Friday, October 2, 2015

डिजिटल इंडिया – मेक इन इंडिया


इंटरनेट सुरु होण्यापूर्वी ......

युरोपमधील सर्व विद्यापीठातील संगणक एकमेकांना जोडले गेले होते व संशोधक माहितीची आदानप्रदान करीत होते. त्याच वेळी (१९७५- १९७६ )TIFR मधील महासंगणक प्रायोगिक म्हणून युरोपमधील मुख्य संगणकाला जोडला गेला होता. VJTI मध्ये त्या संगणकाचे एक टर्मिनल होते. संशोधकांना एका क्षणात जगातील संशोधनाची माहिती उपलब्ध होत होती. 
भारतातील सर्व संशोधन प्रयोगशाळा , IIT, आणि विद्यापीठे ह्यांच्यातील संगणक एकमेकांना जोडावे आणि TIFR च्या संगणकाच्या साह्याने जगातील इतर संशोधन संस्थांशी संबंध जोडला जावा असे प्रयत्न चालू होते.
BARC , INSDOC , DRTC ,
आणि DST ह्या संस्था एकत्र येउन Information Science and Technolgy प्रकल्प राबवीत होत्या.
ह्या सर्व संस्थांनी एकत्र येउन Information Scientist साठी नवा अभ्यासक्रम सुरु केला होता व तसा शिक्षणक्रम आखला होता. मी माटुंग्याच्या CTRL ह्या संस्थेतर्फे ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही इतर वैज्ञानिकांना डेमो देण्याचे काम करीत असू.
मी TIFR मध्ये असाच डेमो देत होतो. त्या दिवशी डॉ जयंत नारळीकर ते बघण्यासाठी आले होते . मला त्यांच्याबद्दल माहिती होतीच. मी संगणकामध्ये त्यांचे नाव टाकले आणि काही क्षणातच त्यांचे सर्व रिसर्च पेपर असलेली यादी छापून बाहेर आली . मी ती यादी जपून ठेवली होती . माझा संगणकाशी विज्ञान माहिती अधिकारी म्हणून आलेला हा अनोखा संबंध . त्यावेळी IE किंवा गुगल नव्हते .
इंटरनेट येण्यापूर्वीचा हा अनुभव खूप मजेशीर होता. संशोधकाला तासच्या तास वाचनालयात अनेक ग्रंथात व जर्नलमध्ये शोधत बसावे लागत असे , ते लगेच सापडत नसे. हा संगणकाचा उपयोग क्रांतिकारी होता. Current Awareness Abstract काही मिनिटात उपलब्ध करून देण्याचे काम सहाय्यक विज्ञान अधिकारी करून देत असत.
भारतात ही यंत्रणा असावी म्हणून प्रयत्न चालू होते पण त्यावेळी कोणीही ह्या तंत्रज्ञानाकडे तेवढे लक्ष दिले नव्हते .
आज गुगलने जग पादाक्रांत केले आहे. माझा वर्षाचा नातू मला म्हणतो , ' आजोबा , कशाला शोधत बसतां ? गुगल करा , पाहिजे ती माहिती लगेच मिळते ' .

इंटरनेट येण्यापुर्वीचा वरील उल्लेख मी केला त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे विद्याचरण शुक्ला हे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री होते. त्यांच्या हस्ते वरील कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते. अचानक इमर्जन्सी जाहीर झाली आणि ते कार्यक्रमाला तर आले नाहीच पण ती योजनाच बारगळली . म्हणजे आपल्या देशाने IT युगात प्रवेश करणे लांबले. त्यावेळी आपले संगणक युगातील पाऊल मागे पडले ते पडले . डिजिटल इंडिया होण्यासाठी आपण सरसावलो होतो. आपले शास्त्रज्ञ तयार होते पण राजकीय घडामोडीमुळे देश संगणक युगाला मुकला.  

