be that is why I never liked to put On-Off switch on Apple devices.
This great man of technology realized the importance of life after death when he suffered from the cancer and embraced the death every day. In his young age , he left everything and gone to Himalayas for becoming a Monk. He did not opt for becoming a Monk. But he returned from Himalayas with different attitude towards life,
When Steve Jobs came to know from medical test report that cancer is detected. First thing he did is asking his friend Larry Brilliant, "Do you still believe in God?" Larry said that he did and they discussed the many paths to God that had been taught by the Hindu Guru Neem Karoli Baba. Larry asked, what was wrong." I have cancer' Jobs replied.
Dalai Lama explains in a very simple words about life after death. According to Buddhism, although the nature of cause and effect may be different, they must have the same essential properties, they must have a definite connection; otherwise same cause cannot result in same effect. For example, the human body can be perceived - it has form and color - and therefore, its immediate source or cause must have these qualities. But mind is formless, and hence its immediate source or cause must also be formless. In analogy, the properties of seeds of medical plants produce medicines, and the seeds of poisonous plants produce poison.
Both mind and body must have immediate sources. Both mind and body begin in this life as soon as conception occurs. The immediate source of body is that of parents. But physical matter cannot produce mind, nor mind matter. The immediate source of a mind must, therefore, be a mind which existed before the conception took place; the mind must have continuity from a previous mind. This we hold to prove the existence of a past life. On this basis, we can conclude that past life existed and thence the future life will exist also. If belief in afterlife accepted, religious practice becomes a necessity, which nothing else can supplant, in the preparation for one's future life. 
 Sir Arthur Conan Doyle, Creator of Sherlock Holmes, turned spiritual & wrote quite a few books. I read this somewhere, probably original thinkers do have this question 'life after death' throughout their lives but the priority to attend to it comes very late in their life.
वैज्ञानिक आणि त्यांची श्रद्धा 
मंगळयान 
मंगलयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून ह्या मोहिमेचे प्रमुख डॉ राधाकृष्णन ह्यांनी मोहिमेपुर्वी तिरुपतीच्या बालाजीचे दर्शन घेऊन मंगलयानाची प्रतिकृती देवाला अर्पण केली . ती त्यांची श्रद्धा होती . त्यांचा देवावर विश्वास होता . तो त्यांच्यावर लहानपणापासून झालेला घरातील संस्कार होता. असे केल्याने त्यांना एक आत्मिक बळ मिळाले असणार . हा त्यांचा वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न होता. त्यांची ही श्रद्धा दुसर्या कोणासाठी हानिकारक नव्हती. काही जणांना ती अंधश्रद्धा वाटते. पण त्यांना ती आत्मबळ देणारी वाटत असावी . 
ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे व ज्यांना देव नाही असे वाटते त्यांच्यासाठी तो नाही. त्यामुळे स्वतःला आत्मिक बळ मिळण्यासाठी जे लोक देवाचे स्मरण करतात त्यांच्या कृतीवर बोलण्याचा इतरांना काय अधिकार ?
तिरुपती बालाजी 
ज्या दिवशी भारताचे "मंगळ"यान मंगळाकडे यशस्वीपणे झेपावले. त्या दिवशी सकाळपासून ह्यासंबंधीच्या बातम्या ऐकत होतो. एक वाक्य अनेकदा कानावर पडत होते. 'यान सोडण्याची जय्यत  झाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ तिरुपतीच्या बालाजीला मोहीम यशस्वी होण्यासाठी साकडं घालत आहेत'. हे खरं की बातमी तिखट मीठ लाऊन सांगतात तसे हे वाक्य बातमीत टाकलं आहे. शास्त्रीय संशोधन करतांना किंवा शास्त्रीय मोहीम चालू करताना असं देवाला साकडं कां घालावं लागतं ? मला पडलेला प्रश्न की शास्त्रज्ञांचा देवावर असलेला विश्वास? ती त्यांची श्रद्धा. ती तशी हानिकारक नाही. 
Trip to Moon or Mars is for understanding the Universe. It seems to me that Indian scientists who believe in God think that their success will depend upon the blessings of the God. That is the reason they visit Tirupati Balaji for getting blessings.
दुसर्यांच्या भावनाचा आदर करणे आवश्यक आहे. उगाच 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ' असे होता कामा नये
माझ्या ओळखीचे समाजवादी विचाराचे , देवाधर्मावर विश्वास नसलेले , परखड विचाराचे , वर्तमानपत्राचे ख्यातनाम संपादक होते. त्यांचे सहकारी देवभक्त होते. ते लघुरुद्र / सत्यनारायण पूजा करीत असत. संपादक त्यांच्याघरी तीर्थप्रसादाला व मेहूण म्हणून जेवावयास येत असत. त्यांनी त्यांच्या श्रद्धेची कधीच चेष्टा केली नाही. त्यांच्या श्रद्धेचा आदर केला.
आपल्याला जरी पटत नसले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करावयास शिकले पाहिजे .
जो पर्यंत ही श्रद्धा वैयक्तिक असते व दुसर्यांना हानिकारक नसते तोपर्यंत इतरांनी त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. ती त्या माणसाची गरज असते व त्याला आत्मिक बळ देते.
देवाचा व्यापार 
शिर्डीचे साईबाबा 
ज्या देवाचा २२४ कोटी रुपयाचा विमा काढावा लागतो तो देव कसला ? ज्या भक्तांना देवाची सेवा करताना विम्याची आवश्यकता भासते ते भक्त कसले ? जो देवच सोन्यासारखा आहे त्या देवाला ७० किलो वजनाचे सोन्याचे दागिने हवेत कशाला ? 'देव नाही मंडपातहे समजणार कधी
न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे ह्यांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार कां आवडला नव्हता? ते आज पटते. त्यांची दूरदृष्टी तर दिसून येतेच. त्यांना आजचे समाजमनही माहित होते. त्यावेळी लोकमान्य टिळकांचा उद्देश जनजागृतीचा होता. पण आज हा सार्वजनिक उत्सव हा व्यापार झाला आहे.