MAKE IN INDIA
आपल्याकडे राजीव गांधी ह्यांच्या प्रयत्नामुळे संगणक युग सुरु झाले होते. तसे त्यांना श्रेय देण्यास हरकत नाही. जॉर्ज फर्नांडीस ह्यांनी आय बी एम ला त्यांचे दुकान बंद करावयास लावले होते तेव्हाच आपल्याकडील संगणकीय युग बंद झाले होते. त्यामुळे राजीव गांधींच्या काळात आपण नव्याने संगणकीय युगात प्रवेश केला होता. तो पर्यंत आपले सारे उच्च शिक्षित मनुष्यबळ ( आय आय टी चे पदवीधर ) अमेरिकेत स्थाईक झाले होते व तेथील गणकयंत्रीय क्षेत्रात ठसा उमटवीत होते.

Large number of Indians or India origin people are working for Google, Microsoft, Facebook and all big Indian IT companies are developing some packages or partner in their development. There are many start-up companies of Indians Americans who have developed innovative IT products. In spite of this, no Indian or Indian IT companies have developed global IT product or IT Company.  Same is true in other technology areas such as NANO technology. In such situation, it is better that we collaborate with global companies and ask them to produce technology products at affordable price for Indian market. Certainly, they will invest in India for profit as they will have high volume business. ‘Make in India’, is another approach. This was done by China long back. Their economy is improved because of that approach. We can do it differently. All IT hardware is now manufactured in China. We missed this when IBM was asked to close their shop in India. We have to learn from the past.

एक साधे उदाहरण देतो. एका कंपनीने PCXT बाजारात आणला होता. अमेरिकेत असलेल्या एका गुजराती संगणक तंत्रज्ञाने ह्या कंपनीची एजन्सी मिळवली होती. अमेरिकेत विक्री केंद्र सुरु केले होते. बर्यापैकी पैसे कमावले. नवे तंत्रज्ञान होते. एका भारत भेटीत भारताची गरज त्याच्या लक्षात आली. त्याने अमेरिकेत कंपनी सुरु केली. भारतातही स्वतःच्या घरण्या माणसांची मदत घेऊन एक कंपनी सुरु केली. भारतात “ MAKE IN INDIA” करणारी ही PCXT कंपनी त्याच्या अमेरिकेतील कंपनीकडून  PCXTचे पार्टस घेऊन भारतात PCXT तयार करू लागली. थोड्याच दिवसात खूप मोठी विक्री होऊ लागली आणि एक मोठी कम्पुटर कंपनी झाली. हेच तंत्र इतर लोकांच्या लक्षात आले आणि थोड्याच दिवसात अनेक PC तयार करणाऱ्या कंपन्या भारतभर सुरु झाल्या. एवढेच काय तर साधा इलेक्ट्रोनिक्स डिप्लोमा घेऊन एक दोन वर्षे काम करणारा इंजिनिअर स्वतःचा PC तयार करणारा व्यवसाय करू लागला. आजही असे अनेक उद्योजक माझ्या ओळखीचे आहेत. असे डोके गुजराथी माणसाचेच असते. अमेरिकेत स्थाईक झालेले अनेक गुजराथी हे TECHNOLOGY TRANSFER सहज करू शकतात. मराठी इंजिनिअर अधिक पगाराची नोकरी करून समाधानी राहतो. त्यांचे तसे नसते.अनेक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळीना ह्या क्षेत्राची चांगली कल्पना आहे.
अमेरिकेत Technology आणि Innovation इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. ते लायसन्स विकत घेऊन उपलब्ध झाले तर भारतात अतिशय कमी किमतीत हे Products तयार होऊ शकतात. तुम्ही १५-२० दिवसाच्या दौर्यात २-४ Technology Productsची माहिती घेऊन  त्यांची योग्य ती लायसन्स फीस देऊन भारतात  सहज घेऊन जाऊ शकतात. “ Make In India” ज्यांना करावयाचे आहे त्यांनी ह्या एन आर आय लोकांचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यावा. छोट्या उद्योजकाने ह्या कल्पनेचा कल्पकतेने उपयोग केला तर अनेक वस्तू भारतात कमी किमतीत बनवता येतील. स्टार्ट-अप कंपन्या खूप आहेत . चांगले Products उपलब्ध आहेत . ते भारतात बनविता येऊ शकतात. म्हणून मला मोदींची “ MAKE IN INDIA” ही कल्पना नवी नसली तरी अधिक आकर्षक वाटते.  


No comments:

Post a Comment