ईश्वर , धर्म आणि निरीश्वरवाद 
व्हॉलटेअर निरीश्वरवाद निश्चितपणे नाकारणारा होता. 
"विचारातील सर्व वस्तूतील आश्चर्याने थक्क करून सोडणारे संबंध पाहिल्यावर मला त्या अनंत सामर्थ्यसंपन्न निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी तो असला पाहिजे अशी शंका वाटावयास पाहिजे होती.
 
तो काय आहे
, कसा आहे, हे सारे वस्तुजात , हे ब्रम्हांड त्याने कसे निर्मिले याचा विचार करणे जरी धार्ष्ट्याचे असले तरी त्याचे आस्तित्वच अजिबात नाकारणे हे ही धार्ष्ट्याचेच आहे. असे त्याचे म्हणणे होते.
तुम्ही स्वतःला ईश्वराच्या निर्मितीतील एक अंश मानतात
 की शाश्वत व आवश्यक जड प्रकृतीतील केवळ एक कण अनिवार्यपणे अलग होऊन पडला आहात ?" हा विचार पुन्हा तपासून बघावयाचा असतो असे त्याला वाटत होते .
धर्म आणि विज्ञान 
धर्म ही अफूची गोळी आहे : रशियातील चर्च 
Science without religion is lame. Religion without science is blind. "I am convinced that He (God) does not play dice”, " God is subtle but he is not malicious", " I want to know the God's thoughts; the rest are details.’, "God does not care for our mathematical difficulties , He integrates empirically" said ,Einstein
Religion is more than belief in God. It also refers to "A personal or institutionalized system grounded in such belief and worship."
In science, explanations must be based on evidence drawn from examining the natural world. Scientifically based observations or experiments that conflict with an explanation eventually must lead to modification or even abandonment of that explanation. 
Religious faith, in contrast, does not depend only on empirical evidence, is not necessarily modified in the face of conflicting evidence, and typically involves supernatural forces or entities. Because they are not a part of nature, supernatural entities cannot be investigated by science. 
In this sense, science and religion are separate and address aspects of human understanding in different ways. So we can very well conclude that science and religion deal with fundamentally separate aspects of human experience.
Science is trying to understand the Nature. Those who believe in God think that the Nature is a creation of God. Some people believe in God and a few do not believe in existence of God. 
धर्म ही अफूची गोळी आहे 
"धर्म ही अफूची गोळी आहे ", असा विचार घेऊन साम्यवादी आणि पुरोगामी हे सश्रद्ध लोकांना नेहमी डिवचत असतात तेंव्हा त्यांना सश्रद्ध माणसाच्या आत्मिक शक्तीची जाणीव नसते आणि ते टोकाचा विरोध करून आपलेच म्हणणे खरे असा आव आणतात , हे चुकीचे आहे. 
दलाई लामा 
"Religion is poison. It has two great defects: It undermines race, and secondly it retards the progress of the country. Tibet and Mongolia have both poisoned by it.", said Mao to Dalai Lama. All so called socialists talk the same language.
One should note that progress must be balance against their cost. Progress has cost the people all their individuality. In communist countries, people were becoming a mere homogeneous mass of humanity. They are strictly organised, disciplined, and controlled, so that they not only dressed the same but spoke and behaved the same,
The people even seemed to have lost the habit of laughing spontaneously; they only seemed to laugh when they are supposed to laugh, and to sing when they were told to sing. This is what is noticed in communist China and Russia. Eastern Europe had similar situation and as soon as they are liberated from communism, they found the different path of spirituality.
Religion, humour and individuality are breath of life to any human. 
All pleasures and pains have their mental origins; and religions are required because without them, the mind cannot be controlled. Hence, Religion is not poison.
Different doctrines have been introduced by different exponents at different periods and in different ways. But we believe they all fundamentally aim at the same noble goal, in teaching moral precepts to mould the function of mind, body, and speech.
कोणी म्हणतं ' देवाला रिटायर करा ' तर कोणी म्हणतं  'धर्म  ही अफूची गोळी आहे '. हे  नास्तिकही  तसे बोलण्यात हिंसक आहेत. त्यांना त्यांचीच बाजू खरी आहे असा दंभ असतो आणि ते  बिचाऱ्या आस्तिकवादी धर्म भोळ्या माणसाला कायम खिजवत असतात. दलाई लामा म्हणतात त्या प्रमाणे धर्म हा प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक आयुष्याचा श्वास आहे . तो श्वास कोंडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. साम्यवादी ,स्वतः ला पुरागामी म्हणणारे आणि नास्तिकवादी  साहिष्णू  नाहीत असेच दिसते. 
देव आहे हे जसे सिद्ध करता येत  नाही  तसेच देव नाही हेही सिद्ध करता येत नाही. म्हणून ज्यांना देव आहे असे वाटते , त्यांच्यासाठी तो आहे. ज्यांना देव नाही असे वाटते , त्यांच्यासाठी तो नाही. निसर्ग हाच देव आहे असे ज्यांना वाटते ते निसर्गाची देव म्हणून पूजा करतात. ती पूजा प्रतीकात्मक असते. वैज्ञानिक त्याच निसर्गाच्या अंतिम शोधात आहेत. त्यांना निसर्गात हे असे कां घडते ? हे गूढ शोधायचे आहे . 
कैलास मानससरोवर